शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

धामणी दीड महिन्यापासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:23 IST

धरणाची सुरक्षा धोक्यात : जलसंपदा विभागाने बिल थकवल्याने महावितरणची कारवाई

-  शशिकांत ठाकूर 

कासा : जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सुर्या प्रकल्पातील धामणी धरणवीज बिल थकल्याने दीड महिन्यापासून अंधारात आहे. त्यामुळे कासा भागात सतत भूकंप होत असताना धरणाची सुरक्षा वाºयावर आहे.

जलसंपदा विभागाने थकीत फरक वीज बिल न भरल्याने ३ जानेवारी पासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. आॅक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत धामणी धरणावरील विद्युत मीटरील मिटरिंग युनिट मध्ये बिघाड होता. ते लोड देऊन त्याचे दोन किट फोलटी असलेले बदलले. या काळात जलसंपदा विभागाने त्यांना सरासरी अंदाजे मासिक वीज बिल दिले जात होते व ते भरलेही होते. मात्र, सप्टेंबरमध्ये मिटरिंग युनिट व्यवस्था सुरळीत झाल्याने सदर काळात अधिक वापर केलेल्या युनिटचे दोन वर्षाच्या फरक बिलासह जलसंपदा विभागास आॅक्टोबर २०१८ या महिन्यात ९ लाख ७६ हजार वीजबिल पाठविले त्यांपैकी २ लाख ४८ हजार वीजबिल भरले.

परंतु सर्वच फरक न भरल्याने पुढील नोव्हेंबरमध्ये ७ लाख ७२ हजार, डिसेंबर ८ लाख २३ हजार आणि जानेवारी महिन्यात ८ लाख ५६ हजार पाठवले. या मध्ये तीन महिन्याचे २ लाख ५६ हजार व ६ लाख फरक होते. त्यातच थकीत बिल न भरल्याने ३ जानेवारीला वीजपुरवठा खंडित केला. परंतू याबाबत जलसंपदा विभागाकडे विचारणा केली असता आम्हाला प्रत्येक मिहन्याला साधारण १ हजार युनिटसह पावसाळा वगळता ३५ ते ४० हजार दिले जात होते मात्र मिटरिंग युनिट फोलटी मुळे दोन वर्षांचे फरक बिल एकदाच आॅक्टोबर ६५ हजार ८९३ युनिटसह ९ लाख ७६ हजार दिले. त्यास वरिष्ठ पातळीवर मंजुरी लगेच कशी मिळेल. त्याचा मंजुरी साठी प्रस्ताव पाठवला आहे.

यातील धक्कादायक बाब म्हणजे धरण परिसरतील कासा जवळपास गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत. याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन एकीकडे नागरिकांच्या सुरक्षेची हमी देत असताना जलसंपदा विभागातील अधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणामुळे धामणी धरण गेल्या दीड महिन्या पासून अंधारात आहे. धरणाच्या ठिकाणी पोलिस व जलसंपदा विभागाचे कर्मचारी असले तरी वीज नसल्याने अंधारात हलचालींवर लक्ष ठेवणे कठीण बनले आहे.

धोकादायक परिस्थितीया धरणातून उन्हाळ्यात डहाणू, पालघर व विक्र मगड तालुक्यातील सुमारे १०० गावांना कालव्याअंतर्गत शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच वसई विरार महापालिका, तारापूर टैप्स, तारापूर एमआयडीसी, रिलायन्स थर्मल पावर डहाणू, पालघर नगरपालिका, डहाणू नगरपालिका आदी ठिकाणी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.च्यातून जलसंपदा विभागाला दरवर्षी साधारणपणे १८ कोटीं रुपयांचा सिंचन महसूल मिळतो. तसेच, शेती सिंचनातून वर्षापोटी पाच लाख रुपयांचा शेती सिंचन महसूल जमा होतो. एवढे उत्पन्न मिळत असून देखील थकित बील अभावी धरणावर दीड महिन्यापासून अंधार आहे व सरकारचे दुर्लक्ष आहे.

धामणी धरणावरी वीज बिल थकीत आहे. ते थकीत व चालू वीज बिल भरल्यानंतर तात्काळ वीजपुरवठा सुरू केला जाईल.- किरण नागावकरअधीक्षक अभियंता वीज वितरण पालघरधरणाची सुरिक्षतता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडून वीज बिलासाठी निधी उपलब्ध झाला असून सोमवारी महावितरणकडे अदा केला जाईल व धरणावरील वीज सुरू होईल.- निलेश दुसाने, कार्यकारी अभियंता सुर्या प्रकल्प

टॅग्स :Damधरणelectricityवीज