शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या स्थलांतरामुळे जिल्ह्यात शाळा पडल्या ओस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 00:17 IST

रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुके आदिवासीबहुल तालुके म्हणून ओळखले जातात.

- विनोद भोईर राबगाव/पाली : रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुके आदिवासीबहुल तालुके म्हणून ओळखले जातात. दऱ्याखोºयात, डोंगराळ जंगलभागात राहणाºयांत आदिवासी, कातकरी, ठाकर समाज बांधवांची लोकसंख्या मोठी आहे. जिल्ह्यात शाळाबाह्य मुले शोधून शाळेत त्यांची १०० टक्के उपस्थिती राहावी यासाठी शासनाने नुकतेच विस्तृत स्वरूपात अभियान राबविले होते; परंतु दुर्गम भागामध्ये राहणाºया आदिवासींच्या स्थलांतरामुळे मात्र आदिवासीबहुल शाळांची पटसंख्या अचानक खाली उतरली आहे. या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.आदिवासी समाजातील लोकांना प्रामुख्याने कातकरी समाजातील लोकांना उदरनिर्वाह चालविण्यासाठी अनेक ठिकाणी स्थलांतर करावे लागते. त्यामुळे साधारण आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत कापणीची कामे आटोपल्यावर हाताला काम नसल्याने हे आदिवासी बांधव कामासाठी आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटकासह महाराष्ट्रातील विविध भागात आपल्या बायका-पोरांसह स्थलांतर करतात. तेथे वीटभट्ट्या, ऊसतोडणी, कोळसा पाडणे, अशी विविध कामे ते करतात. या स्थलांतराचा फटका प्रामुख्याने बसतो तो आदिवासी विद्यार्थ्यांना. आपल्या आईबापासोबत या शाळकरी पोरांना मध्येच आपली शाळा सोडून जावे लागते. मग ते ज्या शाळेत जात असतात तेथील पटसंख्याही आपोआप कमी होते. आदिवासी आणि कातकरवाडीमधील शाळांची परिस्थिती तर अजून भयावह असते. अनेक वेळा रातोरात येथील निम्म्याहून अधिक मुले स्थलांतरित होतात. शाळांची जूनमध्ये १०० टक्के असलेली पटसंख्या आॅक्टोबर नोव्हेंबरमध्ये अचानक अर्ध्यावर येते. वारंवार गैरहजर असलेल्या मुलांना शाळेतून काढता येत नाही. प्रत्येक स्थलांतरित विद्यार्थ्यांची सर्व माहिती दर महिन्याला त्या शाळेतील मुख्याध्यापकांना व शिक्षकांना शिक्षण विभागास पुरवावी लागते. वाडी-वस्तीवर जाऊन त्या मुलांच्या नातेवाईक किंवा शेजारच्यांकडून माहिती घ्यावी लागते. त्यामध्ये गैरहजर राहण्याचे करण, पालक कुठे गेलेत, त्यांचा पत्ता, फोन नंबर घेणे किंवा अगोदरच तशी नोंद करून ठेवणे, स्थलांतराचे कारण, विद्यार्थ्यांचा जनरल रजिस्टर नंबर अशी सर्व प्रकारची माहिती गोळा करावी लागते व महिन्याभराच्या अंतराने त्याला उजाळा द्यावा लागतो. त्यासाठी स्वतंत्र्यरीत्या स्थलांतरित मुलांचे रजिस्टर ठेवावे लागते. या सर्व अतिरिक्त कामाचा भार शिक्षकांवर पडतो. बºयाच वेळेला पालक कुठे गेलेत याची माहिती मिळत नाही. अनेक वेळा दुसºया ठिकाणावरून आलेल्या मुलांना शाळेत सामावून घेऊन त्यांची नोंद कच्च्या हजेरीवर करावी लागते.>मुलांना होतो त्रासशिमगा झाला की मग पुन्हा हे स्थलांतरित आदिवासी लोक आपल्या घरी परततात आणि मुलांना शाळेत आणून सोडतात. आठवीपर्यंत सर्वच मुलांना वरच्या वर्गात घालावे लागत असल्याने नव्याने या मुलांचा अभ्यास शिक्षकांना घ्यावा लागतो; पण त्याचा काही उपयोग होत नाही.या सर्व खटाटोपात स्थलांतरित मुलांची पाटी मात्र कोरीच राहते. हे चक्र मागील अनेक वर्षांपासून असेच सुरू असल्याने शाळाबाह्य मुलांची नियमित शाळेत उपस्थिती राहवी यासाठी नुसती शाळाबाह्य मुले शोधून उपयोग होणार नाही तर काही ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले.आदिवासी आश्रमशाळांमध्ये आदिवासी मुलांच्या राहण्याची व जेवणाची सोय होत असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना तेथे सोडून कामावर जातात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत नाही आणि ते शिक्षणापासून वंचितही राहत नाहीत. शिकण्याच्या प्रगतीतील सगळ्यात मोठा अडसर म्हणजे स्थलांतर आहे. शासनाने आदिवासी समाजातील लोकांना ठोस रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यास स्थलांतराचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि आपोआप शाळाबाह्य मुलांचा प्रश्न आटोक्यात येईल.