शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

धामणी दीड महिन्यापासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:23 IST

धरणाची सुरक्षा धोक्यात : जलसंपदा विभागाने बिल थकवल्याने महावितरणची कारवाई

-  शशिकांत ठाकूर 

कासा : जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सुर्या प्रकल्पातील धामणी धरणवीज बिल थकल्याने दीड महिन्यापासून अंधारात आहे. त्यामुळे कासा भागात सतत भूकंप होत असताना धरणाची सुरक्षा वाºयावर आहे.

जलसंपदा विभागाने थकीत फरक वीज बिल न भरल्याने ३ जानेवारी पासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. आॅक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत धामणी धरणावरील विद्युत मीटरील मिटरिंग युनिट मध्ये बिघाड होता. ते लोड देऊन त्याचे दोन किट फोलटी असलेले बदलले. या काळात जलसंपदा विभागाने त्यांना सरासरी अंदाजे मासिक वीज बिल दिले जात होते व ते भरलेही होते. मात्र, सप्टेंबरमध्ये मिटरिंग युनिट व्यवस्था सुरळीत झाल्याने सदर काळात अधिक वापर केलेल्या युनिटचे दोन वर्षाच्या फरक बिलासह जलसंपदा विभागास आॅक्टोबर २०१८ या महिन्यात ९ लाख ७६ हजार वीजबिल पाठविले त्यांपैकी २ लाख ४८ हजार वीजबिल भरले.

परंतु सर्वच फरक न भरल्याने पुढील नोव्हेंबरमध्ये ७ लाख ७२ हजार, डिसेंबर ८ लाख २३ हजार आणि जानेवारी महिन्यात ८ लाख ५६ हजार पाठवले. या मध्ये तीन महिन्याचे २ लाख ५६ हजार व ६ लाख फरक होते. त्यातच थकीत बिल न भरल्याने ३ जानेवारीला वीजपुरवठा खंडित केला. परंतू याबाबत जलसंपदा विभागाकडे विचारणा केली असता आम्हाला प्रत्येक मिहन्याला साधारण १ हजार युनिटसह पावसाळा वगळता ३५ ते ४० हजार दिले जात होते मात्र मिटरिंग युनिट फोलटी मुळे दोन वर्षांचे फरक बिल एकदाच आॅक्टोबर ६५ हजार ८९३ युनिटसह ९ लाख ७६ हजार दिले. त्यास वरिष्ठ पातळीवर मंजुरी लगेच कशी मिळेल. त्याचा मंजुरी साठी प्रस्ताव पाठवला आहे.

यातील धक्कादायक बाब म्हणजे धरण परिसरतील कासा जवळपास गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत. याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन एकीकडे नागरिकांच्या सुरक्षेची हमी देत असताना जलसंपदा विभागातील अधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणामुळे धामणी धरण गेल्या दीड महिन्या पासून अंधारात आहे. धरणाच्या ठिकाणी पोलिस व जलसंपदा विभागाचे कर्मचारी असले तरी वीज नसल्याने अंधारात हलचालींवर लक्ष ठेवणे कठीण बनले आहे.

धोकादायक परिस्थितीया धरणातून उन्हाळ्यात डहाणू, पालघर व विक्र मगड तालुक्यातील सुमारे १०० गावांना कालव्याअंतर्गत शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच वसई विरार महापालिका, तारापूर टैप्स, तारापूर एमआयडीसी, रिलायन्स थर्मल पावर डहाणू, पालघर नगरपालिका, डहाणू नगरपालिका आदी ठिकाणी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.च्यातून जलसंपदा विभागाला दरवर्षी साधारणपणे १८ कोटीं रुपयांचा सिंचन महसूल मिळतो. तसेच, शेती सिंचनातून वर्षापोटी पाच लाख रुपयांचा शेती सिंचन महसूल जमा होतो. एवढे उत्पन्न मिळत असून देखील थकित बील अभावी धरणावर दीड महिन्यापासून अंधार आहे व सरकारचे दुर्लक्ष आहे.

धामणी धरणावरी वीज बिल थकीत आहे. ते थकीत व चालू वीज बिल भरल्यानंतर तात्काळ वीजपुरवठा सुरू केला जाईल.- किरण नागावकरअधीक्षक अभियंता वीज वितरण पालघरधरणाची सुरिक्षतता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडून वीज बिलासाठी निधी उपलब्ध झाला असून सोमवारी महावितरणकडे अदा केला जाईल व धरणावरील वीज सुरू होईल.- निलेश दुसाने, कार्यकारी अभियंता सुर्या प्रकल्प

टॅग्स :Damधरणelectricityवीज