शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनामुळे पावसाळी पर्यटनावर पाणी, सुरक्षिततेसाठी सर्व पर्यटनस्थळे बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 23:58 IST

या वर्षी कोरोनामुळे साडेतीन महिन्यांपासून सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. पावसाळ्यातही ती बंदच राहण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षीच्या पर्यटन हंगामावर पाणी फिरणार असून, स्थानिकांचा रोजगारही बुडणार आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : पावसाळी पर्यटनासाठी मुंबईकरांकडून सर्वाधिक पसंती पनवेलला मिळत असते. कर्नाळा किल्ला, अभयारण्य, कलावंतीन दुर्ग, प्रबळगड, इरशाळगड व या परिसरातील निसर्गासह धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. परंतु, या वर्षी कोरोनामुळे साडेतीन महिन्यांपासून सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. पावसाळ्यातही ती बंदच राहण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षीच्या पर्यटन हंगामावर पाणी फिरणार असून, स्थानिकांचा रोजगारही बुडणार आहे.राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये रायगडचा अग्रक्रमांक लागतो. गडकिल्ले, धार्मिक स्थळे, नैसर्गिक पर्यटनस्थळांचे वैभव या परिसराला लाभले आहे. पावसाळी पर्यटनासाठी जिल्ह्यात सर्वाधिक पसंती पनवेल तालुक्याला लाभत असते. पावसाळा सुरू झाला की कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होते. जूनपासून पावसाळा संपेपर्यंत अभयारण्य व कर्नाळा किल्ला पाहण्यासाठी प्रत्येक महिन्याला १0 ते १५ हजार पर्यटक भेट देत असतात. येथून काही अंतरावर असणा-या इरशाळगड, कलावंतीन दुर्ग व प्रबळगड किल्ल्यांवरही प्रत्येक आठवड्यात सरासरी २ ते ५ हजार पर्यटक भेट देत असतात. गाढेश्वर धरण परिसर, मोरबे धरण, पांडवकडा व या डोंगररांगांतील इतर धबधबे पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड परिसरातील स्थानिक गावांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. प्रत्येक घरातील किमान एकतरी व्यक्ती हॉटेल, चहाची टपरी व इतर व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहे. प्रबळगडमाची या संपूर्ण गावचा रोजगार पर्यटनावर अवलंबून आहे. कर्नाळा अभयारण्यातही बचतगटाच्या माध्यमातून हॉटेल चालविण्यात येत आहे. वनव्यवस्थापन समितीमध्येही स्थानिकांना नोकरी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवली असल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.काजव्यांचा हंगामही गेला : कलावंतीन दुर्ग व प्रबळगडाला वर्षभर पर्यटक भेट देत असतात. कलावंतीन सुळका सर करण्यासाठी देश, विदेशातून पर्यटक येत असतात. पावसाळा सुरू झाला की या परिसरात रात्री लाखो काजवे दिसू लागतात. येथील वृक्षांवर चांदण्यांप्रमाणे काजवे चमकत असतात. ते मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मुक्कामासाठी प्रबळगड माचीवर जात असतात. या वर्षी तो हंगामही वाया गेला आहे.कर्नाळा परिसरातही पसरली शांततापावसाळ्यात सर्वाधिक गर्दी कर्नाळा अभयारण्य व कर्नाळा किल्ला पाहण्यासाठी होते. १२ चौरस किलोमीटर परिसरावरील या अभयारण्यात ६४२ प्रकारचे वृक्ष, १३४ प्रजातींचे स्थानिक व ३४ प्रजातींचे विदेशी पक्षी पाहावयास मिळतात.गडावरील ऐतिहासिक अवशेष व वरून दिसणारा निसर्गरम्य परिसर यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु कोरोनामुळे साडेतीन महिने या परिसरातही शांतता पसरली आहे.

कर्नाळा अभयारण्यात गतवर्षी (२०१९) आलेल्या पर्यटकांची आकडेवारीमार्च ७,५५१एप्रिल ३,८९३मे ३,९३८जून १0,२८१कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कर्नाळा अभयारण्य व किल्ला परिसरात पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यानंतरच पर्यटकांना परवानगी दिली जाणार आहे. सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे.- प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्नाळाकलावंतीन दुर्ग व प्रबळगड परिसर प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाला आहे. पर्यटन उद्योगावर येथील अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. परंतु सुरक्षेला प्राधान्य देत सद्य:स्थितीमध्ये पर्यटकांना या परिसरात मनाई केली आहे.- एन. एन. कुप्ते, साहाय्यक वनसंरक्षक, पनवेल.गवळीदेव धबधब्यावरही बंदी : नवी मुंबईमधील गवळीदेव धबधबा मागील काही वर्षांत पर्यटकांना आकर्षित करीत आहे. मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातूनही पर्यटक येथे येतात. या वर्षी गवळीदेव धबधब्यावरही सुरक्षेसाठी पर्यटकांना मनाई केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगडtourismपर्यटन