शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पनवेलमधील जिल्हा परिषदेच्या पाच शाळा होणार बंद, शिक्षण विभागाची माहिती, इतर शाळांमध्ये समायोजित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 3:38 AM

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणावर होणार आहे. पनवेल तालुक्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या पाच शाळा बंद होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

- मयूर तांबडेपनवेल : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणावर होणार आहे. पनवेल तालुक्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या पाच शाळा बंद होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. गारमाळ, टोकाची वाडी, मोहपे, सतीची वाडी या चार शाळा तर मालडुंगे व बापदेववाडी या शाळेतील कोणतीही एक अशा पाच शाळा इतर शाळांमध्ये समायोजित करण्यात येणार आहेत.पनवेल तालुक्यात खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रमाण वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या घटत आहे. पनवेल तालुक्यात शिक्षण अधिकाºयांनी शाळांची पाहणी करून त्यांच्या डागडुजीकरणाकडे लक्ष दिले तर विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होऊ शकते. पावसाळ्यात जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसणे देखील धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शाळेतील शौचालयाची देखील दुरवस्था झालेली असल्याचे दिसत आहे, तर काही शाळेतील शौचालयांचे दरवाजे तुटलेले दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.तालुक्यात सद्यस्थितीत जिल्हा परिषदेच्या २५७ शाळा आहेत. यापूर्वी तालुक्यातील शाळांची संख्या २६४ होती. मात्र कमी विद्यार्थी संख्येअभावी ७ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. कोंड्याची वाडी (वाजे), चाफेवाडी (आपटे), चिंचवाडी (वाजे), खंगारपाडा (सुकापूर), वाघ्राची वाडी (कळंबोली), माची प्रबळ (नेरे), वांगणी तर्फे तळोजे (चिंध्रण) या शाळा यापूर्वीच बंद झालेल्या आहेत. तर शासनाच्या नवीन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या ५ शाळा समायोजित करण्यात येणार आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना खैरवाडी, बागेची वाडी, पोयंजे, धामनी, मालडुंगे, सतीची वाडी या शाळांमध्ये समायोजित करण्यात येणार आहे. कमी पटसंख्येतील विद्यार्थी अन्य शाळेत स्थलांतर केल्यानंतर बंद झालेल्या शाळेतील शिक्षकाची पदस्थापना ही विद्यार्थी समायोजन झालेल्या शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात होणार आहे. त्या शाळांमध्येच त्या शिक्षकाचे वेतन काढले जाणार आहे. तालुक्यातील काही शाळा या दुर्गम भागात आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना दोन ते तीन कि.मी. पर्यंत दुसरी शाळा उपलब्ध आहे. तेथे त्यांचे समायोजन केले जाणार आहे. त्यामुळे शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता तीन-चार कि.मी. पायपीट करावी लागणार असल्याचे समोर आले आहे.कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्यात येणार असल्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून नजीकच्या शाळेत चांगली गुणवत्ता मिळावी यादृष्टीने समायोजन होणार आहे.गारमाळ येथे ९ विद्यार्थी, टोकाची वाडी येथे ८ विद्यार्थी, मोहपे येथे ६ , बापदेव वाडी येथे ७ , सतीची वाडी येथे ३ व मालडुंगे येथे ६ विद्यार्थी संख्या आहे. यापैकी मालडुंगे व सतीची वाडी या दोन शाळांपैकी कोणतीही एक शाळा अन्य शाळेत व इतर ४ अशा पाच शाळा समायोजित होणार आहेत.

टॅग्स :Schoolशाळा