शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

ठाम निर्धाराने चाकरमानी तरुणांना गवसली भविष्याची वाट; अथक प्रयत्नाने साकारले शेततळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 00:06 IST

लहूळसे येथील माळरानावर फु लवणार नंदनवन; शेती करण्याचा निर्णय

प्रकाश कदम 

पोलादपूर : लॉकडाऊनमधून काही तरुण मुंबईहून आपल्या गावी आले. मात्र, आता पुढे काय? हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे होता. न डगमगता त्यांनी काही अनुभवी, ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला घेतला आणि त्यांना त्यांचे भविष्य समजले. या दोन तरुणांनी आपल्या लहूळसे गावात आपल्याच पडीक जमिनीत कृषीच्या योजनांचा वापर करून शेतीचे नंदनवन करण्याचा निधार केले आणि ते कामाला लागले.२२ वर्षांचा तरुण विजय रिंगे आणि त्याला समर्थपणे साथ देणारा योगेश रिंगे या दोन तरुणांनी एकत्र येऊन मागेल त्याला शेततळे या योजनेचा फायदा घेऊन आजोबा-पणजोबांची शंभर वर्ष जुनी शेती जी कधीही वापरात नव्हती, त्या जमिनीत शेततळे केले.या पाण्याच्या जोरावर पुढे दहा एकरावर शेती करण्याचा निणय या तरु णांनी घेतला आहे.

शेती आणि आजची पिढी यांचा संबंध फारच कमी. आज कोणीही शेती करण्यास तयार होत नाही. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे शेतीला तरुणांकडून पसंती दिली जात आहे. तर यात भविष्यही पाहिले जात आहे. यामुळे नक्कीच शेती व्यवसायला नवी उभारी मिळेल. हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली विजय रिंगे आणि योगेश रिंगे या दोन तरुणांना पुढील वाटचालीचा माग मिळाला आहे. शेत तळ्यातील पाण्यावर सुमारे दहा एकर जमिनीमध्ये हळद हरभरा, भुईमूग ही पिके घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांना गावातील धर्मेश रिंगे, भरत रिंगे, बाबू रिंगे आदी शेतकऱ्यांची साथ मिळत आहे. तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, कृषी सहायक पूनम क्षीरसागर सर्वांचे मार्गदर्शन घेऊन पिवळं सोनं पिकवण्याचा ठाम निर्धार आहे. योगेश रिंगे विजय रिंगे यांसारख्या तरुणांनी लॉकडाऊनमध्ये हातावर हात ठेवून गप्प न बसता, मोठ्या प्रयत्नाने साहित्याची जमवाजमव करून शेततळे उभे केले.कोकणातील साºया तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. वेळेचा सदुपयोग कसा करायचा, त्यातून गावातील तरुण कसा फायदा घेता येईल, याचा एक आदर्श पाठ या तरुणांनी घालून दिला आहे.शंभर वर्षांत जे जमलं नाही, ते एका महिन्यात झालेलहूळसे गाव हे महाबळेश्वरच्या पायथ्याशी सावित्री नदीच्या उगम स्थानी पोलादपूर तालुक्यातील प्रथम गाव. उन्हाळ्यात या गावाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सतत भेडसावत असतो, तरीही काही तरुणांनी एकत्र येऊन हा शाश्वत शेतीचा उपक्रम हाती घेतला आहे. देवळे ग्रामपंचायतीच्या वतीने सेंद्रिय शेती गट अगोदरच अस्तित्वात आहे, त्याचाही फायदा मिळणार आहे. गेली १०० वर्षे पडीक असणारी शेतीही यंदापासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे माळरान हिरवेगार झाले असून, या तरु णांनी जवळपास एका महिन्यातच हे काम करून दाखवलं.

टॅग्स :Raigadरायगड