शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

महामार्गावर धुळीने प्रवासी हैराण; मुंबई-गोवा महामार्ग व पेण-खोपोली महामार्गाचे रुंदीकरणाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:10 AM

उपाययोजना करण्याची मागणी

पेण : शहरालगत पेण रेल्वे स्थानक ते रामवाडी परिसरात महामार्ग रुंदीकरण कामासाठी मातीच्या भरावाचे काम वेगाने सुरू आहे. या मातीचा धुरळा या मार्गावरील प्रवासी वाहने, अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे अधिक तीव्रतेने उडत आहे. सध्या वाहणारे जोरदार वारे व वाहनांच्या वेगामुळे धुळीचे लोट उडत आहेत. यामुळे पाठीमागच्या प्रवासी वाहनांमधील प्रवासी, वाहनचालकांच्या नाका, तोंडात धुळ जात असल्याने आजाराला निमंत्रण मिळत आहे. सकाळ व संध्याकाळी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, प्रवाशी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे येथून प्रवास करणाºया नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

उडणाऱ्या धुळीने त्रस्त अनेकांना श्वसनाचे आजार, दमा, खोकला, सर्दी या विकारांनी ग्रासले आहे. गेल्या महिनाभरात या समस्येला तोंड देता-देता प्रवाशांना नाकी नऊ आले आहे. महामार्गाचे काम करणाºया ठेकेदार कंपनीला पाणी मारण्यासाठी वेळ नाही. मात्र, ठेकेदार कंपनीच्या या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिक व प्रवाशांना नाहक सहन करावा लागत आहे.

झाडे तोडल्याने रस्ता उजाड

मुंबई- गोवा महामार्ग रुंदीकरणाच्या कामाबरोबरच पेण- खोपोली रुंदीकरणाच्या कामासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला मातीच्या भरावाचे सपाटीकरण सुरू आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला असलेली झाडे तोडून रस्ता उजाड केला आहे.माती भरावामुळे या परिसरात दिवसभर उडणाºया धुळीमुळे प्रवासी, वाहनचालक, स्थानिक नागरिक त्रासले आहेत. या धुळीचे लोट वाऱ्यांबरोबर या परिसरातील पिके, फळझाडे व महामार्गानजीक असलेल्या लोकवस्तीमध्ये उडत असल्याने या सर्वांना या समस्येला तोंड द्यावे लागते आहे. आजारी रुग्णांना याचा अधिक त्रास होतो.

उडणाºया धुळीने त्रस्त अनेकांना श्वसनाचे आजार, दमा, खोकला, सर्दी या विकारांनी ग्रासले आहे. गेल्या महिनाभरात या समस्येला तोंड देता-देता प्रवाशांना नाकी नऊ आले आहे. महामार्गाचे काम करणाºया ठेकेदार कंपनीला पाणी मारण्यासाठी वेळ नाही.

माती भरावाचे काम सुरू

1. मुंबई-गोवा, पेण-खोपोली या दोन्ही महामार्ग रुंदीकरणाचे माती भरावाचे काम करणारी एकच ठेकेदार कंपनी आहे. मातीचे डम्पर, रस्त्यावरची माती, वाहणारे वेगवान वारे यामुळे सर्वत्र उडणारी धूळ प्रवाशांसह स्थानिक जनतेला यांचा होणारा त्रास याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचाºयांनी लक्ष देऊन, या समस्येवर उपाययोजना करणे आवश्यक असतानासुद्धा ती के ली जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

2. त्यामुळे महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहेत, त्या तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी या समस्येला पायबंद घालण्यासाठी केली आहे.

3. जोपर्यंत प्रवासी व स्थानिक शांत आहेत, तोपर्यंत ठीक आहे. मात्र, याचा अतिरेक झाल्यास परिस्थिती गंभीर होऊन याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार राहतील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र