शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

'कोकणचा विकास हवा असेल तर पक्षभेद विसरा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 23:47 IST

‘कोकण आज आणि उद्या’ परिसंवाद; प्रमुख राजकीय नेत्यांचे एकमत

अलिबाग : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय उदासीनता यामुळे कोकणचा कॅलिफोर्निया आजतागायत होऊ शकला नाही. परिणामी सर्वपक्षीयांनी राजकारण विसरून विकासाच्या मुद्यावर एकत्र यायला हवे असा विविध राजकीय पक्षांच्या नेत्याचा एक सूर गुरुवारी संध्याकाळी ‘कोकण आज आणि उद्या’ या परिसंवादात ऐकायला मिळाला. लायन्स अलिबाग फेस्टिव्हल मध्ये ‘कोकण आज आणि उद्या’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात परिवहन मंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते, भाजपा नेते मधू चव्हाण, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे आणि शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील सहभागी झाले होते. ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. परिसवांदात काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई उपस्थित राहाणार होते, मात्र ते उपस्थित राहू शकले नाहीत.शेजारच्या गोवा राज्याची संपूर्ण अर्थव्यवस्था समुद्र आणि त्यावर आधारित पर्यटनावर आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात रासायनिक प्रकल्प आणण्याऐवजी पर्यटनपूरक उद्योग आणणे गरजे असल्याचे एकमत सर्वपक्षीय नेत्यांचे झाले. कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा कित्येक वर्षे कोकणवासीय ऐकत आहेत. मात्र कोकणवासीयांना हवा असलेला विकास कधी झाला नाही. यास काही प्रमाणात राजकीय नेतृत्वांचा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नकारात्मक दृष्टीकोन कारणीभूत ठरला असल्याचे यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी लावला.मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होवून तो कोकणवासीयांच्या सेवेत नेमका कधी रुजू होणार अशा प्रश्न गाडगीळ यांनी विचारल्यावर बहुतेक सर्व पक्षप्रतिनिधींनी गोवा महामार्गाच्या कामाच्या विलंबास प्रशासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचे नमूद केले. पर्यावरण विभाग आणि भूसंपादन यांच्या अडचणी त्यास कारणीभूत ठरल्या आहेत. आजही पहिल्या टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही असे मत दिवाकर रावते यांनी व्यक्त केले. रस्त्यावर होणाºया वाहतुकीची क्षमता लक्षात घेऊ न कोकणातील रस्ते विकसित व्हायला पाहिजेत असा मुद्दा आ.जयंत पाटील यांनी मांडला. मधू चव्हाण यांनी रस्त्यासाठी तोडण्यात आलेली झाडे पुन्हा लावली गेली पाहिजेत अशी भूमिका मांडली. कंत्राटदाराचे अपयश हे देखील महामार्गाचे काम रखडण्यामागचे कारण असल्याचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला.कोकण रेल्वेचे दुपदरीकरण गरजेचेकोकण रेल्वेचे दुपदरीकरण गरजेचे आहे. दुपदरीकरण झाले तर कोकणातील लोकांना रेल्वेचा अधिक फायदा मिळू शकेल. डेक्कन ओडीसी सारख्या पर्यटन गाड्या अधिक प्रमाणात सुरू करता येतील अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली. सुरेश प्रभू यांचे रेल्वे मंत्रीपद गेल्याने कोकण रेल्वेच्या विकासाला खीळ बसली, ते अजून काही काळ रेल्वे मंत्री असते तर कोकण रेल्वेचे सर्व प्रश्न मार्गी लावले असते, अशी भूमिका दिवाकर रावते यांनी मांडलीे. कोकणातील समुद्र संरक्षक खारबंदिस्ती फुटून शेतकºयांच्या शेतजमिनींचे नुकसान झाले आहे, त्या शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यास दिली असल्याचे रावते यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.कोकणातच सर्वाधिक उत्तरदायित्व निधीराज्याच्या कोणत्याही महसूल विभागात नाहीत इतके कारखाने एकट्या कोकणात आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्वाधिक सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) निर्माण होतो. मात्र हा निधी कोकणातील विकासात वापरला जात नसल्याच्या मुद्यावर तटकरे यांनी सहमती दर्शवून हा निधी कोकणातच वापरला जावा याकरिता कोकणातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे नमुद केले. या बरोबरच कोकणातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, सीआरझेड, जलप्रवासी वाहतूक यासारख्या विविध कळीच्या मुद्द्यावर राजकारण विसरून एकत्र येणे गरजेचे असल्याचे मतही अखेरीस सर्वांनीच व्यक्त केले.

 

टॅग्स :konkanकोकणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण