शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

टोळ पुलाला वाळू वाहतुकीचा फटका, स्ट्रक्चर आॅडिटचा प्राथमिक अहवाल प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:57 AM

दासगाव : सावित्री खाडीत ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला परवाना मिळाला आहे. येत्या काही दिवसांतच ड्रेझर खाडीमध्ये वाळू उत्खनन सुरू करतील.

सिकंदर अनवारे दासगाव : सावित्री खाडीत ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला परवाना मिळाला आहे. येत्या काही दिवसांतच ड्रेझर खाडीमध्ये वाळू उत्खनन सुरू करतील. परवाना मिळालेल्या बंदरावर यंत्रसामग्री दुरुस्तीचे काम देखील सुरू झाले आहे. वाळू उत्खननाला मिळालेला परवाना व्यावसायिक दृष्ट्या आनंदाची गोष्ट असली तरी वाळू वाहतूक करणारी मोठी वाहने ज्या पुलावरून ये-जा करणार आहेत, तो टोळ पूल गेली अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या स्ट्रक्चर आॅडिटच्या प्राथमिक अहवालानुसार या पुलाचा पाया धोकादायक स्थितीत आहे, तर पुलावरून वाहतुकीची क्षमता केवळ २० टन आहे. यामुळे या पुलावर होणाºया वाळू वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.महाडमधून वाहणारी सावित्री नदी, माणगाव तालुक्यातून येणारी काळ नदी यांच्या संगमापासून पुढे सुरू होणारी सावित्री आणि बाणकोट खाडी यामधील उत्खनन होणाºया वाळूला सर्वाधिक मागणी आहे. काळी दाणेदार वाळू या भागात मिळत असल्याने जिल्हा तसेच मुंबईमधील बांधकाम व्यावसायिकांची महाडमध्ये उत्खनन होणारी वाळू ही पहिली पसंती आहे. गेली १५ वर्षांपासून ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला सावित्री खाडीत बंदी होती. हातपाटीद्वारे वाळू उत्खननाला मर्यादा असल्याने वाहतुकीचा प्रश्न गेल्या १० वर्षांत कधीही निर्माण झाला नाही. मात्र मागील महिन्यात महाराष्टÑ शासनाने आणि पर्यावरण विभागाने सावित्री खाडीत ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला हिरवा कंदील दिला. दोन व्यावसायिकांना ड्रेझरचे परवानेही दिले. आता ड्रेझर या अजस्त्र मशिनरीद्वारे होणारे वाळू उत्खनन टोळ परिसरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण करेल, अशी साशंकता स्थानिक ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली आहे.>खासगी सर्वेअरकडून या पुलाचे आॅडिट करण्यात आले आहे. प्राथमिक अहवालानुसार पुलाची क्षमता २० टन असून या पुलाचा पाया म्हणजेच फाउंडेशन धोकादायक स्थितीत आहे. रेलिंग आणि पुलावरील रस्त्याला दुरुस्तीची गरज आहे. आॅडिटचा परिपूर्ण अहवाल हाती आल्यानंतर दुरुस्तीबाबत विचार करण्यात येईल. पुलाच्या पायथ्याशी झालेल्या वाळू उत्खननामुळे पुलाला हा धोका निर्माण झाला आहे.- संजय पाटील, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग महाडजीव मुठीत धरून पुलावरून प्रवासकाळ नदीवरील या टोळ पुलाचा वापर परिसरातील नागरिक येण्या-जाण्यासाठी नेहमीच करतात. मात्र, माणूस चालत असतो, अगर गाडीवर शेजारून एखादी मोठी गाडी गेल्यावर धरणीकंपाप्रमाणे पूल हादरतो.या हादºयामुळे लोक भयभीत होतात. काही वर्षांपूर्वी पुलाच्या काँक्रीटला मोठमोठे खड्डे आणि होल देखील पडले होते. पंचक्रोशीतील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर पुलाची डागडुजी झाली असली तरी हा पूल धोकादायक स्थितीत नाही, याबद्दल साशंकता आहे.