शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा, वडपाले गावातील स्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 07:06 IST

राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. मात्र, तरीही उन्हाळ्यात या परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवते. रायगड जिल्ह्यातील अनेक गावे सध्या पाणीटंचाईने व्याकूळ झाली आहेत. माणगाव तालुकाही याला अपवाद नाही. तालुक्यातील वडपाले गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. मात्र, तरीही उन्हाळ्यात या परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवते. रायगड जिल्ह्यातील अनेक गावे सध्या पाणीटंचाईने व्याकूळ झाली आहेत. माणगाव तालुकाही याला अपवाद नाही. तालुक्यातील वडपाले गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.मुंबई-गोवा महामार्गावर वडपाले गाव वसले असून, गावात जवळपास २०० घरे असून हजार ते अकराशे लोकसंख्या आहे. या गावातील अनेक पिढ्यांचा वेळ पाणी भरण्यातच गेला आहे. कारण गेल्या ७० वर्षांत गावात एकही पाणी योजना पोहोचलेली नाही. लहान मुलांपासून त्यांच्या आजीपासून सर्व जण हंडा घेऊन मैलोन्मैल पायपीट करीत असल्याचे दृश्य सध्या गावात पाहायला मिळत आहे.जानेवारी महिना उजाडला की, गावातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. घरात लहान मुले, वयोवृद्ध असले तरी पाण्यासाठी सर्वांचीच ससेहोलपट होताना दिसते. गावातील मुलांच्या शिक्षणाकडेही अनेकदा दुर्लक्ष होते. कारण एकच, पाणी!पाणी आणण्यासाठी गावातील लोकांना कायम वर्दळीचा असलेला मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्ग ओलांडून जावे लागते. त्यानंतर पुढे असलेल्या कोकण रेल्वेमार्गावरून पायपीट करावी लागते. या ठिकाणी रेल्वे फाटक असले तर कायम भीतीच्या छायेतच पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो.निवडणुका आल्या की, या गावात खासदार, आमदार, नेते मंडळी येतात. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पक्षांचे नेते येतात आणि आश्वासन देतात. महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरणार असल्याची खोटी आश्वासने देतात. मात्र, गेल्या ७० वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीने गावात नळपाणी योजना आणण्यासाठी प्रयत्न केलेले दिसत नाहीत. त्यामुळे आता गावातील लोक स्थलांतराच्या विचारात आहेत.२५ वर्षांपूर्वी गावात गोरेगाव-देवळी ३२ गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, या योजनेतील शेवटचे गाव वडपाले. त्यामुळे कधी भारनियमन, तर कधी जलवाहिनी फुटली, तर कधी कुठे वॉलला गळती लागल्याने गावात पाणी कधी पोहोचलेच नाही. पाण्याच्या मागे धावण्यात आयुष्य गेले मात्र अजूनही ग्रामस्थांची पिण्याची पाण्याची प्रतीक्षा संपलेली नाही.गेल्या ३० वर्षांपासून दुपार, असो वा सायंकाळ, दोन ते तीन कि.मी. पायपीट करून पाणी भरावे लागते. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. भर दुपारी, रात्री घरकामातून वेळ मिळेल, तेव्हा पाण्याच्या मागे धावावे लागते, त्यामुळे गावातील महिला वारंवार आजारी पडत आहेत. निवडणुका आल्या की नेतेमंडळी येतात आणि खोटी आश्वासने देतात.- शांता मनवे,स्थानिक महिला१२ वर्षांची असताना लग्न होऊन या गावात आले. आज त्यालाही ७० वर्षे झाली. या ७० वर्षांत पाण्यासाठी काय हाल झाले ते आमचे आम्हालाच माहीत. हायवे आणि रेल्वे फाटक पार करून रात्र असो वा दिवस, आम्हाला पाणी आणावे लागते. अख्खे आयुष्य पाण्यामागे गेले आहे.- पार्वतीबाई शिंदे,स्थानिक वृद्ध महिला

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRaigadरायगड