शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कळंबोलीमधील एमटीएनएलच्या पडीक इमारतींना आले खंडराचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 11:24 PM

परिसरातील रहिवाशांना त्रास; साप, विंचवांचा वाढला उपद्रव

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : कळंबोली वसाहतीत सेक्टर - १० येथील महानगर टेलिफोन निगमच्या इमारती मागील १२ वर्षांपासून ओस पडल्या आहेत. वापर नसल्याने या इमारती खंडर बनल्या आहेत. झाडे व झुडपे वाढली आहेत, त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून या इमारती दुर्लक्षित राहिल्याने त्याचा ताबा गर्दुल्ले आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी घेतला आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांच्या अनेक तक्रारी असूनही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.

सिडकोने सुरुवातीला कळंबोली वसाहत विकसित केली. त्यामध्ये विविध नियोजनाच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्तात घरे देण्यात आली. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांनाही आरक्षित भूखंड देण्यात आले. त्यावर रो-हाउसेस व छोटेखणी बंगले उभारले. हे करीत असताना आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता मात्र त्या प्रमाणात झाली नाही. चाकरमान्यांसह विविध खासगी व शासकीय प्राधिकरणातील नोकरदारांनी मोर्चा कळंबोलीकडे वळविला. सेक्टर -१० मध्ये एमटीएनएलच्या एकूण सहा इमारती आहेत.

या सहा इमारतीत एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांसाठी ९६ सदनिका आहेत. या सदनिका मागील अनेक वर्र्षांपासून वापराविना पडून आहेत. पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने येथील अनेक कर्मचारी स्वत:च्या घरात स्थलांतरित झाले आहेत. या इमारतींची पडझड सुरू झाली आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुराचा मोठा फटका या इमारतींना बसला. सध्या या इमारती धोकादायक बनल्या आहेत. इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे.

साप व इतर सरपटणाºया प्राण्यांचा वावर वाढल्याने परिसरातील इमारतीत राहणाºया रहिवाशांना याचा ताप झाला आहे. या निर्मनुष्य इमारतींचा ताबा गर्दुल्ले आणि असामाजिक घटकांनी घेतल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर रासपचे जिल्हाध्यक्ष विकास वाक्षे यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली असून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

गर्दुल्ल्यांचा वावर वाढलाइमारतीत कोणीही राहत नसल्यामुळे येथे गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे, तसेच रात्रीच्या वेळी रहिवाशांना यांचा त्रास होत आहे. मोडकळीस आलेल्या सोसायटीस संरक्षण भिंत आहे. गेटही कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे; परंतु इमारतीच्या बाजूला असलेली संरक्षण भिंत तोडण्यात आली आहे. तेथूनच या इमारतीत प्रवेश केला जातो. याचबरोबर इमारतीभोवती मोठ्या प्रमाणात झाडे असल्यामुळे रात्रीच्या वेळी काळोख असतो. तसेच काही प्रमाणात या परिसरातील रोडवरील पथदिवे बंद असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.