शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

जवान, डॉक्टर यांच्याप्रती सकारात्मक दृष्टिकोन हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:59 IST

भिकू पेडामकर : महाड तालुक्यातील ढालकाठी-बिरवाडी येथील निवृत्त आॅनररी कॅप्टनचा आयएमएकडून गौरव

अलिबाग : देशाच्या रक्षणार्थ भारतीय सेना दलात कार्यरत जवान आणि अधिकारी तर समाजात आरोग्य रक्षणार्थ कार्यरत डॉक्टर्स यांच्याबाबत समाजाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. त्यातून या दोन्ही घटकांचे मनोबल उंचावून त्यांच्याकडून देश आणि मानव संरक्षणाचे कार्य अधिक प्रभावीपणे होईल, असे प्रतिपादन ‘जवान ते आॅनररी कॅप्टन’ अशी तब्बल २८ वर्षांची लष्करी सेवा पूर्ण केलेले महाड तालुक्यातील ढालकाठी-बिरवाडी येथील निवृत्त आॅनररी कॅप्टन भिकू पेडामकर यांनी केले आहे.

भारतीय लष्करात अनन्यसाधारण गौरव परंपरा निर्माण केलेल्या मराठा रेजिमेंटला यंदा तब्बल २५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून याच मराठा रेजिमेंटमध्ये देशरक्षणार्थ धाडसी कामगिरी बजावणारे निवृत्त आॅनररी कॅप्टन भिकू पेडामकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. रविवारी येथील पीएनपी नाट्यगृहात आयोजित एका विशेष समारंभात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) अलिबाग शाखेच्या वतीने ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ निवृत्त मेजर डॉ.अरविंद पाटणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी आयएमए अलिबागचे अध्यक्ष बालरोग तज्ज्ञ डॉ.राजेंद्र चांदोरकर, सचिव भूलतज्ज्ञ डॉ.संजीव शेटकार, खजिनदार अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.सतीश वेश्वीकर आदि मान्यवरांसह शहरातील सर्व डॉक्टर्स व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.निवृत्त आॅनररी कॅप्टन भिकू पेडामकर आपले लष्करी सेवेतील अनुभव सांगताना पुढे म्हणाले, वयाच्या १७ व्या वर्षी, इयत्ता सातवीत असताना, केवळ देशरक्षणाच्या ध्यासाने, १९७१ मध्ये भारतीय लष्कराच्या भरतीत ‘जवान’ म्हणून दाखल झालो. बेळगाव येथे सहा महिने सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर भारतीय लष्कराच्या अनन्यसाधारण शौर्य परंपरेच्या, ‘मराठा रेजिमेंट’मध्ये नियुक्ती झाली. आणि तत्काळ १९७१ मध्ये भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील न्यूमाल जंग्शन येथे रवाना झालो. तो प्रसंग आयुष्यात कधीही विसरणे शक्य नाही.सेवाकाळातील सुवर्ण स्मृतीक्षण म्हणजे, सेना प्रमुख टी.एन.करिअप्पा, जनरल विजय ओबेरॉय, आणि अलिबागचे सुपुत्र जनरल अरु णकुमार वैद्य यांच्या संरक्षण पथकात सेवा बजावली तर मिसाईलमॅन राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम, राष्ट्रपती आर.व्यंकटनारायण, राष्ट्रपती बी. डी. जत्ती यांच्या व्यक्तिगत सुरक्षा पथकात सेवा बजावल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजेंद्र चांदोरकर यांनी केले. सत्कार सोहळ््यानंतर डॉक्टरांनीच बसवलेल्या विविध एकांकिकांचे शानदार प्रस्तुतीकरण यावेळी करण्यात आले.लष्करी सेवेतच सरकारी नियमानुसार पुढील शिक्षण पूर्ण : लष्करी सेवेत असतानाच सरकारी नियमानुसार सेनेतच पुढील शिक्षण पूर्ण केले. भारतीय लष्करी अभ्यासक्र मातील मॅपरिडिंगमधील ‘एम.आर.फर्स्ट’, ‘आय.ए.फर्स्ट’ आणि ‘इंग्रजी-सेकंड ’ हा अभ्यासक्र म गुणवत्तेसह पूर्ण केला. हे शिक्षण आणि लष्करातील कामगिरी याची भारतीय लष्कराने विशेष दखल घेवून १५ आॅगस्ट १९९८ ‘आॅनररी लेफ्टनंट’ पद प्रदान करून सन्मानीय नियुक्ती देण्यात आली. तर जानेवारी १९९९ मध्ये भारतीय लष्कराने पुन्हा एकदा विशेष दखल घेवून त्यांना ‘आॅनररी कॅप्टन’ पद प्रदान करु न मोठा गौरव केल्याचे त्यांनी सांगितले.भूसुरु ंगांच्या स्फोटात २० जण शहीद१४ दिवसांच्या या युद्धात केलेल्या सक्रि य आणि धाडसी कामगिरीची नोंद घेवून बर्फाच्छादित सिक्कीम सीमा प्रांतात दोन वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर केवळ देशासाठी आपण अशीच भावना होती, असे त्यांनी सांगितले. राजस्थानात भारत-पाक सीमा, मणिपूर, नागालँड आणि मिझोराम, जम्मू-काश्मीर सीमेवरील भारतीय लष्करी केंद्र, डेहराडून लष्करी तळ, श्रीलंका शांतीसेना अशी सेवा बजावीत असताना श्रीलंकेत जमिनीत पुरून ठेवलेल्या भूसुरु ंगांच्या शक्तिशाली स्फोटात शांतीसेनेतील रोज सोबत असणारे तब्बल २० सहकारी भारतीय जवान डोळ्यादेखत शहीद झाले, तो प्रसंग आणि ती परिस्थिती आजही डोळ््यासमोरून हटत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :SoldierसैनिकalibaugअलिबागFarmerशेतकरी