शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
4
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
5
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
6
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
7
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
8
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
9
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
10
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
11
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
12
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
13
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
14
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
15
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
16
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
17
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
18
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
19
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
20
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

घारापुरी बेटाच्या विकासासाठी शासन सहकार्य करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 11:18 PM

ग्रामपंचायतीने दिले समस्यांविषयी निवेदन

उरण : जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटावरील ग्रामस्थ व पर्यटकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि रखडलेली विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांना दिले. ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी निवेदन दिले आहे.

बेटावर दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक हजेरी लावतात. मात्र, त्यांना सोयी देण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पुरेशी आर्थिक तरतूद नाही. केंद्र सरकारने २०१५ साली कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे. या मंजूर निधीप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बेटाच्या विकासासाठी आराखडा तयार केला आहे. मात्र, विकास आराखडाच रखडल्याने पर्यटकांना सोईसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.बेटाच्या चौफेर असलेल्या समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाहात येणाऱ्या कचऱ्यामुळे किनाऱ्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे, तसेच यामुळे बेटावर प्रदूषण वाढीस लागले आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी निधी आणि योजनाही उपलब्ध आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. घारापुरी ग्रामस्थ आणि पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची समस्यांवर उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. कारण १,२०० लोकवस्तीच्या बेटावर उपलब्ध असलेल्या एकमेव धरणातूनच राजबंदर, शेेेतबंदर आणि मोराबंदर आदी तीन गावांना आणि पर्यटकांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, गळक्या धरणात पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहात नाही. यामुळे पर्यटक आणि ग्रामस्थांना कायम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे अशा अनेक समस्यांविषयी घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे आणि अन्य सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, अनिल देसाई आदी मान्यवरही उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेgram panchayatग्राम पंचायत