शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

जिल्ह्यातील गावांमध्ये परिवर्तनाची गंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 00:47 IST

राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ७५० गावांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमच राज्य शासन आणि कॉर्पोरेट संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून राबविण्यात येत असलेल्या ग्रामपरिवर्तन उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला

- जयंत धुळप अलिबाग : राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ७५० गावांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमच राज्य शासन आणि कॉर्पोरेट संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून राबविण्यात येत असलेल्या ग्रामपरिवर्तन उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला असून कृषी, पाणीपुरवठा, स्वच्छता यासाठीच्या योजनांमध्ये लोकसहभागवाढी सोबतच ग्रामीण विकासासाठी एकत्र येऊन गावात स्थित्यंतर आणले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आहे.बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे फाउंडेशनच्या नियामक परिषदेची चौथी बैठक झाली. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, कॉर्पोरेट क्षेत्रातील दीपक पारेख, किशोर बियाणी, रोनी स्कूवाला, जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख जुनेद अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.शासन आणि खासगी संस्था एकत्र आल्यास कशाप्रकारे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण या माध्यमातून पाहायला मिळते. फाउंडेशनच्या माध्यमातून ३८५ ग्रामपरिवर्तकांनी राज्यातील २२ जिल्ह्यांतील ७५० गावांमध्ये विकासाचे काम नेण्यासाठी मोलाची मदत केली आहे. ७५० गावांच्या परिवर्तनापासून सुरू झालेला हा प्रवास १० हजार गावांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्याकरिता या वेळी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छादिल्या.>२२ गावांसाठी ६५ कोटींचा आराखडा मंजूररायगड जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये २२ गावांसाठी ६५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, विविध विकासाची कामे प्रत्यक्ष सुरू आहेत. या योजने अंतर्गत बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देऊन एलईडी बल्ब निर्मिती व्यवसाय कार्यान्वित करण्यात आला आहे. भाजीपाला उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात आले असून, येत्या काळात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलत आहे. स्वच्छता, सर्वांना घरे, पाणीपुरवठा या क्षेत्रात राज्य शासनाचे काम चांगले असून, फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेले स्थित्यंतर अभिनंदनीय असून त्यात सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी या वेळी व्यक्त केली.स्वयंरोजगारासाठी पेपर डिश बनविणे, अशा प्रकारच्या व्यवसायांना प्रोत्साहन व बेरोजगार युवकांना साहाय्य करण्यात येत आहे. कौशल्य वृद्धी करून रोजगार उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.>रायगड जिल्हा आघाडीवरफाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचे सादरीकरण रायगड, यवतमाळ, वर्धा, अमरावती, गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी केले. रायगड जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ५५ गावांत झालेल्या परिवर्तनाचे सादरीकरण रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.या कामात रायगड जिल्हा आघाडीवर असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सादरीकरणाची विशेष प्रशंसा केली. रायगड जिल्ह्यातील या ५५ गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक नेमण्यात आले असून, ग्रामविकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे.रायगड जिल्ह्यात स्वदेस फाउंडेशन ही संस्था प्रमुख विकास भागीदार म्हणून काम करीत असून, ग्रामविकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास परिवर्तन कार्यालय मुंबई, शासकीय कार्यालयातील कृतिसंगम अनुदान, जिल्हा नियोजन समिती व स्वदेस फाउंडेशनमार्फत अनुदान उपलब्ध करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.