शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चर्चा; शेकापच्या आंदोलनानंतर नगरसेवकांना जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 11:02 PM

खारघरवासीयांच्या त्रासाबाबत सिडको अधिकाऱ्यांना विचारला जाब

पनवेल : खारघर शहरात पाणीसमस्येमुळे त्रस्त नागरिकांनी शेकापच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी सिडको कार्यालयावर मोर्चा काढला होता. स्थानिक नगरसेवकांकडून पाणीसमस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या वेळी रहिवाशांनी केल्यानंतर गुरुवारी परिसरातील भाजपच्या नगरसेवकांनी सिडकोच्या पाणीपुरवठा अधिकाºयाची भेट घेतली आणि वर्षभर भेडसावणाºया या समस्येवर कामयस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली.

शहरात सुमारे १५ एमएलडी पाण्याचा तुडवडा भासत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. यावर उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आले असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. याविरोधात शेकापने सिडकोच्या विभागीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले होते.

शहरातील रहिवासी शेकडोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. विधानसभेसाठी शेकापचे उमेदवार असलेले हरेश केणी हेदेखील आंदोलनात सहभागी झाले होते. सिडको अधिकाऱ्यांमार्फत केवळ चालढकल केली जात असल्याने केणी यांनी सिडकोचे मुख्य पाणीपुरवठा अधिकारी पी. बी. काळे यांना जाब विचारला.

मोर्चात रहिवाशांनी सत्ताधारी नगरसेवकांविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यांच्याकडून पाणीसमस्येवर योग्य पाठपुरावा केला जात नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे होते. गुरुवारी खारघरमधील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी गजानन दलाल यांची भेट घेतली व शहरातील पाणीसमस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली. शिष्टमंडळात शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नगरसेवक नीलेश बाविस्कर, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, प्रभाकर जोशी, गीता चौधरी, प्रभाकर जोशी, भूषण पाटील, दिलीप जाधव उपस्थित होते.

खारघर शहराला ७५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, शहरात केवळ ६० एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याने सेक्टर ११, १२, २१, ३६, १० आदी ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा होतो. यासंदर्भात शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पाणीपुरवठा कधी सुरळीत होईल, यासंदर्भात लेखी उत्तर देण्याची विनंती पटेल यांनी पाणीपुरवठा अधिकारी दलाल यांच्याकडे केली आहे. 

टॅग्स :Waterपाणी