शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाने अडचण; सर्वसामान्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 22:52 IST

ग्रामसेवकांच्या संपाचा २० वा दिवस; प्रशासकीय कामे खोळंबली

पेण : तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला होणारी विकासकामे खोळंबली असून, आचारसंहितेची घोषणा येत्या दोन-चार दिवसांत कधीही होऊ शकते. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत सांगितलेही आहे. अशा परिस्थितीत शासकीय कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, संगणक परिचालक आदी विभागाचे कर्मचारी संपावर गेल्याने सर्वसामान्यांची कामे गेल्या २० दिवसांपासून खोळंबली आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमधील होणारी विकासकामे निवडणूक आचारसंहितेच्या बडग्यात अडकल्यास नोव्हेंबर महिना उजाडेपर्यंत या कामांना विलंब लागणार आहे, असे एकंदर चित्र दिसत आहे. पेण तालुक्यात ६४ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक २२ आॅगस्टपासून बेमुदत संपावर गेल्याने २० दिवस ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ग्रामसेवक अभावी दररोज ग्रामपंचायतीमध्ये खेटे मारावे लागत असून ग्रामसेवकच नसल्याने रिकाम्या हातांनी परतावे लागत आहे.

महसूल विभागातसुद्धा तलाठ्यांनी राज्य कर्मचारी संपाला बाहेरून पाठिंबा दिल्याने आपत्कालीन परिस्थितीत कामे वगळता इतर कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे. शिक्षकांचीसुद्धा हीच परिस्थिती असून शालेय शिक्षण विभाग विद्यार्थिवर्गाला त्यांचे दैनंदिन पाठ शिक विण्यासाठी शिक्षकाअभावी वर्गात विद्यार्थी नुसते बसत आहेत. शिक्षकांचा या संपात सहभाग असल्याने शिक्षण विभागसुद्धा याबाबत काहीच करू शकलेला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायत व महसूल मंडळात ग्रामस्थांची कामे होत नसल्याने या कर्मचाºयांच्या संपामुळे सर्वच विभागात कामकाजावर मोठा परिणाम दिसून येत आहे. यामुळे शेतकºयांमध्ये मोठी नाराजी दिसत आहे. गतिमान सरकारची संकल्पना राबविणाºया राज्य शासनाला या कर्मचाºयांच्या संपावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक असून जनतेचीच कामे होत नसल्याने सर्वसामान्य जनता कर्मचाºयांच्या संपामुळे कामे ठप्प झाल्याने वैतागली आहे. या संपावर तोडगा न निघाल्यास नागरिकांच्या रोषाचा सामना येत्या निवडणुकीत करावा लागणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार