शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

CoronaVirus News : महिलांपेक्षा पुरुषांचा कोरोनाने मृत्यू, जिल्हा प्रशासनाचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 23:29 IST

० ते १७ वयोगटांतील ८ टक्के नागरिक हे कोरोनानेबाधित होत आहेत, तर २६ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोरोनाचा घट्ट विळखा पडत आहे.

- आविष्कार देसाईरायगड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत पुरुषांची कोरोना चाचणीची संख्या महिलांच्या तुलनेत अधिक करण्यात आली आहे. त्यातील ७२ टक्के पुरुषांचा तर २८ टक्के महिलांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.० ते १७ वयोगटांतील ८ टक्के नागरिक हे कोरोनानेबाधित होत आहेत, तर २६ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोरोनाचा घट्ट विळखा पडत आहे. ६० पेक्षा अधिक वयोगटांतील १२ टक्के नागरिक कोरोनाने त्रस्त आहेत. त्यातील ४९ टक्के नागरिकांना मृत्यूने कवटाळले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने शहरी भागातून आपले हातपाय ग्रामीण भागाकडे पसरवले आहेत. ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांचे जाळे असल्याने, या ठिकाणी जास्त प्रमाणात वर्दळ सुरू आहे. अनलॉकनंतर त्यामध्ये अधिक भर पडली आहे. पुरुष हे कामानिमित्त मोठ्या संख्येने बाहेर पडतात. ६५ टक्के पुरुषांची तर ३५ टक्के महिलांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये दोन्ही घटकांना १०० टक्के कोरोना झाल्याचे दिसून येते. प्रशासनाने एक लाख १६ हजार ६३७ कोरोना चाचणीचा अभ्यास केला आहे. त्यानुसार, ही आकडेवारी आहे.६५ टक्क्यांपैकी ६६ टक्के पुरुषांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले, ३४ टक्के रुग्णांनी घरीच उपचार केले अथवा त्यांना त्रास झाला नसावा. ३५ टक्के महिलांपैकी तर ३४ टक्के महिलांनी रुग्णालयात उपचारास पसंती दिली. येथेही ६६ महिलांना लक्षणे नसावीत, अथवा त्या घरीत बऱ्या झाल्या असण्याची शक्यता आहे. ६६ पैकी ७२ टक्के पुरुष रुग्णांचा, ३४ पैकी २८ टक्के महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

० ते १७ वयोगटांतील ९९ टक्के रु ग्ण झाले बरे- ० ते १७ वयोगटांतील ७ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, कोरोना होण्याचे प्रमाण हे ८ टक्के आले, तर ९२ टक्के नागरिकांना कोरोना नसल्याचे सिद्ध झाले. ७ टक्के कोरोनाबाधितांना रुग्णालयात उपचासाठी दाखल केले असता, ९९ टक्के रुग्ण बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत, तर १ टक्का रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.- १८ ते २५ वयोगटांतील १२ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, १० टक्के नागरिकांना कोरोना झाल्याचे दिसून येते, तर ९० टक्के रिपोर्ट निगेटिव्ह आले. १० टक्क्यांपैकी पैकी ९ टक्के कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल केले असता, ९९ रुग्ण बरे झाले तर, १ टक्का मृतांचे प्रमाण आहे.- २६ ते ४४ वयोगटांतील ४७ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ४२ टक्के नागरिक कोरोनाबधित आढळले, तर ५८ नागरिकांचे रिपोर्ट नगेटिव्ह आले. ४२ पैकी ३९ टक्के नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर ६१ नागरिकांना दाखल केले नाही. उपचारानंतर ३८ टक्के नागरिकांना मृत्यूने कवटाळले, ६२ रुग्ण बरे झाले.- ४५ ते ६० वयोगटांतील २५ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. २८ टक्के नागरिकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले, तर ७२ रिपोर्ट निगेटिव्ह आले. २९ टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार केले असता, मृत होण्याचे प्रमाण ३८ टक्के, बरे होण्याचे प्रमाण हे ६२ टक्के आहे.- ६० टक्के आणि त्याच्या पुढील वयोगटांतील ९ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, १२ टक्के नागरिकांची कोराना चाचणी पॉझिटिव्ह आली, तर ८८ नागरिकांची निगेटिव्ह आली. पैकी १५ टक्के नागरिकांना रुग्णालयात दाखल केले असता, तब्बल ४९ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५१ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस