शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

पर्यटकांच्या परतीच्या प्रवासामुळे कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 3:09 AM

वाहतूक पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष : बेदरकार वाहनचालकांमुळे महामार्गावर अपघातही वाढले

अलिबाग : दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुण्याकडून रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमध्ये गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील घाटमाथ्यावरील नागमोडी वळणे, अरुंद रस्त्यांचा फारसा परिचय नसलेल्या नवख्या चालकांमुळे परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

अतिवेग, ओव्हरटेक करण्याच्या नादात गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या २१ वाहन अपघातांत तीन मृत्यू, तर ४८ जण जखमी झाले आहेत. वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाहने चालविल्यामुळे,चालक जिल्ह्यातील घाट रस्त्यावर वाहने चालविताना बावरल्याने अनेकदा अपघात होत असल्याचा निष्कर्ष पोलिसांचा आहे. वडखळ पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी मध्यरात्री मुंबईतील पवई येथून अलिबाग येथे कारचालक जात होता. या वेळी पाठीमागून येणाºया कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सार्थक कृष्णा खताळ (८) हा जखमी झाला आहे.सायन-पनवेल महामार्गावर रांगापनवेल : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी गेलेले प्रवासी रविवारी परतीच्या प्रवासाला लागले, त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहनांच्या रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास लांबच लाब रांगा पाहावयास मिळाल्या. खारघर येथून कळंबोलीपर्यंत ही वाहतूककोंडी झाली होती. कोपरा उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडली. त्यामुळे खारघर रेल्वेस्थानक गाठण्यासाठी तासाचा अवधी लागत होता.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRaigadरायगडTrafficवाहतूक कोंडी