शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

सावधान... पुढे रस्ता खचतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:34 IST

रस्ता बंद होण्याची भीती; आदगाव-वेळास रस्त्याच्या संरक्षण भिंतीला भगदाड

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव मार्गावरील रस्ता खचत असल्याचे दिसते. सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे या खड्ड्यांत दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्यापलीकडे काहीही केले नसल्याचे समोर येत आहे.काही दिवसांपासून सतत पडणाºया मुसळधार पावसाने शनिवारी बोर्लीपंचतन शहराला जोडणाºया रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. मंगळवारपासून पुन्हा सुरू झालेल्या पावसासोबत समुद्राच्या जोरदार क्षारयुक्त लाटांमुळे वेळास फाटा येथून दोन कि.मी.वर असणाºया रस्त्याची आणखी दुर्दशा होत आहे. सध्या जोरदार पावसात हा रस्ता पूर्ण पडण्याची भीती आहे. रस्त्यालगत समुद्रधूप प्रतिबंधक बंधारा आहे. मात्र, तोही पूर्ण मोडकळीस आला आहे. वेळीच दुरुस्ती झाली नाही तर वेळास व आदगाव या दोन्ही गावांचा संपर्क तुटू शकतो. आदगाव जाणाºया मार्गातून प्रवास करते वेळी वाहनचालकाला रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा पाच ते सहा फूट खोल असताना त्याच खड्ड्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेवरून भीतिदायक प्रवास करण्याची वेळ आली आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने अनार्थ घडू शकतो. यामुळे या रस्त्यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.सागरी मार्ग म्हटल्यावर समुद्राची भरती-ओहोटी, लाटांचा मारा या गोष्टी लक्षात घेतल्यास रस्त्याची वारंवार करावी लागणारी देखभाल न झाल्याने वेळास-आदगाव रस्ता पूर्णपणे खचला आहे. मुख्य जिल्हा मार्ग असल्याने रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आहे. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांना या रस्त्याची कल्पना असूनदेखील कोणत्याही प्रकारची तत्काळ दुरुस्ती केली जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही दिवसांतच पडणाºया पावसामुळे साइडपट्टी खचल्याठिकाणी रस्ता खचल्याचे दिसून येत आहे. रस्त्याची दुरुस्ती होऊन संरक्षक कठडे डागडुजी होण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.वेळास येथील खचलेल्या रस्त्यावर दरवर्षी सार्वजनिक बांधकाम खाते माती टाकून भराव करते. मात्र, पावसाळ्यात पुन्हा पुन्हा रस्ता खचतो. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होतेय. कायमस्वरूपी पक्के रस्ते व्हावे.- धवल तवसालकर, वेळासवेळास-आदगाव रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.- श्रीकांत गणगणे,उपअभियंता, सा. बां. विभाग

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा