शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

मानिवली पुलाअभावी शेतकरी त्रस्त, १९९६ मध्ये कोसळला पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 01:03 IST

मानिवली गावातील शेतकºयांची शेती पोसरी नदीच्या पलीकडे म्हणजे पाषाणे, आर्डे आणि खाड्याचा पाडा भागात आहेत.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील मानिवली गाव आणि कळंब-पाषाणे रस्ता जोडणारा पोेसरी नदीवरील पूल १९९६ मध्ये कोसळला आहे. पोसरी नदीवर असलेला लोखंडी प्लेटचा पूल वाहून गेला असून, या पुलाअभावी मानिवली गावातील शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. मानिवली गावातील शेतकऱ्यांची ८० टक्के शेती नदीच्या पलीकडे असल्याने आणि जाण्यासाठी पूल नसल्याने शेतक-यांना तब्बल ७ ते ८ किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे. मात्र, हा पूल पुन्हा उभा राहावा, म्हणून शासकीय यंत्रणेने अद्याप काहीही केले नाही.मानिवली गावातील शेतकºयांची शेती पोसरी नदीच्या पलीकडे म्हणजे पाषाणे, आर्डे आणि खाड्याचा पाडा भागात आहेत. मानिवली गावाच्या आजूबाजूला जेमतेम २५ टक्के जमीन मानिवली ग्रामस्थांची असून, पावसाळ्यात त्या ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थ हे होडीच्या साहाय्याने शेतकºयांना पलीकडे शेतीच्या कामासाठी सोडण्याचे काम करायचे आणि संध्याकाळी पुन्हा घरी आणायचे, परंतु १९७२ साली शेतीच्या कामासाठी पावसाळ्यात जात असताना, मानिवली येथे होडी परत येत असताना अपघात झाला होता. त्यात तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला होता, तर पुरुष हे नदी पोहून बाहेर आले होते. त्यानंतर, पोसरी नदी पार करण्यासाठी वापरात असलेली होडी कायमची बंद झाली. यानंतर, १९९०ला तेथे पूल बांधण्यासाठी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांनी पाठपुरावा केल्यानंतर, मानिवली गावाच्या ग्रामस्थांना नदी पार करण्यासाठी पुलाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.मात्र, पाच वर्षांत पुलासाठी केवळ खांब उभे राहिले. शेवटी १९९६ मध्ये लोखंडी प्लेट टाकून पुलावरून वाहतूक सुरू झाली. मात्र, दीड वर्षांत त्या लोखंडी प्लेट कोसळल्या. दोन वर्षे पुलाची दुरुस्ती वेळेवर झाली नसल्याने अवघ्या दोन वर्षांत लोखंडी प्लेटचा पूल कोसळला आणि पोसरी नदी पार करण्याचा पर्याय निघून गेला आहे. आता केवळ मानिवली येथे नदीवर पुलाच्या पाच खांबांपैकी दोनच खांब आपले अस्तित्व सांगत आहेत. पूल कोसळल्याने आणि पुन्हा उभा होण्याची स्थिती दिसत नसल्याने नदीच्या पलीकडे शेती असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.आमच्या गावातील शेतकºयांनी शेती करायचीच नाही काय? आणि शेती न करता कसे जगायचे? - गणेश डायरे, शेतकरीअनेक शेतकºयांनी केली शेती बंदमानिवली गावातील ८० टक्के शेती पोसरी नदीच्या पलीकडे आहेत. त्या पेसरी नदीवर पूल नसल्याने मानिवली गावातील शेतकºयांना पावसाळ्यात शेतीची कामे करण्यासाठी मानिवली गावातून वरई आणि पुढे चिकनपाडा गावातून माले होऊन पाषाणे येथे पोहोचावे लागते.हा सर्व फेरा एका वेळी किमान ७ ते ८ किलोमीटरचा असून, शेतीची कामे करण्यासाठी आवश्यक अवजारे घेऊन पायी एवढे अंतर पार करणे कठीण असल्याने, मानिवली गावातील काही शेतकºयांनी आर्थिक कुवत नसल्याने शेतीची कामे करणे थांबविले आहे.त्यामुळे हा पूल होण्यासाठी सर्वांसाठी फायद्याचे असून, मानिवली येथील पुलाच्या निर्मितीसाठी शासकीय पातळीवर कोणीही आवाज उठवताना दिसत नाही. त्याचा परिणाम मानिवली येथे पोसरी नदीवर पूल होणार की नाही? याबाबत शंका येथील शेतकरी उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड