‘कर्जत-कल्याण’ गतिरोधक काढले

By Admin | Updated: June 21, 2016 01:31 IST2016-06-21T01:31:52+5:302016-06-21T01:31:52+5:30

कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले. देशातील सर्व राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये करण्यात आले

'Debt-welfare' speed restriction removed | ‘कर्जत-कल्याण’ गतिरोधक काढले

‘कर्जत-कल्याण’ गतिरोधक काढले

कर्जत : कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले. देशातील सर्व राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हावा असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे या महामार्गावरील सर्व गतिरोधक नेरळ पोलिसांच्या आक्र मक भूमिकेमुळे काढले जात आहेत. या महामार्गावर आजही काही ठिकाणी गरजेपेक्षा अधिक गतिरोधक आहेत, ते काढण्यात येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोट्यवधी रु पये खर्चून कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्यात आल्यानंतर डांबरीकरण होत असताना या रस्त्यावर अनेक गावकऱ्यांच्या आग्रहामुळे गतिरोधक टाकले गेले. तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे भरताना ठेकेदाराच्या डांबराच्या गाड्या आल्यानंतर अनेक ठिकाणी ठेकेदारावर दबाव टाकून गतिरोधक रस्त्यावर टाकून घेतले. अनेक ठिकाणी गरज नसताना टाकलेल्या गतिरोधकांमुळे अनेक दुचाकींना अपघात झाले आणि काहींचे यात बळी गेले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी स्वत: जेसीबी मशीन घेऊन गतिरोधक काढून टाकण्यास सुरु वात केली. त्याचवेळी वारंवार होणारे अपघात यामुळे पोलीस प्रशासन देखील कामाला लागले होते.
नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शालिग्राम पाटील यांना रस्त्यावरील गतिरोधक यांचा मुद्दा स्पष्ट करीत या दोन्ही अधिकाऱ्यांनी कल्याण-कर्जत रस्त्यावरील गतिरोधकांची पाहणी केली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला सर्व गतिरोधक न काढल्यास यापुढील रस्ते अपघाताचे सर्व गुन्हे दाखल करण्यात येतील असे सुनावले. ठेकेदाराने गतिरोधक काढायला गेल्यास ग्रामस्थ कामगारांना मारहाण करतात असे स्पष्टीकरण दिले. त्यावेळी नेरळ पोलिसांनी बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात सर्व गतिरोधक काढण्यास सुरु वात झाली. थेट कर्जतपर्यंत गतिरोधक काढून टाकण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी शाळा आणि गावे याची गरज म्हणून तेथे गतिरोधक कायम ठेवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हिसका दाखवून पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनधिकृतपणे टाकण्यात आलेले गतिरोधक काढल्याने वाहनचालकांना हायसे वाटत आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी जास्त गतिरोधक आहेत, त्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)

Web Title: 'Debt-welfare' speed restriction removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.