शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

डिझेलचे दर घटले तरी सागरी प्रवास महागच, प्रवाशांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 02:59 IST

प्रवाशांमध्ये नाराजी : दरवाढ कमी करण्याची मागणी

आविष्कार देसाईअलिबाग : सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. सरकारने गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी केल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. मात्र, सागरी प्रवासी वाहतुकीचे वाढलेले दर कमी न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर मध्यंतरी वाढले होते. त्यामुळे सागरी प्रवासी सेवेच्या तिकीटदरामध्ये वाढ करण्यात आली होती. आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याने सागरी प्रवासी सेवेच्या तिकीट दरांमध्ये संबंधित सेवा पुरवणाºया संस्थांनी कपात करावी, अशी मागणी जोर धरत आहे.अलिबाग हे पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण झाले आहे. राज्यभरातून बाराही महिने कमी-अधिक प्रमाणात पर्यटकांचा ओघ सुरूच असतो. अन्य देशातील पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. आंतरराष्ट्रीय पर्यटक मुंबईमार्गे अलिबागमध्ये प्रवेश करतात. पैकी बहुतांश पर्यटक सागरी मार्गाला पसंती देतात. सागरी मार्गामुळे पैशासह वेळेचीही बचत होते. मुंबई-गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा असा सागरी प्रवास आणि तेथून पुढे मांडवा ते अलिबाग अशा रस्ते प्रवासाची (बसने) सुविधा आहे. पीएनपी, मालदार आणि अजंठा या संस्था प्रामुख्याने ही सेवा पुरवण्याचे काम करतात. मोठ्या संख्येने पर्यटकांची ने-आण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.च्सुरुवातीला या सेवा स्वस्त होत्या, कालांतराने पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने या सेवेच्या तिकीट दरामध्ये वाढ होत गेली. मध्यंतरी पेट्रोल-डिझेलच्या दराने उसळी मारली.सागरी प्रवास हा स्वस्त व चांगला पर्याय आहे, परंतु तो आता महाग होत आहे. डिझेल स्वस्त झाल्याने तिकिटांचे दर कमी झालेच पाहिजेत. त्याचबरोबर बोट सेवांना परवानगी मेरीटाइम बोर्ड देते, तसेच करही तेच वसूल करतात. मात्र, तिकिटाचे दर ठरवण्याचा अधिकार हा मुंबई पोर्ट ट्रस्टला आहे. यामध्ये सुसूत्रता आली पाहिजे.- संजय सावंत,आरटीआय कार्यकर्तेडिझेलचा दर हा ७९ प्रतिलीटर रुपयांवर गेल्यामुळे सागरी सेवा पुरवणाºया बोट संस्थांनी आपल्या फेरी सेवेच्या दरामध्ये सुमारे १५ ते २० रुपयांची वाढ केली. दरामध्ये वाढ करताना ती लगेचच केली नसल्याचे कारण संस्थांनी दिले होते. आता मात्र डिझेलचे दर हे ६५ प्रतिलीटर रुपयांवर आले आहेत. त्यानुसार आता संस्थांनी फेरीसेवेच्या तिकीट दरामध्ये कपात करावी.- दिलीप जोग, अध्यक्ष,वेलफेअर असोसिएशन फॉर पॅसेंजर आॅफ कोकणतिकिटांचे दर ठरवण्याचा अधिकार हा मुंबई पोर्ट ट्रस्टकडे आहे, असे मेरीटाइम बोर्डाचे अनिल शिंदे यांनी सांगितले.अपघातात दिली जात नाही नुकसानभरपाईच्मांडवा-गेटवे आॅफ इंडिया फेरी सेवा देणाºया मांडवा ते अलिबाग अशी बससेवा मोफत देतात. त्या बसला अपघात झाल्यास प्रवाशांना कोणतीच नुकसान भरपाई देण्यात येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.च्तिकिटाचे दर ठरवताना आॅपरेटर / व्हेसलचे तिकीट दर ठरवताना त्यामध्ये बोटीची किंमत, अश्वशक्ती-इंजिन, डिझेलचा होणारा वापर, आसन व्यवस्था, एसीसारखी अन्य सुविधांचा विचार करून ठरवावा, याकडेही जोग यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Raigadरायगड