शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती, लेप्टोस्पायरोसिस, स्वाइनचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 02:20 IST

गेला आठवडाभर पावसाने जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हाहाकार उडवून दिला होता. सतत बरसणाºया पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत होते. आता पाऊस थांबल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : गेला आठवडाभर पावसाने जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हाहाकार उडवून दिला होता. सतत बरसणाºया पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत होते. आता पाऊस थांबल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाणी साठणाºया ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस, तर ऊन पडल्याने स्वाइन फ्लूचा फैलाव होण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. नागरिकांना कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तसेच नेमून दिलेल्या औषधांचा डोस पूर्ण करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी केले आहे.राज्यासह कोकण आणि विशेषत: रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. सातत्याने बरसणाºया पावसाने जिल्ह्यातील २९ पैकी २५ लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असणारी धरणे १०० टक्के भरली. धरणे भरु न वाहत होती. त्याचप्रमाणे सखल भागातील शहरे आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसले होते. पावसाने सर्वत्रच दाणादाण उडवून दिल्याने रस्ते, पूल पाण्यात हरवले होते. पावसाच्या अवकृपेमुळे काही घरांची, गोठ्यांची आणि झाडांची पडझडही मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामध्ये लाखो रु पयांची वित्तहानी झाली. या कालावधीत जिल्हा प्रशासनासह, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा चांगलीच सतर्क झाली होती. पावसाने आता उघडीप दिल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने नागोठणे, रोहे, पाली, पेण, अलिबाग,पनवेल तालुक्यातील काही ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी साठले आहे. तेथील पाण्याचा निचारा तातडीने न झाल्यास लेप्टोस्पायरोसिससारख्या गंभीर आजाराच्या साथीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. तसेच पाऊस थांबल्याने उन्ह पडत आहे. असे वातावरण स्वाइन फ्लूसाठी पोषक आहे. त्यामुळे जिल्ह्यावर या दोन महाभयंकर साथ रोगाचे सावट पसरले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.साथीचे आजार टाळण्यासाठी उपाययोजनादूषित पाण्यामुळे अनेक आजारांची शक्यता असते. हे आजार टाळण्यासाठी पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरावे. शेतावर कामाकरिता जाताना घरून शुध्द पाणी घेऊन जावे. शेतातील नाले, ओढ्याचे व विहिरीतील पाणी पिण्यास वापरु नये. गावातील विहिरींचे शुध्दीकरण जलसुरक्षकांकडून नियमित करु न घ्यावे. नवीन विहिरीचे पाणी शुध्द केल्यावरच सेवन करावे. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. उघड्यावर शौचास बसू नये, लहान मुलांना देखील उघड्यावर शौचास बसवू नये, व्यक्तिगत शौचालय बांधून त्याचा वापर करावा. परिसरातील नाले गटारे साचू नयेत याची दक्षता घ्यावी, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा, घरातील सर्व पाणी, पाण्याने भरलेली भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करु न ती कोरडी करु न घ्यावीत. सांडपाण्यासाठी शोषखड्डा खोदावा, उघड्यावरचे अन्न वा शिळे अन्न खाऊ नये. दूषित मांस व फळे खाऊ नयेत. आजारी व्यक्तींना गरम पाणी द्यावे. अतिसार, थंडी, ताप यासंदर्भातील आजारांवर संबंधित आशा स्वयंसेविका, नर्स, आरोग्य सेवकांकडून उपचार करु न घ्यावा. मात्र उपाय न झाल्यास थेट जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.रु ग्णालयात उपचारासाठी सुविधा उपलब्धनागरिकांनी या आजाराबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. कोणत्याही आजाराची लक्षणे दिल्यास त्यांनी तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करु न घ्यावा. जिल्हा रु ग्णालय प्रशासनाने या दोन्ही गंभीर साथीच्या आजाराची दखल घेतली आहे.त्यानुसार रु ग्णालयात उपचाराच्या सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. खबरदारी त्यातील महत्त्वाचा उपाय असल्याचेही डॉ. गवळी यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यामध्ये अद्याप या आजाराची लक्षणे असलेले रु ग्ण आढळले नाहीत.कोकणातील वातावरण आणि नागरिकांमध्ये या आजारांबाबत असलेली जनजागृती त्यामुळे या आजारांना दूर ठेवता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.1लेप्टोस्पायरोसिस हा जंगली प्राण्यातून पाळीव प्राण्यांमध्ये येतो. त्यानंतर त्यांच्याकडून तो मानवाला होतो. आजघडीला उंदीर आणि घुशी हे लेप्टोस्पायरोसिसचे मुख्य संसर्गस्रोत मानले जातात. आजारामध्ये सौम्य ताप ते तीव्र कावीळ, मूत्रपिंड, फुप्फुसे निकामी होणे यासारख्या गंभीर स्वरु पाच्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.2लेप्टोस्पायरोसिस हा आजार दोन टप्प्यांमध्ये आढळून येतो. पहिल्या टप्प्यात रु ग्णाला अचानक थंडी वाजून तीव्र ताप येतो. डोके दुखते, उजेडात डोळे उघडणे कठीण जाते. डोळ्यांमध्ये तीव्र वेदना होतात. तिसºया, चौथ्या दिवशी डोळ्यांमध्ये रक्त साकळते, रु ग्णाला मळमळ, उलट्या आणि जुलाब होतात, भूक मंदावते, स्नायू, सांधे दुखू लागतात, खोकला आणि दम लागतो, त्वचेवर गोवरसदृश पुरळ उठते.