शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

कालवणाला तडका महागड्या झणझणीत मसाल्यांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 01:07 IST

मिरच्या महागल्या ; मसाला झाला तिखट

वडखळ : उन्हाचा तडाखा वाढल्याने मसाला बनविण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. पेण, वडखळ, बाजारपेठेत मसाल्याच्या मिरच्या आणि गरम मसाला घेण्यासाठी महिलांची गर्दी वाढत आहे.            

मसाल्यासाठी कर्नाटकहून येणारी बेडगी, काश्मिरी तसेच आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशमधून येणारी गुंटूर आणि महाराष्ट्रातील तेजा मिरचीबरोबर आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या रेशमपट्टी मिरचीलाही मोठी मागणी आहे. महाराष्ट्रातील लोक जास्त प्रमाणात बेगडी, काश्मिरी आणि तेजा मिरचीचा वापर करतात. आगरी , कोळींकडून तिखट मिरचीला तर गुजराती वर्गाकडून कमी तिखट असलेल्या रेशमपट्टीला मोठी मागणी आहे.

सध्या बाजारात सर्वसाधारणपणे मिरचीचे दर १६० ते ३७० रुपये किलो असे आहेत. गेल्यावर्षी हे भाव १३० ते ३२० रुपये किलो होते. त्यामुळे यंदा मिरच्या खरेदी करण्यासाठी खिशाला चाट बसणार आहे. बेडगी मिरची २७० रुपये किलो, घाटी मिरची १६० रुपये किलो, शंकेश्र्वरी मिरची २५० रुपये किलो, काश्मिरी मिरची ३७० रुपये किलो, हळद १६० रुपये किलो, धने १६० रुपये किलो. मसाला करण्यासाठी मिरचीबरोबर गरम मसाल्याचीही मोठी मागणी असते. वर्षभराचा विचार करता गरम मसाल्याचे दरही वाढले आहेत. दालचिनी २१० रुपये किलो, चक्रीफुल २०० रुपये किलो, लवंग ६९० रुपये किलो, काळीमिरि ५७० रुपये किलो, नागकेशर ८५० रुपये किलो, जवादी १३५० रुपये किलो, रामपत्री ६४० रुपये किलो, वेलची १८०० किलो, त्रिफळा १९० रुपये किलो, जायफळ ६७० रुपये किलो , जिरे १७० रुपये किलो, धने १५० ते २०० रुपये किलो, तेजपान ९० रुपये किलो, शाजीरे ५३० रुपये किलो, हळद १२० ते १७० रुपये किलो. मसाल्याबरोबर अख्खी हळकुंड घेवून त्याची पावडर करुन आहारात वापरतात.

घाऊक बाजारात मिरची व मसाल्याच्या पदार्थाचे भाव वाढले आहेत. तसेच वाहतुकीचा खर्चही वाढल्याने किरकोळ बाजारात मिरच्यांचे भाव वाढले आहेत. परंतु, हे भाव स्थिर राहणार असून अजून भाव वाढण्याची शक्यता कमी आहे.- राजेंद्र पाटील, व्यापारी

मसाला रोजच्या आहारातील अविभाज्य घटक असल्याने त्याचे वापरातील प्रमाण कमी -जास्त करता येत नाही. त्यामुळे भाववाढ झाली तरी ते खरेदी करावेच लागतात.- कविता पाटील, गृहणी

 

टॅग्स :Raigadरायगड