शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

नारळी पौर्णिमा सणावर कोरोना महामारीचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 23:44 IST

कोरोनाच्या संकटामुळे मासेमारीचा हंगाम पूर्णता वाया गेलेला आहे. अशा वेळी मच्छीमारांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना, केंद्र राज्य सरकारने वाºयावर सोडल्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी सूर आहे.

अनंत पाटील

नवी मुंबई : आगरी कोळी मच्छीमार बांधवांचा वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारळी पौर्णिमा सणावर कोरोनाचे गडद सावट असल्याने कोळी समाजात नाराजीचा सूर आहे. येत्या सोमवारी ३ आॅगस्टला राखी पौर्णिमा आणि नारळीपौर्णिमा आहे. कोळी समाजात या सणाला खूप महत्त्व दिले जाते. नारळी पुनवेला दर्याचा राजा सोन्याचा नारळ वाहून होड्या मासेमारीला जातील, सोन्यासारखे मासे पकडून किनाºयावर आणेल, पण ते घ्यायला त्याच्यापर्यंत लोक येणार नाहीत. येईल त्या भावात ही दर्याची श्रीमंती विकावी लागेल. त्यामुळे यंदा या सणालाच कोरोनाचे ग्रहण लागले आहे.नवी मुंबई, मुंबई, रायगडपर्यंतच्या सागरी किनारपट्टीवरील मच्छीमार कोळी बांधवांच्या, तसेच मासळी विक्रेत्या महिलांच्या मनात यंदाच्या नारळी पौर्णिमेच्या सणावर सावट आहे. मात्र, त्यातूनही नवी दिशा दिसेल, अशी आस त्यांच्या मनात आहे.कोरोनाच्या संकटामुळे मासेमारीचा हंगाम पूर्णता वाया गेलेला आहे. अशा वेळी मच्छीमारांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना, केंद्र राज्य सरकारने वाºयावर सोडल्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी सूर आहे. नव्याने सुरू होणाºया नारळी पौर्णिमेच्या हंगामामध्ये लॉकडाऊनमध्ये मासळी मार्केट खुले करून व निर्यात सुरू करावी.- किरण कोळी, सरचिटणीस, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीदरवर्षी आमच्या कोळीवाड्यातून वाजत गाजत मिरवणूक निघते. मात्र, या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने यंदा सणाची मज्जाच गेली आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने समुद्राला नारळ अर्पण करणार आहोत आणि हे कोरोनाच संकट लवकर सरू दे, असे सागराला गाºहाणे घालणार आहोत.- विलास झेंडेकर, अलिबागनारळी पौर्णिमा सणाची तयारी १५ ते २० दिवसांपासून सुरू असते. या सणाला कुटुंबातील महिलांची एकत्र येऊन गोड पदार्थ बनविण्याची लगबग सुरू असते. आम्ही नटून थटून सागरदेवाला नारळ अर्पण करतो.- कविता वरळीकर, वरळी कोळीवाडानारळी पौर्णिमा कोळ्यांची विशेष असते. या दिवशी आम्ही सर्व कोळी महिला सागराला विनंती करतो की, मासेमारीला गेलेल्या आमच्या धन्याचे रक्षण कर. या वर्षी कोरोनाचे संकट आमच्या धंद्यावर आहे. - दीपाली गझने, दिवाळे कोळीवाडायंदा महामारीत नारळी पौर्णिमा अगदी साध्या पद्धतीत साजरी करणार आहोत. पारंपरिक पध्दतीने निघणारी मिरवणूक पहिल्यांदाच रद्द करण्यात आली आहे.कामेश कोळी - करंजा कोळीवाडा

टॅग्स :RakhiराखीRaigadरायगड