शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणाळे येथील प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची दुरवस्था, शिलालेख, स्मारकाची पडझड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 02:10 IST

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ठाणाळे येथे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची पुरती दुरवस्था झाली आहे.

- विनोद भोईरपाली : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ठाणाळे येथे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. येथील स्तूप, विहार, चैत्यगृह, शिलालेख, स्मारक यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्यावर अनेक उपद्रवी लोकांनी चक्क आॅइल पेंटने नावे लिहिली आहेत. त्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याची भीती आहे.ठाणाळे लेणी समूहात चैत्यगृह, स्मारक,-स्तूपसमूह, सभागृह व उर्वरित २१ विहार लेणी आहे. बहुतांश विहारांमध्ये व्हरांडे आणि एक किंवा दोन खोल्या असून त्यामध्ये शयनासाठी ओटे आहेत. काही विहारांमध्ये समोरच्या भागात दालन व चार पाच भिक्षूंच्या निवासाची व्यवस्था आहे. अशा विहारात आंतरदालन, प्रवेशद्वार, खिडकी व शयन ओटे आहेत. पाच पायऱ्या असलेल्या एका विहारात वाकाटककालीन रंगीत चित्रांचे काही अवशेष दिसतात.प्राकृत ब्राम्ही लिपीतील शिलालेख असलेले एक पाण्याचे टाके आहे. पाण्याचे हौद, टाके, ब्राम्ही शिलालेख भित्तीचित्र आहेत. या सर्वांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. बरेच अवशेष भग्नावस्थेत आहेत. अनेक उपद्रवी लोकांनी येथील स्तूप, चैत्यगृह, स्मारक यावर चुन्याने व आॅइल पेंटने आपली नावे कोरली आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य लुप्त झाले आहे. ठाणाळे लेण्यांसारखा ऐतिहासिक व पुरातन ठेवा जतन करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व प्रभावी उपाययोजना राबविण्यात यावी, अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.ठाणाळे लेण्यांचा काळ हा इ.स. पूर्व दुसºया शतकापासून इ.स. ५ व्या शतकापर्यंत आहे. ही लेणी डोंगरामध्ये पश्चिमाभिमुख कोरलेली आहेत. लेण्यात सापडलेल्या विविध वस्तू व मौर्यकालीन चांदीची नाणी पाहता ही लेणी २२०० वर्षांपूर्वीची असल्याचे अनुमान काढण्यात येते. लेण्यांचा दगड हा अग्निजन्य (बेसाल्ट) दगड आहे. शिल्पकलेच्या दृष्टीने अप्रतिम असलेल्या तसेच मानवी जीवनाच्या आर्थिक जडणघडणीत या लेण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. ही लेणी समुद्रकिनाºयावरून चौल-धरमतर-नागोठणे खाडीमार्गे देशावर जाणारी व्यापारी केंद्रे होती असे म्हटले जाते. वाघजाई घाटातून मावळात जाणारा प्राचीन मार्गही या लेण्यांजवळून जातो. यामुळे ही लेणी चौल बंदराच्या सान्निध्याने खोदली गेली आहेत.कोकणातून घाटमार्गे देशावर जाता-येताना विश्रांतीचे स्थान म्हणून या लेण्यांचा उपयोग केला गेला. त्याचबरोबर बौद्ध भिक्षूंच्या भदन्त, आचार्य, परित्राजक यांच्या निवाºयासाठी सुद्धा या लेण्यांचा उपयोग इ.स. ५ व्या शतकापर्यंत करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध आहे.लेण्यांपर्यंतकसे पोहोचाल?पाली गावापासून ठाणाळे हे गाव १५ किमी अंतरावर आहे. ठाणाळे या गावी येण्यासाठी नाडसुरपर्यंत एस.टी.ची सुविधा उपलब्ध आहे.नाडसुर ते ठाणाळे हे २ कि.मी. अंतर असून तेवढेच अंतर लेण्यांकडे जाण्यासाठी चालावे लागते.ठाणाळे गावच्या पूर्वेकडे असलेल्या जंगलामध्ये ही लेणी आहेत. त्या भागाला चिवरदांड असे म्हणतात. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ही येथे आश्रय घेतला होता.या लेण्या अतिशय प्राचीन असून ऐतिहासिकदृष्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पुरातत्त्व खात्याने वेळीच या लेण्यांची डागडुजी व देखभाल करणे गरजेचे आहे. येथे येणाºया पर्यटकांनी लेण्यांवर नावे टाकून येथील सौंदर्याला गालबोट न लावता, येथील परिसर स्वच्छ व संरक्षित कसा राहील याची दक्षता घेतली पाहिजे. शिवऋण प्रतिष्ठानतर्फे येथील परिसर साफ करून त्यासंदर्भातील लघुपटही प्रसिद्ध केला आहे, अशी माहिती शिवऋण प्रतिष्ठानकडून प्राप्त झाली.सुधागड तालुक्याची अस्मिता असलेल्या ठाणाळे येथील प्राचीन बौद्धकालीन लेण्यांच्या दुरवस्थेबाबतशासन स्तरावर पाठपुरावा करून या लेण्यांच्या जतन व संवर्धनासाठी प्रयत्न करणार.- दिलीप रायन्नावर, तहसीलदार,पाली-सुधागड

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र