शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
4
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
5
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
6
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
7
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
8
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
9
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
10
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
11
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
12
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
13
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
14
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
15
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
16
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
17
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
18
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
19
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
20
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: विद्यार्थ्यांविना शाळा पडल्या ओसाड, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालकांकडूनही सुरू करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 00:46 IST

राज्यात वाढत असलेला कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात पनवेल तालुक्यात कोरोना संसर्ग रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागातील शाळा अद्याप बंद आहेत.

कळंबोली - शाळेसाठी विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक आहे. या कोरोना महामारीमुळे शाळा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांविना शाळा ओसाड दिसू लागल्या आहेत. दरवर्षी शाळा सुरू झाल्या की, शाळा आणि विद्यार्थी हे आजपर्यंतचे समीकरण होते, परंतु यंदा कोरोनामुळे शाळा सुरू करण्यास शासनाची द्विधावस्था निर्माण झाली आहे, तर पालकांनीही या परिस्थितीत पाल्यास शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे.दरवर्षी १५ जूनला नियमित शाळा सुरू व्हायची. शिक्षकांंकडून पहिलीसाठी विद्यार्थ्यांना शोधून शाळेत प्रवेश दिला जायचा. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशद्वारावर मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन तयार राहत असत. विद्यार्थ्यांना नवीन गणवेश नवीन पुस्तके घेऊन शाळेत पहिले पाऊल टाकण्याचा आनंद वेगळाच असायचा. इतर वर्गातील विद्यार्थी परीक्षा देऊन पुढील वर्गात गेल्याने पहिल्या दिवशी आनंदी वातावरण निर्माण व्हायचे. मात्र, यंदा परीक्षा न देताच पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम, खाऊ दिला जातो. त्यामुळे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी सणासारखा असतो.मात्र, यंदा या सणावर कोरोनाने विरजण टाकले आहे. राज्यात वाढत असलेला कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात पनवेल तालुक्यात कोरोना संसर्ग रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागातील शाळा अद्याप बंद आहेत. शासनाचीही शाळा सुरू करण्याबाबत द्विधावस्था निर्माण झाली आहे. जुलैपासून शाळा सुरू होणार होत्या, परंतु कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून शाळा अद्याप तरी सुरू करणे जिकरीचे बनले आहे. त्यास पालकांनीही विरोध दर्शविला आहे.ऑनलाइन अभ्यासक्रमावर भरकोरोनाच्या महामारीमुळे पनवेल महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील शाळा बंद आहेत. त्यामुळे पनवेल तालुक्यातील २४८ जिल्हा परिषद शाळांनी आॅनलाइन अभ्यासक्रम सुरुवात केली आहे.शाळेतील वर्गशिक्षकाकडून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जात आहे, तर पालकाकडे अँड्रॉइड मोबाइल नसेल, तर त्यांना फोनद्वारे अभ्यास दिला जात आहे.यामुळे विद्यार्थी अभ्यासात रमत आहेत. शासनाकडून पुढील आदेश आल्यानंतर शाळा सुरू होणार असल्याचे मत गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थीRaigadरायगड