शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पीक विम्यातील अटीचा अडसर, जिल्ह्यातील १६ हजार ९७ शेतकरी नुकसानभरपाईपासून राहणार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:53 AM

अलिबाग : सरकारने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप शेतक-यांना मिळालेला नाही.

आविष्कार देसाई अलिबाग : सरकारने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप शेतक-यांना मिळालेला नाही. याविरोधात सरकारवर चौफेर टीका होत असतानाच आता अवकाळी पाऊस आणि वादळी वा-यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री पीक विम्याची अट मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील १६ हजार ९७ शेतकरी सुमारे तीन कोटी ४८ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहणार आहेत.अर्थव्यवस्थेचा कणा असणाºया कृषी क्षेत्रातील शेतकºयांना दिलासा देण्याची तयारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागाने केली आहे. यासाठी त्यांनी सरकारच्याच निर्णयाचा आधार घेत निर्णय क्षमतेतील योग्य समय सूचकता त्यांनी दाखवून दिली आहे. त्यांनी तयार केलेल्या अहवालामुळे बाधित शेतकºयांना काही अंशी आर्थिक दिलासा मिळण्यातील मार्ग मोकळा झाला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जुलै ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वारे झाले होते. त्यामुळे ३३ टक्क्यापेक्षा अधिक जिराईत पिकांना फटका बसला होता. आपत्तीमुळे १५ तालुक्यातील २४७ गावांतील १६ हजार ९७ शेतकरी बाधित झाले होेते. त्यांचे क्षेत्र हे चार हजार ६४० हेक्टर एवढे होते. शेतीवर आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकºयांना नुकसानभरपाई मिळणे गरजेचे होते. १६ हजार ९७ शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा काढलेला नाही. झालेल्या पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी सुमारे तीन कोटी ४८ लाख रुपयांची गरज असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागाने सांगितले. त्यासाठी त्यांनी अहवालही तयार केला आहे, परंतु ही नुकसानभरपाई देताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाºया विम्याच्या रकमेच्या ५० टक्के रक्कम असावी असा निकष अवकाळी पाऊस आणि वादळी वाºयामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी ग्राह्य धरावी, असा सरकारचाच निर्णय आहे.जिल्ह्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन झाल्याने प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभच विमाधारक शेतकºयांना मिळणार नाही. त्यामुळे योजनेचा निकष नुकसानभरपाई देण्यासाठी अडसर ठरत आहे.>योजनेचा लाभ शेतकºयांना मिळणार नाहीजिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये २०१६ साली ३० हजार २७४ शेतकरी समाविष्ट झाले होते. त्याचे क्षेत्र हे २२ हजार १६४.१७७ हेक्टर होते. त्यासाठी एक कोटी ७२ लाख ८७ हजार ७५४ प्रीमियम भरण्यात आला आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन झाले असल्यास तेथे प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ तेथील शेतकºयांना मिळणार नाही. रायगड जिल्ह्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभही आता विमाधारक शेतकºयांना मिळणार नसल्याचे समोर आले आहे.>तीन कोटी ४८ लाखांची गरजअवकाळी पाऊस आणि वादळी वाºयामुळे नुकसान झालेल्या १६ हजार ९७ शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी. यासाठी ढोबळ तीन कोटी ४८ लाख रुपयांची गरज असल्याचा अहवाल तयार केला आहे. यासाठी त्यांनी २००९ च्या सरकारी निर्णयाचा आधार घेतला आहे. त्यामुळे शेतकºयांना तेवढा, तरी दिलासा देण्याचा प्रयत्न कृषी विभागाने केला आहे, असे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सांगितले.>२०१६मध्ये आपत्तीमुळे १५ तालुक्यांतील २४७ गावांतील १६ हजार ९७ शेतकरी बाधित झाले होेते.कृषी विभागाने तयार केलेला प्रस्तावतालुका गावांची बाधित एकूण बाधित अपेक्षित निधीसंख्या शेतकरी क्षेत्र (हेक्टर) (रुपये लाखात)अलिबाग २२ १०६७ १५२.६७ ११.४५०पेण ५४ ९०३८ २६६०.५७ १९९.५४३मुरुड ०० ०० ०० ००खालापूर १५ १२१ ३९.६० २.९७०कर्जत ०६ २१ ८.९३ ०.६७०पनवेल ३३ ३१४० १०७८.२० ८०.८६५उरण ०० ०० ०० ००माणगाव १७ १२८ ६०.०३ ४.५२३तळा ०९ ३१ २२.३० १.६७३रोहे २९ १४७३ ३८५.६९ २८.९२७पाली ३४ ८३७ १९४.६८ १४.६०१महाड ०३ १० २.५८ ०.१९४पोलादपूर १४ ६३ ५.२४ ०.३९३म्हसळा ०४ ११२ १२.८७ ०.९६५श्रीवर्धन ०७ ५६ १७.३४ १.३०१एकूण २४७ १६,०९७ ४,६४०.९७ ३४८.०७३

टॅग्स :Farmerशेतकरी