शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

शहापुरातील जिताडा व्हिलेजमध्ये पायाभूत सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:17 PM

१०३ तलावांच्या गावात रस्त्याची दुर्दशा; मत्स्यशेतीसह गृह पर्यटन उद्योगांची होणार भरभराट

- आविष्कार देसाई अलिबाग : जिल्ह्यात काही ठिकाणी शेतीचा व्यवसाय आतबट्याचा होत चालला आहे. शेतीला जोडधंदा उभारल्यास अन्नाचा पोशिंदा असलेला शेतकरी समाधानाने जगू शकतो. हाच धागा पकडून अलिबाग तालुक्यातील शहापूर गावातील शेतकऱ्यांनी तब्बल १०३ मत्स्य तलावांची निर्मिती केली आहे. ‘जिताडा व्हिलेज’ अशी ओळख संपादित केलेल्या शेतकऱ्यांना विविध पायाभूत सुविधांपासून ग्रासले आहे. सरकार आणि प्रशासनाने योग्य त्या सुविधा पुरविल्यास मत्स्यशेती आणि गृह पर्यटन अशा दुहेरी उद्योगांत भरभराट होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविण्यात येत आहे.अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील काही जमिनी या टाटा आणि रिलायन्सच्या प्रकल्पासाठी सुमारे १३ वर्षांपूर्वी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रकल्पांना आवश्यक असणारे क्षेत्र ठरावीक मुदतीमध्ये संपादित करण्यात न आल्याने दोन्ही कंपन्यांना आपापले प्रकल्प गुंडाळावे लागले. या ठिकाणी शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. या ठिकाणच्या जमिनी सुपीक असल्याने शेतीवरच सर्वांचा उदरनिर्वाह चालतो. गावाला लागूनच खाडीचे क्षेत्र आहे. त्यामुळे उधाणाच्या वेळी खारबंदिस्ती तुटून पाणी शेतात घुसण्याचे प्रकार सातत्याने घडतच असतात. ग्रामस्थांनी एकत्र येत खारबंदिस्तीची कामे स्वखर्चाने केली आहेत.शेतीला जोडधंडा उभारताना परिसरात १०३ शेततळ्यांची निर्मिती केली आहे. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर आणि तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतूनच मत्स्यशेती करण्यात आली आहे. सुरुवातीला केवळ तीन शेततळ्यांची संख्या आज १०३ वर पोहोचली आहे. याच कारणांनी या गावाला ‘जिताडा व्हिलेज’ अशी नवीन ओळख मिळाली आहे.एक हेक्टरला सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. शेतीच्या माध्यमातूनही सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. अतिशय संघर्षमय परिस्थितीत हा व्यवसाय तरुण उद्योजक करीत आहेत. या सर्व तलावांपर्यंत पोहोचण्यासाठी उन्हाळ्यात बांधावरून, तर पावसाळ्यात चिखल तुडवून जावे लागते. त्यामुळे पर्यटकांची इच्छा असतानाही तलावांपर्यंत जाता येत नाही. तसेच रस्ता नसल्याने मासे बाजारापर्यंत पोहोचवता येत नाहीत. त्यामुळे त्यांना चांगली किंमत मिळत नसल्याने आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचे शेततळेधारक सुनील बाळाराम पाटील यांनी सांगितले.जिताडा व्हिलेजच्या माध्यमातून जिताडा विक्र ी आणि गृह पर्यटन असा दुहेरी उद्देश आहे. पर्यटनाद्वारे किमान तीन लाख रुपयांचा व्यवसाय तसेच अप्रत्यक्ष रोजगाराद्वारे अडीच लाख प्रति तलाव उत्पन्न मिळू शकते. या सर्व संकल्पना वास्तवात आणण्यासाठी सुमारे १०३ तलावांना जोडणारा रस्ता होणे अत्यंत गरजेचे असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी सांगितले.मुख्यमंत्री सडक योजनेच्या धर्तीवर ‘पालक मंत्री पाणद रस्ता’ (पाणवठ्यांकडे जाणारा रस्ता) अशी योजना दोन वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. योजनेतून तलावांकडे जाणारे रस्ते निर्माण केल्यास शेतकºयांच्या हिताचे होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे लेखी मागणी करण्यात आली असल्याचे भगत यांनी स्पष्ट केले.रायगडच्या जिल्हाधिकाºयांकडे पालकमंत्री पाणद रस्त्याचा नियोजित मार्ग, नकाशा सुपूर्द केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नियोजित रस्त्याचे सर्वेक्षण आणि स्थळपाहणी अलिबागचे तहसीलदार यांच्यामार्फत डिसेंबर २०१९ मध्ये करण्यात आले आहे. १०३ तलावांसाठी सध्या फक्त अडीच किलोमीटरच्या रस्त्याची आवश्यकता आहे. सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास समस्या सुटण्यास मदत होणार आहे.