शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

नावाला केंद्रीय कर्मचारी पण पोस्टातील साडेतीन लाख ग्रामीण डाकसेवकांची न्यायासाठी परवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 1:08 PM

७६ वर्षांनंतरही फक्त नावाचेच केंद्र सरकारचे सेवक, मात्र अनेक सोयी-सुविधांपासून वंचित!

मधुकर ठाकूर, उरण: दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या व दीड लाख खेडापाड्यात काम करणाऱ्या साडेतीन लाख ग्रामीण डाक सेवकांना टपाल खात्यात मागील ७६ वर्षांपासून कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळेफक्त नावापुरतेच उरलेल्या केंद्र सरकारच्या सेवकांची न्यायासाठी अनेक वर्षांपासून फरफट सुरू असल्याच्या व्यथा ग्रामीण भागात ग्रामीण डाक सेवक म्हणून काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी मांडल्या आहेत.

देशातील टपाल खात्याला दिडशे वर्षांची परंपरा आहे. या टपाल खात्याच्या अखत्यारीत दिड लाख खेड्यात काम चालते.या दिड लाख गावांतील खेडोपाड्यात ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये साडेतीन लाख  ग्रामीण डाक सेवक काम करीत आहेत.मात्र दिड लाख खेडे गावांतील ब्रँच पोस्ट ऑफिसांच्या जोरावर टपाल खाते चालवणार्‍या खात्याला अजूनही खेड्यातील ब्रँच ऑफिसला स्वत:च्या मालकीचे  पोष्टाचे छोटेशे ऑफिसही देता आलेले नाही.

जे कोणी ब्रँच पोस्ट मास्तर म्हणून काम करीत आहेत. त्यांच्याच घरात ऑफिस ठेवण्यात येते. त्याचा कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही. आज आपण बघितलं तर खेड्यापाड्यात काम करत असलेल्या बँका-पतपेढ्यातील कर्मचारी स्वत:च्या मालकीच्या जागेत एअर कंडीशनमध्ये काम करीत आहेत.

सध्या गावांगावामध्ये जे कर्मचारी ब्रँच ऑफिसमध्ये काम करीत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत नाहीत. निव्वळ रोजंदारीवर ग्रामीण डाक सेवक या नावावर काम करुन घेतले जाते.इतर सर्व क्षेत्रांतील कर्मचार्‍यांना रजा, पीएफ, सीएफ, ग्रॅज्युएटी, सर्व्हिस फंड अशा विविध सुविधा मिळतात. तसेच पोस्टातील ग्रामीण डाक सेवक सेवा निवृत्त झाला की, त्याला दीड-दोन लाख रुपये देऊन त्यांची सेवा पूर्ण केली जाते. मात्र केंद्रीय कर्मचारी असतानाही त्यांना या सोयी सुविधा का मिळत नाहीत. असा खोचक सवालही या ग्रामीण डाक सेवकांनी माहिती देताना व्यक्त केला आहे.

देशातील आमदार, खासदारांना पेन्शन तसेच वेग-वेगळ्या गटांतील लोकांना वेग-वेगळ्या योजनांमार्फत पेन्शन दिली जातेे. मात्र ज्यांनी आपले आयुष्य नोकरीत राहून जनतेची सेवा केली. त्यांना पेन्शन नाही हे घटनेमध्ये लिहून ठेवले आहे का ? तसेच यापूर्वी खेडे गावातील ब्रँच पोस्ट मास्तर किंवा पोस्टमेन सेवानिवृत्त झाले की त्यांच्या जागेवर त्यांच्या मुलांना अनुकंपा तत्त्वावर कामात सामावून घेतले जात होते. जेणे करुन तो त्यांच्या सेवानिवृत्त झालेल्या आई-वडिलांना तीन टाईम नसले तरी किमान दोन टाईम जेवण देऊ शकत होता. मात्र आत्ता तसे नाही. ऑनलाईन भरतीमुळे त्यांच्या जागेवर कोणीही रूजू होऊ शकतो. मग सेवानिवृत्त झालेल्या माणसाचे काय, त्याचे पुढचे जीवन कसे व्यतीत होणार ? असे एक नव्हे देशात  साडेतीन लाख कर्मचारी या यातना सोसत आहेत.

नावाला केंद्रीय कर्मचारी परंतू कुठल्याही प्रकारच्या सोई-सुविधा नाहीत.ग्रामीण भागामध्ये खेडो-पाडी ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये काम करणार्‍या पोस्टाच्या साडेतीन लाख ग्रामीण डाक सेवक मागील ७६ वर्षांनंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.त्यांना कोणी न्याय मिळवून देईल का ? अशा व्यथा निराशेच्या गर्तेत सापडलेल्या ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये काम करणार्‍या  साडेतीन लाख कर्मचाऱ्यांच्या वतीने ग्रामीण डाक सेवकांनी व्यक्त केल्या आहेत.

केंद्रीय कर्मचारी असतानाही आणि खेडोपाड्यात पोस्टाची अविरतपणे सेवा देणाऱ्या साडेतीन लाख ग्रामीण डाक सेवकांना सोयी सुविधा का मिळत नाहीत. या कर्मचार्‍यांना संविधानातील नियम लागू होत नाहीत का ? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.ग्रामीण डाक सेवकांना सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :uran-acउरणPost Officeपोस्ट ऑफिस