शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
2
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
3
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
4
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
5
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
6
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
7
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
8
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
9
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
10
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
11
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
12
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
13
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
14
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
15
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
16
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
17
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
18
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
19
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
20
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खोदकामामुळे महामार्गावरील वीज खांब धोकादायक स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:39 IST

महाड तालुक्यातील केंबुर्ली गावातील एका वळणाचे खोदकाम करताना वीज खांबालगतची माती मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्याने वीज प्रवाह सुरू असलेले तीन खांब महामार्गालगत अधांतरी लटकत आहेत.

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई - गोवा राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी रस्त्यालगतचे विजेचे खांब ठेकेदाराने स्थलांतरित करणे गरजेचे आहे. महाड तालुक्यातील केंबुर्ली गावातील एका वळणाचे खोदकाम करताना वीज खांबालगतची माती मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्याने वीज प्रवाह सुरू असलेले तीन खांब महामार्गालगत अधांतरी लटकत आहेत. हे तीनही खांब कोसळण्याच्या स्थितीत असून अपघाताची शक्यता आहे. शिवाय त्यामुळे परिसरातील पाच हजार ग्राहकांना फटका बसण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गालगतचे गाव तसेच बांधकामांना काही अंतरावर असलेल्या विजेच्या खांबावरून जोडणी करण्यात आली होती. चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीमध्ये हे वीज खांब व वाहिन्या अडथळा निर्माण करत होते. त्यामुळे हे संपादित करण्यात आलेल्या जागेच्या शेवटच्या भागात उभारणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे ठेकेदार कंपनीने बहुतेक ठिकाणी खांब उभारले. मात्र नवीन वीजवाहिन्या अद्याप जोडण्यात आलेल्या नाही.सध्या केंबुर्ली गाव हद्दीत एका वळणावर चौपदरीकरणाच्या कामासाठी रस्ता रुंदीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी खोदकाम झाल्याने पावसाळ्यात दरड कोसळून सरळ सरळ महामार्गावर येऊन कोसळली होती. या दरडीसोबत दोन विजेचे खांब रस्त्यावर येऊन कोसळले होते. महामार्ग पाच तास बंद पडला होता. तर विजेच्या वाहिनीवर असलेले वहूर सेक्शन (विभाग) मधील पाच हजार वीज ग्राहकांना याचा फटका सहन करावा लागला होता. पुन्हा पावसाळ्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. त्या ठिकाणाहून एकूण सहा विजेचे खांब वहूर सेक्शनमधील दासगाव, वहूर, वीर, टोळ,दाभोळ या गावातील पाच हजार ग्राहकांसाठी वीजवाहिनी घेऊन जातात.नवीन करण्यात आलेल्या खोदकामामुळे तीन वीज खांब अधांतरी उभे आहेत. यापुढे ते कधीही कोसळण्याची शक्यता नाक ारता येत नाही. नवीन खांब दुसऱ्या बाजूने उभे करण्यात आले आहेत. मात्र अद्याप जोडणी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात परिसरातील ग्रामस्थांकडून तोंडी अथवा लेखी तक्रारी महावितरणकडे करण्यात आलेल्या आहेत. महावितरण तसेच ठेकेदार कंपनीने पावसाळ्यापूर्वी ही समस्या दूर करावी, अशी सामान्य नागरिकांकडून मागणी केली जात आहे.चौपदरीकरणाच्या वहूर सेक्शन ते पोलादपूर ग्रामीणपर्यंत या कामासाठी ४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून महावितरणने आधुनिक पद्धतीत लाइन टाकून घेत पुढील अनेक वर्षांपर्यंत कोणत्याही तºहेची वीजवाहिन्यांना अडथळा येऊ नये या पद्धतीत ठेकेदार कंपनीकडून काम करून घेण्यास सुरुवात केली. मात्र ठेकेदार कंपनीने ही रक्कम जास्त असून एवढा खर्च अपेक्षित नसल्याचा गवगवा करत महावितरणने सुचविलेल्या कामामध्ये कपात करत ४७ कोटींवरून २९ कोटींवर आणली आहे.- पांडुरंग बोके, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, महावितरण महाड विभाग

टॅग्स :Raigadरायगड