शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

अलिबाग येथे समुद्रात बुडाली मासेमारी बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 02:13 IST

आठ जण सुखरूप : उरण-करंजा येथील नमो:शिवाय बोट; लाइफ जॅकेट, बोयांच्या मदतीने गाठला किनारा; ३० लाखांचे नुकसान

अलिबाग : कुलाबा किल्ल्याजवळील समुद्रात असणाऱ्या खडकाळ भागात उरण-करंजा येथील नमो:शिवाय मासेमारी बोट बुडाली. बोटीतील खलाशांनी बोटीतील लाइफ जॅकेट आणि बोयांच्या साहाय्याने पोहत वरसोली किनारा गाठून आपले प्राण वाचविले. खलाशी आणि बोटीवरील कामगार यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले आहे. बोट बुडाल्याने बोटमालकाचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले.

नमो:शिवाय मासेमारी बोटींमधून वाचलेल्या खलाशांमध्ये वसंत बामा पाटील (नावाडी), धावू गोविंद तांडेल, गजानन अर्जुन जोशी, नितीन जनार्दन पाटील, उमाजी बालाजी पाटील, रूपेश जनार्दन पाटील, नारायण मंगळ्या कोळी आणि परशुराम शांताराम पाटील यांचा समावेश आहे. मासेमारी बंदी उठणार या आनंदाने रायगड जिल्ह्यातील कोळीबांधवांनी आपल्या बोटींची डागडुजी करून आठवडाभराचे लागणारे साहित्य, डिझेल आदी बोटींवर नेऊन ठेवले आणि आपल्या बोटी मासेमारीसाठी सज्ज ठेवल्या होत्या. १ आॅगस्टच्या पहाटे उरण-करंजा येथील बंदरातून मासेमारीसाठी बोटी निघाल्या. या बोटींच्या सोबत पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास राजेश प्रकाश नाखवा यांची आयएनडी एमएच ४७ एमएम २२३ नमो:शिवाय ही बोट मासेमारीसाठीची सामग्री घेऊन आठ खलाशांसह निघाली. ती वेळ सकाळी ४.३० वाजताची होती. नमो:शिवाय या बोटीचे इंजिन अचानक बंद पडले. या वेळी प्रसंगावधान राखून नावाडी आणि खलाशांनी बोटीतील नांगर आणि काही जाळी बोट थांबविण्यासाठी समुद्रात टाकली; परंतु याच वेळी समुद्राला आलेल्या भरतीच्या लाटा आणि सोसाट्याचा वारा यामुळे बोट एका जागेवर स्थिरावली नाही. लाटांचा मारा आणि वारा यांच्या कचाट्यात सापडलेली ही बोट अलिबाग समुद्रकिनाºयालगत असणाºया कुलाबा किल्ल्याच्या दिशेने सरकू लागली असतानाच नमो:शिवाय बोट कुलाबा किल्ल्यानजीकच्या खडकाळ भागातील खडकावर आदळली. खडकावर आदळल्याने बोटीचा तळभाग फुटला आणि बोटीत पाणी शिरले.आता आपली बोट बुडणार हे लक्षात आल्यानंतर बोटीवर असणाºया खलाशांनी तातडीने बोटीत असणारे लाइफ जॅकेट आणि बोया यांची एकत्र बांधणी केली. त्यांच्याजवळ असणारे मोबाइल त्यांनी सोबत नेलेल्या प्लॅस्टिकच्या बरणीत टाकले आणि समुद्राच्या पाण्यात स्वत:ला झोकून दिले. ही वेळ सकाळी ६ वाजताची होती, तोपर्यंत समोर अलिबागचा किनारा या खलाशांना दिसला. त्यांनी त्या दिशेने पोहण्यास सुरुवात केली. समुद्राच्या लाटांवर आरूढ होत हे आठ खलाशी अलिबाग नजीकच्या वरसोली समुद्र किनाºयावर पोहोचले. तेथून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे उपचारासाठी दाखल केले होते. आठही जणांवर प्राथमिक उपचार करून घरी सोडले आहे.आमचा मासेमारी कालावधी दोन महिन्यांनी सुरू होणार म्हणून आमच्या बोटीची डागडुजी करून मासेमारीला जाण्यासाठीची तयारी केली. सकाळी बोट निघाली आणि घरी गेलो. दोन तासांनी बोटीतूनच खलाशांचा फोन आला. आगोदर खलाशांची चौकशी केली. सर्व सुखरूप असल्याचे समजल्यानंतर आम्ही ही घटना मत्स्यव्यवसाय विभागाला कळविली. माझी मासेमारी बोट बुडाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.- राजेश नाखवा, मालक, नमो:शिवाय बोटअचानक बंद पडलेले बोटीचे इंजिन आणि लाटांच्या माºयाने बोट भरकटली जाऊन बोटीच्या तळाला खडक लागला आणि आमची बोट फुटली. आम्ही लगेचच सर्व लाइफ जॅकेट आणि बोया एकत्रित बांधले. त्याचबरोबर आम्ही बोट बुडाल्याचा संपर्क मालकाला केला. त्यासाठी आम्ही आमचे मोबाइल पाण्यात भिजू नये म्हणून एका प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवले होते. हिंमत न हारता आम्ही सर्वांनी एकजुटीने एकमेकाला धीर देत अलिबाग वरसोलीचा किनारा गाठला.- राजेश पाटील, खलाशी

टॅग्स :RaigadरायगडThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाfishermanमच्छीमार