शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

आंबेत पूल वाहतुकीस खुला; नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 2:12 AM

वर्दळीत अडचणी : सुनील तटकरे यांच्याकडे मागणी

म्हसळा : सद्य:स्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी विषाणू संसर्ग रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्रीनदी जोडमार्गावरील आंबेत पूल वाहतुकीसाठी आणि नागरिकांना रहदारीस तीन दिवसांपासून प्रशासनाच्या आदेशानुसार टाळेबंद करण्यात आला होता. मात्र, नागरिकांच्या अडचणीत अधिक भर पडल्याने आणि अनेक अत्यावश्यक सेवांवर परिणाम होत असल्याने हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

आंबेत पूल बंद केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ, पंदेरी, बाणकोट आदी शेजारील गावांतील लोकांना बाजारहाट, वैद्यकीय सेवा सुविधा घेण्यासाठी माणगाव, गोरेगाव, महाड, अलिबाग येथे जावे लागते. त्यातच शेतीचा हंगाम जवळ आल्याने अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यासाठी दोन जिल्ह्यांतील लोकांना आंबेत पूल मार्ग हा एकमेव महत्त्वाचा दुवा आहे. सध्या आंबे काढणी व खरेदी-विक्री सुरू असल्याने आंबा बागायतदारांना आजूबाजूच्या गावांत जावे लागते. आंबेत मार्गच बंद करण्यात आल्याने आणि लॉकडाउन कालावधीत लोकांच्या दैनंदिन व्यवहारात पुरता खोळंबा झाला. अत्यावश्यक सेवेची गरज असताना आंबेत मार्ग बंद केल्याने त्याचा परिणाम म्हाप्रळ येथील बाजारपेठेवर तसेच मुख्य शहरातील अत्यावश्यक सेवेवर होत होता.

आंबेत पूलमार्ग पूर्ववत चालू करण्यासाठी लोकांनी रायगडचे खा. सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. खा. तटकरे यांनी रायगड, रत्नागिरी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून दोन दिवस बंद केलेला हा मार्ग जिल्हा प्रशासनास सुरू करण्यास सांगितल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.