शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

शेतक-यांना ३१ कोटी ५० लाखांचा फटका, भाताला क्विंटलमागे १२० रुपये कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 2:21 AM

रायगड जिल्ह्यातील धान खरेदीसाठी सरकारने तब्बल १ हजार ५५० रुपयांचा हमी भाव जाहीर केला आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील धान खरेदीसाठी सरकारने तब्बल १ हजार ५५० रुपयांचा हमी भाव जाहीर केला आहे. परंतु यावर्षी अद्याप सरकारने बोनस जाहीर न केल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा हमी भाव हा एका क्विंटलमागे १२० रुपयांनी कमी दिला आहे. त्यामुळे तब्बल ३१ कोटी ५० लाख रुपयांचा फटका जिल्ह्यातील शेतकºयांना बसण्याची शक्यता आहे. सरकारने अधिवेशनामध्ये बोनस जाहीर केल्यास शेतकºयांना चांगला दर मिळणार असल्याचे बोलले जाते.जिल्ह्यात एक लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्या माध्यमातून २६ लाख २५ हजार क्विंटल भाताचे उत्पादन होण्याचा कृषी विभागाने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला तर, रायगड जिल्ह्यात ४०६ कोटी ८७ लाख ५० हजार रुपयांची विक्रमी उलाढाल होणार आहे.कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न होण्यासाठी सरकारने जाहीर केलेला एक हजार ५५० रुपयांचा हमी भाव गृहीत धरला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच मालामाल होणार असल्याचे बोलले जाते. केंद्र सरकार देशात सर्वत्र एकच हमी भाव जाहीर करते.गेल्या पाच वर्षांच्या हमीभावावर नजर टाकली असता २०१६-१७ साली सरकारने एक हजार ४७० अधिक २०० रुपये बोनस असा एकूण एक हजार ६७० रुपयांचा हमी भाव दिला होता. त्याचप्रमाणे २०१५-१६ एक हजार ४१० अधिक २५० (१६१० रुपये), २०१४-१५ एक हजार ३५० रुपये, तर २०१३-१४ साली एक हजार २६० अधिक २०० रुपये बोनस (१४६० रुपये) असा दर दिला होता.सरकारने यंदासाठी एक हजार ५५० रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे, मात्र त्यामध्ये बोनस जाहीर केलेला नाही. त्यामध्ये २०० रुपये बोनस जाहीर केला असता तर, एक हजार ७५० रुपये प्रति क्विंटल हमी भाव शेतकºयांना मिळाला असता.सरकारने आतासाठी एक हजार ५५० रुपये हमीभाव दिला आहे. गेल्यावर्षी सरकारने १ हजार ४७० अधिक २०० रुपये बोनस असा एकूण एक हजार ६७० हमी भाव दिला होता. यंदा बोनस जाहीर न केल्याने १२० रुपये प्रतिक्विंटल कमी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकºयांचे चांगलेच आर्थिक नुकसान होणार असल्याचे दिसून येते. रायगड जिल्हा हे पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे त्यानंतर औद्योगिकरणाच्या रेट्यामध्ये ती ओळख आता पुसटशी होत आहे. उद्योगांसाठी जमिनी गेल्याने शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. २०१७-१८ साठी जिल्ह्यात १ लाख ५ हजार हेक्टरवर भाताच्या लागवडीचे क्षेत्र आहे.