शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

जिल्ह्यातील गावांमध्ये परिवर्तनाची गंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 00:47 IST

राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ७५० गावांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमच राज्य शासन आणि कॉर्पोरेट संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून राबविण्यात येत असलेल्या ग्रामपरिवर्तन उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला

- जयंत धुळप अलिबाग : राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ७५० गावांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमच राज्य शासन आणि कॉर्पोरेट संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून राबविण्यात येत असलेल्या ग्रामपरिवर्तन उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला असून कृषी, पाणीपुरवठा, स्वच्छता यासाठीच्या योजनांमध्ये लोकसहभागवाढी सोबतच ग्रामीण विकासासाठी एकत्र येऊन गावात स्थित्यंतर आणले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आहे.बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे फाउंडेशनच्या नियामक परिषदेची चौथी बैठक झाली. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, कॉर्पोरेट क्षेत्रातील दीपक पारेख, किशोर बियाणी, रोनी स्कूवाला, जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख जुनेद अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.शासन आणि खासगी संस्था एकत्र आल्यास कशाप्रकारे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण या माध्यमातून पाहायला मिळते. फाउंडेशनच्या माध्यमातून ३८५ ग्रामपरिवर्तकांनी राज्यातील २२ जिल्ह्यांतील ७५० गावांमध्ये विकासाचे काम नेण्यासाठी मोलाची मदत केली आहे. ७५० गावांच्या परिवर्तनापासून सुरू झालेला हा प्रवास १० हजार गावांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्याकरिता या वेळी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छादिल्या.>२२ गावांसाठी ६५ कोटींचा आराखडा मंजूररायगड जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये २२ गावांसाठी ६५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, विविध विकासाची कामे प्रत्यक्ष सुरू आहेत. या योजने अंतर्गत बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देऊन एलईडी बल्ब निर्मिती व्यवसाय कार्यान्वित करण्यात आला आहे. भाजीपाला उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात आले असून, येत्या काळात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलत आहे. स्वच्छता, सर्वांना घरे, पाणीपुरवठा या क्षेत्रात राज्य शासनाचे काम चांगले असून, फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेले स्थित्यंतर अभिनंदनीय असून त्यात सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी या वेळी व्यक्त केली.स्वयंरोजगारासाठी पेपर डिश बनविणे, अशा प्रकारच्या व्यवसायांना प्रोत्साहन व बेरोजगार युवकांना साहाय्य करण्यात येत आहे. कौशल्य वृद्धी करून रोजगार उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.>रायगड जिल्हा आघाडीवरफाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचे सादरीकरण रायगड, यवतमाळ, वर्धा, अमरावती, गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी केले. रायगड जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ५५ गावांत झालेल्या परिवर्तनाचे सादरीकरण रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.या कामात रायगड जिल्हा आघाडीवर असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सादरीकरणाची विशेष प्रशंसा केली. रायगड जिल्ह्यातील या ५५ गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक नेमण्यात आले असून, ग्रामविकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे.रायगड जिल्ह्यात स्वदेस फाउंडेशन ही संस्था प्रमुख विकास भागीदार म्हणून काम करीत असून, ग्रामविकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास परिवर्तन कार्यालय मुंबई, शासकीय कार्यालयातील कृतिसंगम अनुदान, जिल्हा नियोजन समिती व स्वदेस फाउंडेशनमार्फत अनुदान उपलब्ध करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.