शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा, वडपाले गावातील स्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 07:06 IST

राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. मात्र, तरीही उन्हाळ्यात या परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवते. रायगड जिल्ह्यातील अनेक गावे सध्या पाणीटंचाईने व्याकूळ झाली आहेत. माणगाव तालुकाही याला अपवाद नाही. तालुक्यातील वडपाले गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. मात्र, तरीही उन्हाळ्यात या परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवते. रायगड जिल्ह्यातील अनेक गावे सध्या पाणीटंचाईने व्याकूळ झाली आहेत. माणगाव तालुकाही याला अपवाद नाही. तालुक्यातील वडपाले गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.मुंबई-गोवा महामार्गावर वडपाले गाव वसले असून, गावात जवळपास २०० घरे असून हजार ते अकराशे लोकसंख्या आहे. या गावातील अनेक पिढ्यांचा वेळ पाणी भरण्यातच गेला आहे. कारण गेल्या ७० वर्षांत गावात एकही पाणी योजना पोहोचलेली नाही. लहान मुलांपासून त्यांच्या आजीपासून सर्व जण हंडा घेऊन मैलोन्मैल पायपीट करीत असल्याचे दृश्य सध्या गावात पाहायला मिळत आहे.जानेवारी महिना उजाडला की, गावातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. घरात लहान मुले, वयोवृद्ध असले तरी पाण्यासाठी सर्वांचीच ससेहोलपट होताना दिसते. गावातील मुलांच्या शिक्षणाकडेही अनेकदा दुर्लक्ष होते. कारण एकच, पाणी!पाणी आणण्यासाठी गावातील लोकांना कायम वर्दळीचा असलेला मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्ग ओलांडून जावे लागते. त्यानंतर पुढे असलेल्या कोकण रेल्वेमार्गावरून पायपीट करावी लागते. या ठिकाणी रेल्वे फाटक असले तर कायम भीतीच्या छायेतच पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो.निवडणुका आल्या की, या गावात खासदार, आमदार, नेते मंडळी येतात. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पक्षांचे नेते येतात आणि आश्वासन देतात. महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरणार असल्याची खोटी आश्वासने देतात. मात्र, गेल्या ७० वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीने गावात नळपाणी योजना आणण्यासाठी प्रयत्न केलेले दिसत नाहीत. त्यामुळे आता गावातील लोक स्थलांतराच्या विचारात आहेत.२५ वर्षांपूर्वी गावात गोरेगाव-देवळी ३२ गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, या योजनेतील शेवटचे गाव वडपाले. त्यामुळे कधी भारनियमन, तर कधी जलवाहिनी फुटली, तर कधी कुठे वॉलला गळती लागल्याने गावात पाणी कधी पोहोचलेच नाही. पाण्याच्या मागे धावण्यात आयुष्य गेले मात्र अजूनही ग्रामस्थांची पिण्याची पाण्याची प्रतीक्षा संपलेली नाही.गेल्या ३० वर्षांपासून दुपार, असो वा सायंकाळ, दोन ते तीन कि.मी. पायपीट करून पाणी भरावे लागते. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. भर दुपारी, रात्री घरकामातून वेळ मिळेल, तेव्हा पाण्याच्या मागे धावावे लागते, त्यामुळे गावातील महिला वारंवार आजारी पडत आहेत. निवडणुका आल्या की नेतेमंडळी येतात आणि खोटी आश्वासने देतात.- शांता मनवे,स्थानिक महिला१२ वर्षांची असताना लग्न होऊन या गावात आले. आज त्यालाही ७० वर्षे झाली. या ७० वर्षांत पाण्यासाठी काय हाल झाले ते आमचे आम्हालाच माहीत. हायवे आणि रेल्वे फाटक पार करून रात्र असो वा दिवस, आम्हाला पाणी आणावे लागते. अख्खे आयुष्य पाण्यामागे गेले आहे.- पार्वतीबाई शिंदे,स्थानिक वृद्ध महिला

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRaigadरायगड