शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

सुधागडात सात दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 1:10 AM

कनेक्टिंग इंडियाचा डिस्कनेक्टिंग तालुका ; कार्यालय बंद असल्याने नागरिक हैराण

n  विनोद भोईरलोकमत न्यूज नेटवर्कपाली : सुधागड तालुक्यात पाली येथे बीएसएनएलचे तालुकास्तरीय कार्यालय आहे. ज्या नेटवर्कनी भारतात ग्रामीण भागात मोबाइल फोन आणि इंटरनेट वापरण्याची अभूतपूर्व क्रांती केली ते बीएसएनएल आता मरणासन्न अवस्थेत पाहायला मिळत आहे. पालीतील कार्यालय फक्त नावापुरते असून महिन्यातील २० ही दिवस हे कार्यालय बंदच असते. त्यामुळे फक्त बंद कार्यालयासाठी बीएसएनएल भाडे भरते का, हा खरे तर प्रश्न आहे.     पालीतील सर्व महत्त्वाची सरकारी कार्यालये म्हणजे पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, कोषागार, दुय्यम निबंधक, साहाय्यक निबंधक, पोलीस स्टेशन या सर्व कार्यालयांत बीएसएनएलचे नेट आहे; परंतु बीएसएनएलच्या नेहमीच्या ढिसाळ कारभारामुळे बहुतेक सर्व कार्यालयांत खासगी नेट कंपन्यांचे नेटवर्क सध्या कार्यरत आहे.

सुधागड तालुक्यातील बीएसएनएलच्या रेंज नसण्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य मोबाइल वापरकर्त्याना आणि दुय्यम निबंधक आणि कोषागार कार्यालय यांना बसला आहे. जे सामान्य नागरिक बीएसएनएलचे नेटवर्क वापरतात त्यांना महिन्यातून फक्त १० ते १५ दिवसच रेंज असते, अशी तक्रार केली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे रिचार्ज सुधागडवासीयांचे वाया जात असून सामान्य माणूस त्यात भरडला जात आहे. दुय्यम निबंधक आणि कोषागार कार्यालयात बीएसएनएलच्या लीज लाइन असल्याने आणि त्यांचे सर्व्हर फक्त बीएसएनएलवर चालत असल्याने अनेक अडचणी येत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकार मुंबई, पुणे येथून दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात; परंतु इंटरनेट नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. या समस्येवर दुय्यम निबंधकदेखील हतबल झाले असून वारंवार अलिबाग बीएसएनएलला तक्रार करूनदेखील कारवाई होताना दिसत नाही. कोषागार कार्यालयात तर मागील १५ दिवसांपासून सर्व बिले आणि चलने नेट नसल्याने पडून असल्याची माहिती कोषागार अधिकारी गणेश रणपिसे यांनी दिली आहे. तालुक्याच्या मुख्य ठिकाणीच नेटवर्क नाही तर ग्रामीण भागात कधी मिळणार, हा प्रश्न आहे. 

जिल्हा प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचेबीएसएनएलचे कोणत्याही प्रकारचे लक्ष सुधागड तालुक्यातील समस्येकडे नाही. त्यामुळे खासगी नेट कंपन्या यांना सुधागड तालुका आंदण दिल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यावर लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे असून नेट नसल्याने दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मार्फत मिळणारा महसूलदेखील बुडत आहे आणि सामान्य माणसाचे पैसे वाया जात आहेत.

पेण आणि नागोठणे यांच्यामध्ये कासूजवळ WTR लाइनचे काम चालू असल्याने इंटरनेट आणि रेंज सुधागड तालुक्यात नाही, परंतु गुरुवारपर्यंत रेंज यायला पाहिजे होती.- सतीश कोल्हे, एरिया नेटवर्क इंजिनीअर

टॅग्स :Raigadरायगड