शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

घोणसे घाट धोकादायक, बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 3:38 AM

मुंबई-दिघी महामार्गावरील घोणसे घाट पावसाळ्यात प्रवासीवाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे. घोणसे घाटाच्या दरड संरक्षक भिंतीचे दगड अतिवृष्टीमुळे निखळण्यास सुरु वात झाली आहे. बांधकाम खात्याने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

श्रीवर्धन - मुंबई-दिघी महामार्गावरील घोणसे घाट पावसाळ्यात प्रवासीवाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे. घोणसे घाटाच्या दरड संरक्षक भिंतीचे दगड अतिवृष्टीमुळे निखळण्यास सुरु वात झाली आहे. बांधकाम खात्याने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.म्हसळा शहराचे प्रवेशद्वार असलेला घोणसे घाटात अपघातांची मालिका नेहमीच सुरू असते, यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ठाणे दिवेआगार एसटीच्या अपघातानंतर पूर्वीचा केळेवाडीचा तीव्र वळण रस्ता बदलून त्याऐवजी दुसऱ्या पर्यायी रस्त्याची निर्मिती करण्यात आली.सध्या वापरात असलेला मुख्य रस्त्याच्या वळणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पर्यायी मार्गाची निर्मिती करताना दरड संरक्षणासाठी दगडाची भिंत रस्त्याच्या डाव्या बाजूला बांधण्यात आली होती. मात्र, त्या भिंतीचे अनेक लहान-मोठे दगड निळखत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.घोणसे घाट वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त व महत्त्वाचा आहे. श्रीवर्धन तालुक्यात प्रवेश करण्यासाठी घोणसे घाटाशिवाय पर्याय नाही. श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील हरिहरेश्वर, दिवेआगार व श्रीवर्धनकडे वीकेण्डला पर्यटकांचा ओघ सदैव असतो. त्यासोबत दक्षिण काशी असलेल्या हरिहरेश्वरला भाविकांची गर्दी वाढतच आहे, त्यामुळे घोणसे घाट लाखो लोकांच्या जीवितांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.घोणसे घाटात अपघात प्रवण क्षेत्राचे नामनिर्देशन करणारे फलक क्वचित ठिकाणी निदर्शनास येतात. म्हसळ्याकडे जाताना घाटातील लोखंडाचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. घाटातील मुख्य वळणावर सभोवतालच्या डोंगरमाथ्यावरील पाणी झिरपताना दिसते. वेळीच दखल न घेतल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. संरक्षक भिंतीचे दगड बसवल्यास दरड कोसळण्याचा धोका कमी करण्यासाठी मदत होईल. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात या आठवड्यात पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक रस्ते, घरे, महावितरणाचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.माणगाव ते म्हसळा २७ कि.मी.चे अंतर आहे. घोणसे घाटाची लांबी अंदाजे एक कि.मी. आहे. घाटाच्या उजव्या बाजूस खोल दरी आहे. सध्या माणगाव ते दिघी या महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे.सदरचे काम चांदोरे गावाच्या हद्दीपर्यंत होत आले आहे. घोणसे घाटातील रस्त्याची झालेली वाताहत लवकर दूर व्हावी व दरड संरक्षक उपाययोजना लवकर करण्यात याव्यात, अशी मागणी चालक तसेच स्थानिकांकडून करण्यात येत आहे.घोणसा घाटाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. वळणावरील रस्ता खचला आहे. दरड संरक्षक भिंतीचे दगड निखळले आहेत. संबंधित बांधकाम विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनहितासाठी आंदोलन करण्यात येईल.- नाझीम हसवारे,अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीघोणसे घाटातील वळण रस्त्यावरील खड्ड्यांनी जीव मेटाकुटीला येत आहे. घोणसे घाट तालुक्यातील सर्वात अवघड वळणाचा घाट आहे, त्यामुळे चालकांना नेहमीच सतर्क राहावे लागते. या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्यासाठी घाटातील वळणे, रस्ते नवखे असल्याने अपघात वाढले आहेत.- संदीप गुरव, चालक, एसटी महामंडळघोणसे घाटातील रस्ता अतिशय खराब झाला आहे, त्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. दरड कोसळल्यास सर्व वाहतूक ठप्प होईल.- अभय कळमकर, वाहनचालकघोणसे घाटात सर्व चालकांना सावकाश चालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घोणसे घाटातील मुख्य वळण रस्ता अतिशय खड्डेमय झाला आहे. त्याची लवकर दुरु स्ती होणे अपेक्षित आहे.- सुधा विचारे,वाहतूक नियंत्रक, म्हसळा 

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या