शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : महिलांपेक्षा पुरुषांचा कोरोनाने मृत्यू, जिल्हा प्रशासनाचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 23:29 IST

० ते १७ वयोगटांतील ८ टक्के नागरिक हे कोरोनानेबाधित होत आहेत, तर २६ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोरोनाचा घट्ट विळखा पडत आहे.

- आविष्कार देसाईरायगड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत पुरुषांची कोरोना चाचणीची संख्या महिलांच्या तुलनेत अधिक करण्यात आली आहे. त्यातील ७२ टक्के पुरुषांचा तर २८ टक्के महिलांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.० ते १७ वयोगटांतील ८ टक्के नागरिक हे कोरोनानेबाधित होत आहेत, तर २६ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोरोनाचा घट्ट विळखा पडत आहे. ६० पेक्षा अधिक वयोगटांतील १२ टक्के नागरिक कोरोनाने त्रस्त आहेत. त्यातील ४९ टक्के नागरिकांना मृत्यूने कवटाळले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने शहरी भागातून आपले हातपाय ग्रामीण भागाकडे पसरवले आहेत. ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांचे जाळे असल्याने, या ठिकाणी जास्त प्रमाणात वर्दळ सुरू आहे. अनलॉकनंतर त्यामध्ये अधिक भर पडली आहे. पुरुष हे कामानिमित्त मोठ्या संख्येने बाहेर पडतात. ६५ टक्के पुरुषांची तर ३५ टक्के महिलांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये दोन्ही घटकांना १०० टक्के कोरोना झाल्याचे दिसून येते. प्रशासनाने एक लाख १६ हजार ६३७ कोरोना चाचणीचा अभ्यास केला आहे. त्यानुसार, ही आकडेवारी आहे.६५ टक्क्यांपैकी ६६ टक्के पुरुषांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले, ३४ टक्के रुग्णांनी घरीच उपचार केले अथवा त्यांना त्रास झाला नसावा. ३५ टक्के महिलांपैकी तर ३४ टक्के महिलांनी रुग्णालयात उपचारास पसंती दिली. येथेही ६६ महिलांना लक्षणे नसावीत, अथवा त्या घरीत बऱ्या झाल्या असण्याची शक्यता आहे. ६६ पैकी ७२ टक्के पुरुष रुग्णांचा, ३४ पैकी २८ टक्के महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

० ते १७ वयोगटांतील ९९ टक्के रु ग्ण झाले बरे- ० ते १७ वयोगटांतील ७ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, कोरोना होण्याचे प्रमाण हे ८ टक्के आले, तर ९२ टक्के नागरिकांना कोरोना नसल्याचे सिद्ध झाले. ७ टक्के कोरोनाबाधितांना रुग्णालयात उपचासाठी दाखल केले असता, ९९ टक्के रुग्ण बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत, तर १ टक्का रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.- १८ ते २५ वयोगटांतील १२ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, १० टक्के नागरिकांना कोरोना झाल्याचे दिसून येते, तर ९० टक्के रिपोर्ट निगेटिव्ह आले. १० टक्क्यांपैकी पैकी ९ टक्के कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल केले असता, ९९ रुग्ण बरे झाले तर, १ टक्का मृतांचे प्रमाण आहे.- २६ ते ४४ वयोगटांतील ४७ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ४२ टक्के नागरिक कोरोनाबधित आढळले, तर ५८ नागरिकांचे रिपोर्ट नगेटिव्ह आले. ४२ पैकी ३९ टक्के नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर ६१ नागरिकांना दाखल केले नाही. उपचारानंतर ३८ टक्के नागरिकांना मृत्यूने कवटाळले, ६२ रुग्ण बरे झाले.- ४५ ते ६० वयोगटांतील २५ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. २८ टक्के नागरिकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले, तर ७२ रिपोर्ट निगेटिव्ह आले. २९ टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार केले असता, मृत होण्याचे प्रमाण ३८ टक्के, बरे होण्याचे प्रमाण हे ६२ टक्के आहे.- ६० टक्के आणि त्याच्या पुढील वयोगटांतील ९ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, १२ टक्के नागरिकांची कोराना चाचणी पॉझिटिव्ह आली, तर ८८ नागरिकांची निगेटिव्ह आली. पैकी १५ टक्के नागरिकांना रुग्णालयात दाखल केले असता, तब्बल ४९ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५१ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस