शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मानिवली पुलाअभावी शेतकरी त्रस्त, १९९६ मध्ये कोसळला पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 01:03 IST

मानिवली गावातील शेतकºयांची शेती पोसरी नदीच्या पलीकडे म्हणजे पाषाणे, आर्डे आणि खाड्याचा पाडा भागात आहेत.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील मानिवली गाव आणि कळंब-पाषाणे रस्ता जोडणारा पोेसरी नदीवरील पूल १९९६ मध्ये कोसळला आहे. पोसरी नदीवर असलेला लोखंडी प्लेटचा पूल वाहून गेला असून, या पुलाअभावी मानिवली गावातील शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. मानिवली गावातील शेतकऱ्यांची ८० टक्के शेती नदीच्या पलीकडे असल्याने आणि जाण्यासाठी पूल नसल्याने शेतक-यांना तब्बल ७ ते ८ किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे. मात्र, हा पूल पुन्हा उभा राहावा, म्हणून शासकीय यंत्रणेने अद्याप काहीही केले नाही.मानिवली गावातील शेतकºयांची शेती पोसरी नदीच्या पलीकडे म्हणजे पाषाणे, आर्डे आणि खाड्याचा पाडा भागात आहेत. मानिवली गावाच्या आजूबाजूला जेमतेम २५ टक्के जमीन मानिवली ग्रामस्थांची असून, पावसाळ्यात त्या ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थ हे होडीच्या साहाय्याने शेतकºयांना पलीकडे शेतीच्या कामासाठी सोडण्याचे काम करायचे आणि संध्याकाळी पुन्हा घरी आणायचे, परंतु १९७२ साली शेतीच्या कामासाठी पावसाळ्यात जात असताना, मानिवली येथे होडी परत येत असताना अपघात झाला होता. त्यात तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला होता, तर पुरुष हे नदी पोहून बाहेर आले होते. त्यानंतर, पोसरी नदी पार करण्यासाठी वापरात असलेली होडी कायमची बंद झाली. यानंतर, १९९०ला तेथे पूल बांधण्यासाठी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांनी पाठपुरावा केल्यानंतर, मानिवली गावाच्या ग्रामस्थांना नदी पार करण्यासाठी पुलाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.मात्र, पाच वर्षांत पुलासाठी केवळ खांब उभे राहिले. शेवटी १९९६ मध्ये लोखंडी प्लेट टाकून पुलावरून वाहतूक सुरू झाली. मात्र, दीड वर्षांत त्या लोखंडी प्लेट कोसळल्या. दोन वर्षे पुलाची दुरुस्ती वेळेवर झाली नसल्याने अवघ्या दोन वर्षांत लोखंडी प्लेटचा पूल कोसळला आणि पोसरी नदी पार करण्याचा पर्याय निघून गेला आहे. आता केवळ मानिवली येथे नदीवर पुलाच्या पाच खांबांपैकी दोनच खांब आपले अस्तित्व सांगत आहेत. पूल कोसळल्याने आणि पुन्हा उभा होण्याची स्थिती दिसत नसल्याने नदीच्या पलीकडे शेती असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.आमच्या गावातील शेतकºयांनी शेती करायचीच नाही काय? आणि शेती न करता कसे जगायचे? - गणेश डायरे, शेतकरीअनेक शेतकºयांनी केली शेती बंदमानिवली गावातील ८० टक्के शेती पोसरी नदीच्या पलीकडे आहेत. त्या पेसरी नदीवर पूल नसल्याने मानिवली गावातील शेतकºयांना पावसाळ्यात शेतीची कामे करण्यासाठी मानिवली गावातून वरई आणि पुढे चिकनपाडा गावातून माले होऊन पाषाणे येथे पोहोचावे लागते.हा सर्व फेरा एका वेळी किमान ७ ते ८ किलोमीटरचा असून, शेतीची कामे करण्यासाठी आवश्यक अवजारे घेऊन पायी एवढे अंतर पार करणे कठीण असल्याने, मानिवली गावातील काही शेतकºयांनी आर्थिक कुवत नसल्याने शेतीची कामे करणे थांबविले आहे.त्यामुळे हा पूल होण्यासाठी सर्वांसाठी फायद्याचे असून, मानिवली येथील पुलाच्या निर्मितीसाठी शासकीय पातळीवर कोणीही आवाज उठवताना दिसत नाही. त्याचा परिणाम मानिवली येथे पोसरी नदीवर पूल होणार की नाही? याबाबत शंका येथील शेतकरी उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड