शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पहिल्याच दिवशी ३५३ शाळांत मिळणार पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:24 IST

महाडमध्ये ७८ हजार १५१ पुस्तके दाखल

महाड : दीर्घ सुट्टीनंतर महाड तालुक्यातील शाळा १७ जूनला सुरू होत असून शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये पुस्तके पोचवण्याचे काम सध्या सुरू आहे.

कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच सर्व दाखलपात्र मुलांची शाळांमध्ये १०० टक्के उपस्थिती टिकवून गळतीचे प्रमाण शून्यावर आणावे यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके योजना सुरू करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती व इंग्रजी अशा माध्यमांतील शाळांचा यात समावेश आहे. त्यानुसार महाड तालुक्यातील ३५३ शाळांतील मुलांसाठी ७८ हजार १५१ पुस्तके आली आहेत. पहिली ते पाचवीतील ८ हजार ८३ मुलांना तर सहावी ते आठवीतील ५ हजार ८६४ मुलांना असा एकूण १३ हजार ९४७ मुलांना या पुस्तकांचा लाभ होणार आहे. शाळा क्र. ५ पाच येथून आलेली पुस्तके प्रत्येक केंद्र स्तरावर वितरीत करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता चांदोरकर यांनी सांगितले. शाळा सुरू होण्याच्या सात दिवस आधी ही पाठ्यपुस्तके मुख्याध्यापकांच्या ताब्यात दिली जाणार आहेत. शाळेत पहिल्या दिवशी पदाधिकारी, अधिकारी, पालक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक ही पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.च्ग्रामीण भागात पुस्तके पोहोचवण्याचे काम सुरू झाले असून पहिल्याच दिवशी तालुक्यातील ३५३ शाळांमधील पहिली ते आठवी पर्यंतच्या१३ हजार ९४७ विद्यार्थ्यांना या पाठ्यपुस्तकांचा लाभ घेता येणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाRaigadरायगड