शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

अलिबागमध्ये एकाच रात्रीत चार घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 2:08 AM

तालुक्यातील हाशिवरे-रेवस पट्ट्यातील गावांमध्ये रविवारची रात्र हादरवणारी ठरली. चोरट्यांनी सलग चार घरे फोडून लाखो रुपयांची रोकड आणि लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पोयनाड हद्दीतील ज्वेलरीचे दुकान फोडून तेथील चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. या घटनेने गावांतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

अलिबाग : तालुक्यातील हाशिवरे-रेवस पट्ट्यातील गावांमध्ये रविवारची रात्र हादरवणारी ठरली. चोरट्यांनी सलग चार घरे फोडून लाखो रुपयांची रोकड आणि लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पोयनाड हद्दीतील ज्वेलरीचे दुकान फोडून तेथील चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. या घटनेने गावांतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी शहराकडील मोर्चा वळवून आता थेट ग्रामीण भागांना लक्ष्य केल्याने शहरांबरोबरच ग्रामीण भागही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. मांडवा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.शहरी भागांमध्ये चोरट्यांचा असणारा धुमाकूळ आता ग्रामीण भागाकडे वळला असल्याने पोलिसांसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे राहिले आहे. सध्या हिवाळा सुरु असल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. चोरट्यांनी याचाच फायदा घेत घरफोडीचा प्लॅन सहज पूर्ण केला आहे. रविवारी रात्री जगन्नाथ पाटील यांच्या घरात शिरुन चोरट्यांनी कपाटातील १० हजार रुपये आणि तब्बल ११ तोळे सोने चोरले. अलिबाग तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अनिल गोमा पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केला आहे. पाटील यांच्या घरातील सर्वजण कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते. तसेच पाटील यांच्या अन्य दोन भावांच्या घरातही चोरी केली. चोरट्यांनी घराचे कडीकोयंडा उचकटून त्यांच्या घरात प्रवेश केला. पाटील यांच्यासह त्यांच्या भावाच्या घरातील ५० हजार रोख, १३ सोन्याच्या अंगठ्या किंमत ९० हजार रुपये, कानातील सोन्याचे तीन जोड २० हजार रुपये किमतीचे, एक तोळे सोने, १० हजार रुपये किमतीची दोन घड्याळे, सुरेंद्र पाटील यांच्या घरातील दोन हजार रुपये आणि अनिल यांचे मोठे बंधू जगन्नाथ पाटील यांच्या घरातील दोन लाख १० हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. त्याचप्रमाणे फुफादेवीचा पाडा येथील बंद घरातील लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहेत.पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील सौभाग्य ज्वेलर्सही चोरट्यांनी फोडले आहे. त्या दुकानातील चांदी मोठ्या प्रमाणात चोरली आहे. सोने ज्या तिजोरीत ठेवण्यात आले होते त्याचे लॉक भक्कम असल्याने चोरट्यांना ते तोडता आले नाही.पोलिसांचा वचक राहिला नाहीजिल्ह्यात गेल्यावर्षी तब्बल २३२ घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यातील ७० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. यावर्षीही घरफोडीचा आलेख वाढत असल्याने पोलिसांचा वचक कमी तर झाला नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ग्रामीण भागाकडे चोरट्यांचा मोर्चा -जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये सातत्याने चोरीच्या घटना घडतात. मात्र ग्रामीण भागामध्ये त्याचे प्रमाण कमी होते. चोरट्यांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागांकडे वळवला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. लवकरच त्यांना गजाआड केले जाईल, असे सहायक पोलीस निरीक्षक एम.आर.बुरांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अनिल गोमा पाटील यांच्या घरापासून काही अंतरावर दारुच्या बाटल्या आणि काही पदार्थ पडल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे चोरट्यांनी चांगलीच जंगी पार्टी केली असावी अथवा त्यांचे काही साथीदार तेथे थांबले असावेत, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. चोरीमागे मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा