शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीचा अंधार, घरांवर माती अन्‌ वरुन पाऊस-वारा; ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितला बचावकार्याचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 19:06 IST

Raigad Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक इर्शाळवाडी भागात दरड कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

मुंबई : सर्वत्र अंधार, पाऊस सुरूच होता, वरुन जोरात वाराही वाहत होता, कुठल्याही यंत्राची मदत घेता येत नव्हती, त्यामुळे माणसांच्याच मदतीने बचावकार्य सुरू होते. इरसाळवाडी गावात दरड कोसळल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहचलेले ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना सर्व थरार सांगितला. इरसाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या इरसाळवाडी गावात दरड कोसळल्याचे समजताच महाजन तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. रात्री तीन वाजेच्या दरम्यान ते इरसाळवाडीला पोहोचले. त्यांच्यासोबत आमदार महेश बालदी हे देखील होते.

मदतकार्यातील अडथळे सांगताना महाजन म्हणाले, अंधार असल्याने मोबाईल बॅटरीच्या उजेडात वाट काढत आम्ही घटनास्‍थळ गाठले. खाली पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे हे उपस्थित होते. सीओ, पोलीस अधिक्षक, एसडीओ, तहसिलदार आदी अधिकारी व कर्मचारीही होते. तुफान पाऊस कोसळत होता. सोबत जोराचा वाराही होता. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य होते. डोंगराळ भाग, घटनास्थळी पायी जावे लागणार होते. जाण्याचा रस्ता केवळ 3 फुटाचा. बाजूला खोल दरी, जोराचा वारा आणि वरुन पाऊस.  पायी चालणेही कठीण जात होते. अचानक कुठे दरड कोसळेल याचा नेम नव्हता. निघत असतानाच पोलिसांनी धोक्याची सूचना दिली. अचानकपणे कधीही दरड कोसळू शकते असा इशाराही दिला. जवळच्या गावांमधून ५० ते ६० गावकऱ्यांची टीम मदतीकरीता जमवली. तोपर्यंत पहाटेचे 5 वाजले होते. 

एनडीआरएफची टीम आमच्या मदतीसाठी पोहोचली होती. डोंगराळ भाग असल्यामुळे बचाव कार्यासाठी जेसीबी वगैरे यंत्रांचा वापर शक्यच नव्हता. खराब हवामान व लँडीगकरिता जागा नसल्यामुळे हेलीकॉप्टरची मदत घेता येत नव्हती. शेवटी अत्याधुनिक तांत्रिक मदतीविना, बचावकार्य सुरु केले. मातीचा मलबा उपसण्याच्या कामी सर्वजण लागले. पाऊस सुरूच होता. त्यामुळे जेवढा मलबा उपसत होतो त्यापेक्षा जास्त मलाबा वरुन पुन्हा जमा होत होता. वाटही निसरडी झाल्याने मदतकार्य करणारे घसरुन पडत होते. सगळी परिस्थिती हाता बाहेरची होती. साधारणत: 250 लोक वस्तीचा हा पाडा. 60 ते 70 व्यक्ती रोजगारासाठी पाड्याच्या बाहेर असल्याची माहिती आहे. त्यामुळे सुदैवाने ते या दुर्घटनेतून बचावले. सकाळपर्यंत आजूबाजूच्या गावांतील गावकरी घटनास्थळी जमली. त्यांनीही मदतीचा हात पुढे केला. प्रत्येकजण आप्त-स्वकीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता. हे लिहीपर्यंत  सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले होते, अशी माहिती महाजन यांनी दिली. एकाच ठिकाणी दफनबचावकार्य सुरु असताना दुर्दैवाने नऊ जणांचे मृतदेह हाती लागले. दफनविधी करण्याचे ठरल्यानंतर खड्डे खोदण्यात आले. पाऊस सुरु असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी जमा होत होते. ते पाणी आम्ही उपसत होतो. या कठीण प्रसंगात काळजावर दगड ठेवून ते मृतदेह दफन केले, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यूडोंगरावर चढत असताना खुप दम लागत होता.  आमच्या मागेच शंभर दोनशे फुटावर आमच्या सोबतचा अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यास हृदय विकाराचा झटका आला असावा. यातच दुर्दैवाने त्याला प्राण गमवावे लागले, असे महाजन यांनी सांगितले. शाळेत झोपलेली सहा मुले सुरक्षित गावातील शाळेच्या इमारतीमध्ये गावातील 6 मुले झोपलेली होती. सुदैवाने ती या दुर्घटनेमधून सुरक्षित राहू शकली.  दरड कोसळण्याच्या आवाजामुळे जागे होऊन या मुलांनी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जवळच्या लोकांना कळवले. त्यामुळे मदतीसाठी अनेकजण धावून आले अशी माहिती महाजन यांनी दिली.  

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणEknath Shindeएकनाथ शिंदेGirish Mahajanगिरीश महाजनChief Ministerमुख्यमंत्री