शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पराभूत उमेदवाराच्या नावाने लिंबू टाकल्याने वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 00:10 IST

माणगावमधील हातकणंगले येथील प्रकार

माणगाव : माणगाव तालुक्यातील हातकणंगले येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही गटांकडून वापरण्यात आलेले अंगारा, नारळ, लिंबूचा प्रकार संपतो ना संपताे तोच पराभूत उमेदवार व समर्थक यांच्या नावाने लिंबू प्रभागात टाकल्याने हे प्रकरण हातघाईवर आले.येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवाराचा पराभव व्हावा या हेतूने येथील दोन्ही गटांकडील उमेदवारांनी यंत्र तंत्र, भानामती, उमेदवाराच्या दारात लिंबू कापून टाकणे, नारळ फोडणे, गावाभर तांदूळ फेकणे, गल्लीबोळात अंगारा टाकणे असे प्रकार झाले असून ज्या उमेदवारांच्या नावाने भानामती करण्यात आली होती त्याच्यातून उतराई होण्यासाठी येथील एका गल्लीत पराभव झालेल्या उमेदवार व त्याचे समर्थक यांच्या नावाने लिंबू कापून फेकण्यात आले होते, हा प्रकार प्रभागात समजताच महिला भयभीत होऊन शिव्यांची लाखोली वाहू लागल्या. यामध्ये संशयित व्यक्तीच्या नावाने शिव्या दिल्याने त्याचे रूपांतर वादात झाले. वाद विकोपास जाताच दोन्ही गटांकडील नागरिक एकत्रित आल्याने बाचाबाची व हातघाईवर प्रकरण आले. दरम्यान, या ठिकाणी ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांच्या समझोत्याने व हातकणंगले पोलीस स्टेशनचे अधिकारी येताच येथील वाद मिटविण्यात आले.लज्जास्पद प्रकार, ग्रामस्थांचे मतमाणगाव या गावामध्ये प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तांदूळ, अंगारा, लिंबू कापून टाकणे, उमेदवारांच्या दारात मध्यान्ह रात्री नारळ फोडणे हे प्रकार अंधश्रद्धेतून केले जातात. गावात उमेदवाराच्या समक्ष हा प्रकार करणारी यंत्रणा असून माणगाव हे गाव पुरोगामी विचारांचे व शंभर टक्के सुशिक्षित तसेच शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे असून या गावात हे प्रकार म्हणजे लज्जास्पद असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.