आदिवासींचा पाण्यासाठी लढा
By Admin | Updated: June 16, 2016 00:42 IST2016-06-16T00:42:47+5:302016-06-16T00:42:47+5:30
रायगड जिल्ह्यात पाणी कमी नाही मात्र आज आदिवासींसह सर्वांनाच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. नैसर्गिक संकटे परवडली मात्र कर्जत तालुक्याच्या सांगवी आदिवासी वाडीला गेली काही वर्षे

आदिवासींचा पाण्यासाठी लढा
- अमोल पाटील, खालापूर
रायगड जिल्ह्यात पाणी कमी नाही मात्र आज आदिवासींसह सर्वांनाच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. नैसर्गिक संकटे परवडली मात्र कर्जत तालुक्याच्या सांगवी आदिवासी वाडीला गेली काही वर्षे कृत्रिम पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. कारणही तसेच आहे. पूर्वी मुबलक पाणी मिळायचे मात्र गावात पाण्याची कंपनी आली अन् टंचाईला सुरु वात झाली. त्यातच पाणी मिळण्यासाठी गावकरी आपला संताप प्रशासनावर व्यक्त करीत आहेत.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका पाणीटंचाईने चांगलाच होरपळत आहे. उल्हास, पेज या नद्या गावांच्या जवळून वाहत आहेत मात्र नद्यांचे पात्र कोरडे पडल्याचे भयाण वास्तव आहे. तालुक्याचा टंचाई कृती आराखडा मंजूर झाला. पाणी देण्याचे काम महसूल प्रशासन करीत देखील आहे मात्र कर्जत तालुक्यातील टंचाई कृती आराखड्यात असलेले सांगवी गाव,सांगवी आदिवासी वाडीत पाण्याचे भीषण दुर्भिक्ष जाणवत आहे. अलीकडे तीन वर्षांपूर्वी गावात पाणीटंचाई नव्हती असे गावकऱ्यांचे म्हणणे, मात्र गावातड्रिंकिंग वॉटर कंपनी उभी राहिली आणि गावाच्या बोअरवेलला असणारे पाणी गेले असल्याचा आरोप आदिवासी महिलांनी केला आहे.
गावाच्या बोअरवेल या २०० फूट होत्या मात्र कंपनीने ज्या बोअरवेल मारल्यात त्या ४०० फुटांच्या वरती असल्याने आदिवासी वाडीतील बोअरवेलचे पाणी गेले आहे आणि आज एकाही नवीन बोअरवेलला पाणी लागत नाही असेही गावकरी सांगत आहेत. सांगवी गावाजवळ ड्रिंकिंग वॉटर कंपनी असून पाण्याची विक्र ी होते मात्र आम्हाला पाण्याच्या एका थेंबासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे गावकरी मोतीराम घारे यांनी सांगितले. रायगड जिल्हा परिषदेने नवीन दोन ठिकाणी नव्याने बोअरवेल मारल्या आहेत. त्याही कोरड्या निघाल्या असून या टंचाईला सर्वस्वी कंपनी जबाबदार असून तर निवासी जमीन असल्याने व्यावसायिक वापर झाल्याने बिनशेतीचे उल्लंघन होत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य पूजा थोरवे यांनी सांगितले.
कार्यवाहीचे आश्वासन
बोअरवेल अधिग्रहणासाठी तहसील विभागाने सांगवी ग्रामपंचायतीला पत्र देऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र कर्जत पोलीस आता बंदोबस्त देण्याकामी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे आदिवासींची पाणीटंचाई दूर होण्यास पोलिसांची आडकाठी येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्रामस्थांन नाराज आहेत.
याबाबत नव्याने पत्र तयार करून ग्रामसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे, मी नव्याने आल्याने हे प्रकरण काय आहे, याबाबत माहिती घेऊन पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यवाही करण्यात येईल, असे कर्जत पोलीस ठाण्यात नव्याने रु जू झालेले पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी सांगितले.
या कंपनीवर कारवाई करणार आहे. कंपनी स्वत:च्या फायद्यासाठी पाण्याचा उपसा करीत असलेल्या बोअरवेल आदिवासी वाडी आणि सांगवी गावासाठी अधिग्रहण करीत असल्याचे पत्र कंपनीला देणार आहोत. जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याने बिनशेतीचे उल्लंघन केल्याने बिनशेती परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येऊन कंपनीवर कारवाई करणार आहे.
- रवींद्र बाविस्कर, तहसीलदार