शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

व्यंगमुक्तीमुळे १५९ जणांचे आयुष्य बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:47 IST

विद्रूपता आणणाऱ्या जखमा, हाता-पायांतील वाकडेपणा आदी शारीरिक समस्यांवर ‘प्लास्टिक सर्जरी’करून आयुष्य पुन्हा एकदा नव्याने फुलविता येऊ शकते;

- जयंत धुळपअलिबाग : दुभंगलेले ओठ आणि टाळू, भाजल्याने शरीराच्या दर्शनी भागांवर आणि विशेषत: चेहऱ्यांवर निर्माण झालेले व्रण आणि विद्रूपता आणणाऱ्या जखमा, हाता-पायांतील वाकडेपणा आदी शारीरिक समस्यांवर ‘प्लास्टिक सर्जरी’करून आयुष्य पुन्हा एकदा नव्याने फुलविता येऊ शकते; परंतु ही शस्त्रक्रिया मोठी खर्चिक आणि मुंबई-पुण्या सारख्या शहरातील रुग्णालयातच उपलब्ध असल्याने अल्प उत्पन्नगटातील गरीब माणूस या शस्त्रक्रिया करवून घेण्याचा विचारही करू शकत नाही.ग्रामीण भागातील लोकांमधील व्यंगांची समस्या, मूळ अलिबाग तालुक्यातील सारळ येथील रहिवासी आणि जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांनी जाणली आणि अलिबाग परिसरातच अशा व्यक्तींवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय मोकल यांनी घेतला.डॉ. नितीन मोकल हे मुंबईतील नामांकित बॉम्बे, वाडिया, सुश्रुषा, जी.टी. रुग्णालयासह परदेशातील विविध रुग्णालयांत शस्त्रक्रिया करतात. अलिबागच्या ग्रामीण भागात या शस्त्रक्रिया कुठे कराव्या, हा प्रश्न असतानाच अलिबाग जवळच्या कार्लेखिंड येथील प्रयास रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रवींद्र म्हात्रे यांनी आपले आॅपरेशन थिएटर व संपूर्ण रुग्णालय कर्मचाऱ्यांसह मोफत उपलब्ध करून देण्याचे सामाजिक उत्तरदायित्व निभावले. केवळ प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांनी येऊन शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते कारण या शस्त्रक्रिया करण्याकरिता अन्य शाखांचे डॉक्टर्स गरजेचे असतात, त्याकरिता अलिबागमधील ज्येष्ठ सर्जन डॉ. एस. एन. तिवारी, भूलतज्ज्ञ डॉ. संचिव शेटकार, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाजे, बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक पाटील, डॉ. रवींद्र म्हात्रे, भूलतज्ज्ञ डॉ. सुजाता मोकल, डॉ. शैलेश पालकर यांनी आपली वैद्यकीय साधनसामुग्री व औषधांसह या शस्त्रक्रिया शिबिरात विनामानधन सहभागी होण्याची तयारी दाखवली. त्यामुळे जवळपास १५९ जणांवर ही यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.पहिले संपूर्ण मोफत व्यंगमुक्ती शिबिर प्रयास रुग्णालयात २००९ मध्ये झाले आणि त्यात ग्रामीण भागातील २३ स्त्री-पुरुषांना व्यंगमुक्ती पूर्णत: मोफत प्राप्त होऊन त्यांचे आयुष्य खºया अर्थाने फुलले. त्यानंतर २०१३ मध्ये ३७, २०१६ मध्ये ५३ आणि गेल्या दोन दिवसात झालेल्या शस्त्रक्रिया शिबिरात ४0 ग्रामीण व्यंगग्रस्तांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आणि त्यांच्या आयुष्यात आनंद फुलल्याची माहिती प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांनी दिली आहे.>जन्मत: व्यंगयुक्त अपत्ये जन्मास येऊ नये, याकरिता नवविवाहित दाम्पत्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विवाहानंतर गर्भधारणा व अपत्यप्राप्ती या पूर्वीच्या काळात उभयतांंनी आरोग्य विषयक दक्षता सुयोग्य प्रकारे घेतली पाहिजे. आपल्या शरीरास गरजेच्या नसलेल्या गोष्टी आहार वा व्यसनांतून आपल्या शरीरात जाणार नाहीत याची दक्षता घेतल्यास नवजात अपत्यांतील व्यंग टाळता येऊ शकते.- डॉ. नितीन मोकल, प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ