शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

खैरे धरणाच्या दुरु स्तीचा मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 02:52 IST

डिसेंबरपासून धरणातील पाणीपुरवठा बंद : महाड तालुक्यातील १९ गावे, २९ वाड्यांतील ११ हजार ग्रामस्थांना बसणार टंचाईची झळ

सिकंदर अनवारे

दासगाव : महाड तालुक्यातील खैरे धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती आहे. शिवाय येथील जलशुद्धीकरण यंत्रणाही कालबाह्य झाल्याने दुरुस्तीची गरज आहे. लवकरच धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असून, त्यासाठी धरणातून केला जाणारा पाणीपुरवठा डिसेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेली १९ गावे व २९ वाड्यांतील ११ हजार ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील खैरे धरणाला गेली अनेक वर्षे गळती लागली होती. शिवाय, या धरणातून पाणीपुरवठा होत असलेली यंत्रणाही नादुरु स्त झाली आहे. यामुळे ऐनपावसाळ्यात परिसरातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता.गळतीमुळे पाणी वाया जातेच, शिवाय वेळेत दुरुस्ती न झाल्यास संपूर्ण धरणालाच धोका निर्माण झाला होता. २१० मीटर लांबीच्या धरणातील १२० मीटर भाग नादुरुस्त झाला आहे. लघु पाटबंधारे विभागाकडून धरणाची दुरुस्ती केली जाणार आहे. दुरुस्तीसाठी धरणातील पाणी सोडावे लागणार आहे. त्यानंतरच ही दुरुस्ती शक्य होणार आहे.धरणातील पाण्यावर सिंचन क्षेत्र कमी असले तरी १९ गावे व २९ वाड्यांतील ११ हजार ग्रामस्थांना याच धरणातून पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा बंद झाल्यास येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. लघुपाटबंधारे विभागाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला याबाबत पत्रव्यवहार करून पूर्वसूचना दिली आहे.धरण पाटबंधारे विभागाचे असून, त्यावरील पाणीयोजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आहेत. पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींना पाण्याचे स्रोत माहिती देण्याबाबत लेखी कळविले आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत लोकसंख्या व गुरांची संख्या याची माहिती तत्काळ मागितली आहे. याआधारे या दोन्ही विभागांना पाण्यासाठी पुढील नियोजन करणे सोपे होणार आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी अन्यत्र अडवून पाण्याचे नियोजन करता येईल का, याचाही विचार केला जात आहे.

खाडीपट्टा विभागात खैरे गावाजवळ हे धरण बांधण्यात आले आहे. धरणात केल्या जाणाऱ्या पाणीसाठ्याचा वापर सिंचनासाठी केला जाणार होता. मात्र, या भागातील शेती प्रदूषित पाण्याने बाधित झाल्याने अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली, यामुळे या पाण्याचा वापर आता पिण्याच्या पाण्यासाठी केला जात आहे. धरणात जवळपास १.७९ द.ल.घ.मी इतका पाणी साठा आहे. गोमेंडी, वराठी, चिंभावे, चिंभावे मोहल्ला, सुतारकोंड, बेबलघर, तेलंगे, तेलंगे मोहल्ला, ओवळे, आदिस्ते, खैरे तर्फे तुडील, वलंग. रोहन, जुई, कुंबळे, रावढळ, कोसबी, लोअर तुडील व वामने या गावांना या धरणातून पाणीपुरवठा होत आहे. धरणातून दररोज सहा लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो.धरणा परिसरातील १२० मीटर लांब व १२ मीटर खोल क्षेत्रात गळती असल्याने देखभाल दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. याचा फायदा भविष्यात ग्रामस्थांनाच होईल.- प्रकाश पोळ, शाखा अभियंता,ल.पा. विभाग, महाडधरणाच्या दुरुस्तीमुळे अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद होणार असल्याबाबतची माहिती ग्रामपंचायतींना दिली आहे. येथील नियोजनाची माहितीही मागविण्यात आली आहे.- जे. एन. पाटील, उपअभियंता,ग्रा.पा. पुरवठा विभाग, महाडधरणाच्या पाण्यावर आम्ही भाजीपाला करतो, पाणी बंद झाल्यास शेतीला पाणी मिळणार नाही आणि पीक आले नाही तर उपासमार होईल.- सुनील साळवी, ग्रामस्थ 

टॅग्स :DamधरणRaigadरायगड