शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

ढगाळ वातावरणाने शेतकरी धास्तावले; कडधान्य पिकावर परिणाम होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 02:05 IST

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सध्या सफेद कांदा, वाल, चवळी, घेवडा, कलिंगड, नाचणी, वरी, चिबुड, पडवळ, मेथी, कोथिंबीर आदीची लागवड केली आहे.

मुरुड : तालुक्यात मंगळवारपासून ढगाळ वातावरण झाल्याने स्थानिक शेतकरी धास्तावले आहेत. कडधान्य घेणाऱ्या पिकावर संक्रात तर येणार नाही ना, या चिंतेत येथील शेतकरी आहेत. नुकताच अवकाळी पाऊस येऊन गेला; त्यामुळे प्रचंड प्रमाणात भातशेतीचे व बागायत जमिनीचे नुकसान झाले होते. त्यातच मागील तीन दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सध्या सफेद कांदा, वाल, चवळी, घेवडा, कलिंगड, नाचणी, वरी, चिबुड, पडवळ, मेथी, कोथिंबीर आदीची लागवड केली आहे. या पिकांना पाऊस नको असतो, कारण हिवाळ्यातील दवाच्या पाण्यावर ही पिके तयार होतात. जर का पाऊस पडला तर या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. स्थानिक शेतकरी आता पाऊस नकोच, अशी विनवणी करीत आहेत; परंतु बदललेल्या हवामानामुळे निसर्गाचे चक्र बदलत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गुरुवारी सकाळी पावसाचे थेंब बरसले; परंतु ते सौम्य स्वरूपात होते. मुरुड तालुक्यात ३९०० हेक्टर उत्पादित जमिनीपैकी २१०० हेक्टर क्षेत्रात कडधान्य पिके घेतली जातात. वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाऊस न पडावा हीच अपेक्षा येथे व्यक्त होताना दिसत आहे.बागायत जमिनीत आता सुपारीच्या उत्पादनास बहर येत आहे, अशा वेळी या पिकाला पाऊस हा घातक मानला जात आहे. वातावरणात बदल झाल्याने याचा परिणाम मानवी आरोग्यवरही झालेला दिसून येत आहे. घसा खवखणे, सर्दीची लागण व सौम्य ताप याचा त्रास नागरिकांना होतआहे.पावसाने सुपारी बागायतदारांची तारांबळरेवदंडा : गेले तीन दिवस पावसाचे सावट असताना, गुरु वारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पावसाने शिडकाव केल्याने सुपारी बागायतदारांची तारांबळ उडाली. वाळत घातलेली सुपारी पहाटे अनेक जणांना उचलायला लागली.पावसाच्या शिडकावा सुरू असतानाच बत्ती गूल झाली. दिवसभर ढगाळ हवामान असून हवेत उष्मा वाढला आहे. सातत्याने बदलत चाललेल्या हवामानामुळे आंबा, काजू व सुपारी बागायतदार धास्तावले आहेत. अनेक बागायतदारांची वाळत टाकलेली सुपारी भिजली आहे.या आधी अवकाळी पाऊस तसेच क्यार आणि महा या चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस याचा फटका रायगडमधील शेतकºयांना बसला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या बदलत्या हवामानाचा परिणाम पिकावर होऊन नुकसानीची भीती वाटत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी