शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

आमदारांचा दावा खोटा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा दुजोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:59 AM

अलिबाग-वडखळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आता एक-एक महत्त्वपूर्ण खुलासे पुढे येत आहेत. हा प्रकल्प करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयासोबत स्थानिक आमदारांनी पुढाकार घेतल्याचा केलेला दावा खोटा ठरला आहे

अलिबाग : अलिबाग-वडखळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आता एक-एक महत्त्वपूर्ण खुलासे पुढे येत आहेत. हा प्रकल्प करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयासोबत स्थानिक आमदारांनी पुढाकार घेतल्याचा केलेला दावा खोटा ठरला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयानेच एका पत्राद्वारे मध्यंतरी हा खुलासा केला असताना आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देखील त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ केंद्र सरकारच्याच योजनेतून साकारण्यात येत असल्याचे समोर आले आहे.अलिबाग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांचे पर्यटनाचे आवडीचे ठिकाण देखील आहे. अलिबागमधूनच पुढे मुरु ड तालुक्यातील पर्यटनस्थळांकडे जावे लागते. या ठिकाणी देशी-परदेशी पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांच्या रु ंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबई-गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरु आहे. वडखळपर्यंत या मार्गाचा उपयोग अलिबागसह मुरु ड तालुक्याला होतो. वडखळ-अलिबाग हा दुपदरी असल्याने पुन्हा वाहतूककोंडीचा प्रश्न उभा राहतो. यावर उपाययोजना म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने अलिबाग-वडखळ या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देखील बहाल केला आहे. या मार्गाची ओळख राष्ट्रीय महामार्ग १६६ ए अशी आहे. हा महामार्ग झाल्याने केवळ १२ मिनिटांमध्ये अलिबागहून वडखळला पोचता येणार आहे.अलिबाग आणि मुरु ड तालुक्याच्या विकासात गतिमानता आणणाºया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी श्रेयवाद उफाळून आला होता. या प्रकल्पासाठी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच या मार्गाची मागणी गरजेची असल्याचे केंद्रीय मंत्रालयाला सांगितल्याचा दावा आमदार पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी एका पत्रकार परिषदेत केला होता. जिल्ह्याच्या विकासासाठी शेकाप योगदान देत असल्याचे चित्र या पत्रकार परिषदेतून त्यावेळी अधोरेखित केले होते.अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गासाठी आ.जयंत पाटील यांनी खरेच पुढाकार घेतला, अथवा पत्रव्यवहार केला आहे का ? याबाबत अलिबाग येथील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांच्या मनात शंका उपस्थित झाली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाबरोबर पत्रव्यवहार करून याची शहानिशा केली.त्यावेळी शेकापचे आमदार पाटील यांनी मागणी केल्याचे अथवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत या महामार्गासाठी बैठक झाली नसल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने सावंत यांना लेखी कळवले होते. त्यातच आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नव्याने खुलासा करताना सावंत यांना पत्र देवून आमदार पाटील यांचे या रस्त्याबाबतचे पत्र किंवा त्यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेली बैठक याबाबत कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे कळविले आहे.