शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

खैरे धरणाच्या दुरु स्तीचा मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 02:52 IST

डिसेंबरपासून धरणातील पाणीपुरवठा बंद : महाड तालुक्यातील १९ गावे, २९ वाड्यांतील ११ हजार ग्रामस्थांना बसणार टंचाईची झळ

सिकंदर अनवारे

दासगाव : महाड तालुक्यातील खैरे धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती आहे. शिवाय येथील जलशुद्धीकरण यंत्रणाही कालबाह्य झाल्याने दुरुस्तीची गरज आहे. लवकरच धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असून, त्यासाठी धरणातून केला जाणारा पाणीपुरवठा डिसेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेली १९ गावे व २९ वाड्यांतील ११ हजार ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील खैरे धरणाला गेली अनेक वर्षे गळती लागली होती. शिवाय, या धरणातून पाणीपुरवठा होत असलेली यंत्रणाही नादुरु स्त झाली आहे. यामुळे ऐनपावसाळ्यात परिसरातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता.गळतीमुळे पाणी वाया जातेच, शिवाय वेळेत दुरुस्ती न झाल्यास संपूर्ण धरणालाच धोका निर्माण झाला होता. २१० मीटर लांबीच्या धरणातील १२० मीटर भाग नादुरुस्त झाला आहे. लघु पाटबंधारे विभागाकडून धरणाची दुरुस्ती केली जाणार आहे. दुरुस्तीसाठी धरणातील पाणी सोडावे लागणार आहे. त्यानंतरच ही दुरुस्ती शक्य होणार आहे.धरणातील पाण्यावर सिंचन क्षेत्र कमी असले तरी १९ गावे व २९ वाड्यांतील ११ हजार ग्रामस्थांना याच धरणातून पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा बंद झाल्यास येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. लघुपाटबंधारे विभागाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला याबाबत पत्रव्यवहार करून पूर्वसूचना दिली आहे.धरण पाटबंधारे विभागाचे असून, त्यावरील पाणीयोजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आहेत. पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींना पाण्याचे स्रोत माहिती देण्याबाबत लेखी कळविले आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत लोकसंख्या व गुरांची संख्या याची माहिती तत्काळ मागितली आहे. याआधारे या दोन्ही विभागांना पाण्यासाठी पुढील नियोजन करणे सोपे होणार आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी अन्यत्र अडवून पाण्याचे नियोजन करता येईल का, याचाही विचार केला जात आहे.

खाडीपट्टा विभागात खैरे गावाजवळ हे धरण बांधण्यात आले आहे. धरणात केल्या जाणाऱ्या पाणीसाठ्याचा वापर सिंचनासाठी केला जाणार होता. मात्र, या भागातील शेती प्रदूषित पाण्याने बाधित झाल्याने अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली, यामुळे या पाण्याचा वापर आता पिण्याच्या पाण्यासाठी केला जात आहे. धरणात जवळपास १.७९ द.ल.घ.मी इतका पाणी साठा आहे. गोमेंडी, वराठी, चिंभावे, चिंभावे मोहल्ला, सुतारकोंड, बेबलघर, तेलंगे, तेलंगे मोहल्ला, ओवळे, आदिस्ते, खैरे तर्फे तुडील, वलंग. रोहन, जुई, कुंबळे, रावढळ, कोसबी, लोअर तुडील व वामने या गावांना या धरणातून पाणीपुरवठा होत आहे. धरणातून दररोज सहा लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो.धरणा परिसरातील १२० मीटर लांब व १२ मीटर खोल क्षेत्रात गळती असल्याने देखभाल दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. याचा फायदा भविष्यात ग्रामस्थांनाच होईल.- प्रकाश पोळ, शाखा अभियंता,ल.पा. विभाग, महाडधरणाच्या दुरुस्तीमुळे अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद होणार असल्याबाबतची माहिती ग्रामपंचायतींना दिली आहे. येथील नियोजनाची माहितीही मागविण्यात आली आहे.- जे. एन. पाटील, उपअभियंता,ग्रा.पा. पुरवठा विभाग, महाडधरणाच्या पाण्यावर आम्ही भाजीपाला करतो, पाणी बंद झाल्यास शेतीला पाणी मिळणार नाही आणि पीक आले नाही तर उपासमार होईल.- सुनील साळवी, ग्रामस्थ 

टॅग्स :DamधरणRaigadरायगड