शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

महाडमधील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत;अवकाळी पावसाचाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:03 AM

कोकणात यंदा चांगला पाऊस पडला, मात्र पाऊस लांबल्याने काही ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानेही भातशेतीचे नुकसान झाले.

दासगाव : कोकणात यंदा चांगला पाऊस पडला, मात्र पाऊस लांबल्याने काही ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानेही भातशेतीचे नुकसान झाले. मात्र दोन्ही वेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा हा नाममात्र असल्याने सांगून कार्यालयात बसूनच पंचनामे करण्यात आल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यातही ज्या शेतकºयांनी विमा काढला आहे, त्या शेतकºयांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीला माहितीच नसल्याचे समोर आले आहे.महाड तालुक्यात पावसाळ्यात आलेल्या पुराच्या पाण्याने सखल भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. महाड शहराजवळ असलेल्या सावित्री नदी किनारील गावांपैकी करंजखोल, चांभारखिंड, दासगाव, तर गांधारी किनारील मोहोप्रे, नाते, लाडवली, कोल, कोथेरी, वाळण, बिरवाडी आदी गावात नुकसान होते. पुराचे पाणी शेतात साचून राहिल्याने पीक कुजले. यावेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्हावेत म्हणून शेतकरी मागणी करत होते, मात्र ठरावीक गावातच पंचनामे झाले.जुलै ते आॅगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीमध्ये केवळ १८१ शेतकºयांचे नुकसान पंचनामे करण्यात आले आहेत. या पूरपरिस्थितीमुळे ५१.८४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे अधिकारी सांगत आहेत. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरीत्या हे पंचनामे केले असले तरी अद्याप नुकसानीची भरपाई शासनाकडून शेतकºयांना प्राप्त झालेली नाही.हीच अवस्था नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. अवकाळी पावसाने महाड तालुक्यात भात पिकाचे नुकसान झाले. भात कापणीच्या वेळी पाऊस आल्याने ज्या शेतकºयांनी भात कापले होते, त्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचा पेंढा देखील भिजून गेला. यावेळी देखील कृषी आणि महसूल विभागाने दुर्लक्ष केले. केवळ ३३ शेतकºयांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या कागदावर नोंद करण्यात आली आहे. याबाबत विमा कंपनी देखील स्वतंत्रपणे पंचनामा करणार असल्याचे सांगितले असले तरी ज्या कंपनीचे प्रतिनिधी या विभागात कार्यरत आहेत त्यांना याबाबत माहितीच नाही.पुरातील नुकसानीचे पंचनामे करून पाठवण्यात आले आहेत तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे देखील पंचनामे झाले आहेत. मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही- विजय पांढरे,तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरी