शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

पंचनामे करून तत्काळ भरपाई देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:10 IST

प्राजक्त तनपुरे यांचे प्रतिपादन : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंगळवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि कोरोना संदर्भातील उपाययोजनांसंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात सर्वात जास्त नुकसान विजेच्या खांबांचे झाले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत, तेथे नवीन खांब बसवून ती कामे तातडीने पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करावा. तसेच दोन ते तीन दिवसांत पूर्ण एसटी लाइनचे काम पूर्ण करावे. या कामासाठी बाहेरून जेवढे उपलब्ध होईल तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.स्थानिक मजूर लावायचे असतील तसेच काही साधनसामग्री खरेदी करावयाची असेल त्यासाठी निधीची कमतरता भासू दिलीजाणार नाही, असेही तनपुरे यांनी सांगितले.या वेळी आमदार महेंद्र दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्केपाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग आर.एस. मोरे, कार्यकारी अभियंता, महावितरण अलिबाग माणिकलाल तपासे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर आदी उपस्थित होते.नागरिकांनी एकजुटीने परिस्थितीचा सामना केला पाहिजे : महावितरणच्या अधिकाऱ्यांनादेखील त्यांच्या अधिकारात या कामासाठी निधी खर्च करण्याचे अधिकार दिलेले आहेत. जेणेकरून काम करताना कुठली कमतरता पडू नये; परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची ही वेळ असल्याचे स्पष्ट केले. कोरोनामुळे बाहेरचे मजूर यायला घाबरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ, नागरिकांनी एकजुटीने या सर्व परिस्थितीचा सामना केला पाहिजे. ज्या व्यक्तींच्या घरांची पडझड झाली आहे, झाडांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे; या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्यांना भरपाई देण्यात येईल.