शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

भिरा जलविद्युत प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा

By admin | Published: July 27, 2016 3:11 AM

माणगाव तालुक्यातील भिरा जलविद्युत प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक करून ताब्यात घेतलेल्या जमिनी तत्काळ परत करा, या मागणीसाठी सर्वहारा आंदोलनाच्या नेत्या उल्का

महाड : माणगाव तालुक्यातील भिरा जलविद्युत प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक करून ताब्यात घेतलेल्या जमिनी तत्काळ परत करा, या मागणीसाठी सर्वहारा आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखाली माणगाव प्रांत कार्यालयावर मंगळवारी प्रकल्पग्रस्तांचा भव्य मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात विळे, पाटणूस, वरची वाडी, भाऊची आळी, भैरीची वाडी, खाळजे, म्हसेवाडी, लव्हली वाडी, साजे व भिरा गावातील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.१९८१ मध्ये भिरा जलविद्युत प्रकल्पासाठी केवळ माती काढण्यासाठी नाममात्र मोबदला देऊन शासनाने या परिसरातील १० ते १२ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर १५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सुमारे १,२०० एकर जमीन विनावापर केवळ माती काढण्यासाठी शासनाने ताब्यात घेतल्या, या जमिनीची सातबारापत्रकी ‘भिरा प्रकल्प महाराष्ट्र शासन’ अशा नोंदी पडल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या शेतकऱ्यांच्या लक्षात आले. ही फसवणूक होऊनही संयम बाळगत प्रकल्पग्रस्त दाखल्याची मागणी करूनही आजतागायत हे दाखले शेतकऱ्यांना दिले गेले नाहीत. तर निवाड्याची मागणी करूनही निवाडे दिले जात नसल्याने शेतकऱ्यांना अंधारात ठेवून शासनाने जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप यावेळी आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी केला.नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ च्या कलम २४ प्रमाणे शासनाने ताब्यात घेतलेल्या जमिनी संपादन केल्यापासून पाच वर्षे विनावापर पडून राहिली असेल, तर अशी जमीन मूळ मालकांना किंवा वारसांना परत करण्याची कार्यवाही करता येते. रक्कम वेळोवेळीच्या व्याजदराने बँके त भरूनताबा घेतल्याच्या तारखेपासून बोजाविरहित जमीन मूळ मालकांना परत करता येते, अशी तरतूद असल्याचे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)