शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाने शेतकरी धास्तावले; कडधान्य पिकावर परिणाम होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 02:05 IST

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सध्या सफेद कांदा, वाल, चवळी, घेवडा, कलिंगड, नाचणी, वरी, चिबुड, पडवळ, मेथी, कोथिंबीर आदीची लागवड केली आहे.

मुरुड : तालुक्यात मंगळवारपासून ढगाळ वातावरण झाल्याने स्थानिक शेतकरी धास्तावले आहेत. कडधान्य घेणाऱ्या पिकावर संक्रात तर येणार नाही ना, या चिंतेत येथील शेतकरी आहेत. नुकताच अवकाळी पाऊस येऊन गेला; त्यामुळे प्रचंड प्रमाणात भातशेतीचे व बागायत जमिनीचे नुकसान झाले होते. त्यातच मागील तीन दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सध्या सफेद कांदा, वाल, चवळी, घेवडा, कलिंगड, नाचणी, वरी, चिबुड, पडवळ, मेथी, कोथिंबीर आदीची लागवड केली आहे. या पिकांना पाऊस नको असतो, कारण हिवाळ्यातील दवाच्या पाण्यावर ही पिके तयार होतात. जर का पाऊस पडला तर या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. स्थानिक शेतकरी आता पाऊस नकोच, अशी विनवणी करीत आहेत; परंतु बदललेल्या हवामानामुळे निसर्गाचे चक्र बदलत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गुरुवारी सकाळी पावसाचे थेंब बरसले; परंतु ते सौम्य स्वरूपात होते. मुरुड तालुक्यात ३९०० हेक्टर उत्पादित जमिनीपैकी २१०० हेक्टर क्षेत्रात कडधान्य पिके घेतली जातात. वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाऊस न पडावा हीच अपेक्षा येथे व्यक्त होताना दिसत आहे.बागायत जमिनीत आता सुपारीच्या उत्पादनास बहर येत आहे, अशा वेळी या पिकाला पाऊस हा घातक मानला जात आहे. वातावरणात बदल झाल्याने याचा परिणाम मानवी आरोग्यवरही झालेला दिसून येत आहे. घसा खवखणे, सर्दीची लागण व सौम्य ताप याचा त्रास नागरिकांना होतआहे.पावसाने सुपारी बागायतदारांची तारांबळरेवदंडा : गेले तीन दिवस पावसाचे सावट असताना, गुरु वारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पावसाने शिडकाव केल्याने सुपारी बागायतदारांची तारांबळ उडाली. वाळत घातलेली सुपारी पहाटे अनेक जणांना उचलायला लागली.पावसाच्या शिडकावा सुरू असतानाच बत्ती गूल झाली. दिवसभर ढगाळ हवामान असून हवेत उष्मा वाढला आहे. सातत्याने बदलत चाललेल्या हवामानामुळे आंबा, काजू व सुपारी बागायतदार धास्तावले आहेत. अनेक बागायतदारांची वाळत टाकलेली सुपारी भिजली आहे.या आधी अवकाळी पाऊस तसेच क्यार आणि महा या चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस याचा फटका रायगडमधील शेतकºयांना बसला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या बदलत्या हवामानाचा परिणाम पिकावर होऊन नुकसानीची भीती वाटत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी