शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

coronavirus:परप्रांतीयांना स्वगृही जाण्यासाठी पोलिसांची मदत, ३५० कामगारांचे आॅनलाइन अर्ज भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 02:54 IST

अलिबाग तालुक्यात परप्रांतातून आलेल्या कामगारांना पुन्हा आपल्या गावी परतण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते.

- निखिल म्हात्रेअलिबाग : परप्रांतीयांना स्वगृही परतण्यासाठी लागणारी आॅनलाइन परवानगीसाठी अलिबाग पोलीस त्यांचे अर्ज दाखल करून घेत आहेत. तसेच पायी चालत निघालेल्या नागरिकांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांना पिण्यासाठी पाणी व बिस्कीट देत आहेत. तसेच एखाद्या दमलेल्या व्यक्तीस लिफ्ट देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पोलीस करीत आहेत. आतापर्यंत ३५० कामगारांचे आॅनलाइन अर्ज पोलिसांनी भरून दिले आहेत.अलिबाग तालुक्यात परप्रांतातून आलेल्या कामगारांना पुन्हा आपल्या गावी परतण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आॅनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. मात्र, आपल्या अशिक्षितपणामुळे अर्ज भरता येत नसल्याने काही कामगारांनी थेट अलिबाग पोलीसठाणे गाठले. पोलिसांना हकिगत सांगितली, त्यानंतर ३५० जणांचे आॅनलाइन अर्ज पोलिसांनी स्वत: भरून दिले आहेत. त्यामुळे परप्रांतीयांची ठिकठिकाणी होणारी गर्दी आता कमी झाली आहे.आपल्या मूळगावी परतण्यासाठी चाललेली धडपड, लाहन लेकरांना उचलून भरउन्हात आशेने हे कामगार रोज शहरात फिरत असत. त्यांची चालेली धडपड बंदोबस्त ड्युटीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे व पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. तोडकरी यांनी पाहिली. या कामगारांना होणारा त्रास समजून घेत बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या त्या दोन अधिकाऱ्यांनी कामगारांना आपण अर्ज भरून देण्यासाठी मदत करायची असे ठरविले. त्यानुसार रोज १० ते १२ जणांचे रोज भर्ज भरून देण्याचे काम हे स्वत: दोन अधिकारी करीत आहेत. येणाºया प्रत्येक कामगारास त्याची सध्याची परिस्थिती विचारीत त्याला आणखी कशा प्रकारे मदत करता येईल, यासाठी प्रयत्न करीत असतात. तसेच आपले मूळगाव गाठण्यासाठी पायी प्रवास करीत निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांनी पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी बिस्कीटही देत आहेत. कोरोना काळात कामाचा असलेला अधिक भार उचलत हे पोलीस मात्र आपली माणुसकी जपण्याचे काम करीत आहेत.शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न -कोल्हेपोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येक नागरिकास मदत करणे ध्येय आहे. सध्या नागरिकांना मदतीचा हात हवा आहे. एक पोलीस अधिकारी म्हणून जेवढा मदतीचा हात पुढे करता येईल, तेवढा करण्याचा प्रयत्न करीत आहोत.थकलेल्यांना प्रथम मदतीचा हात पुढे केल्याने काहींनी मदतीची पत्रही आम्हाला लिहिल्याचे अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगडPoliceपोलिस