शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

रिलायन्स विरोधातील आंदोलन अखेर ५३ व्या दिवशी स्थगित, पहिल्या टप्प्यात ३५१ प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकरीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 09:45 IST

रिलायन्सच्या वतीने पहिल्या टप्प्यात ३५१ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याने लोकशासनाच्या वतीने २७ नोव्हेंबरपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर चालू करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला संघटनेच्या वतीने ५३ व्या दिवशी स्थगिती देण्यात आली.

नागोठणे : पहिल्या टप्प्यात ३५१ प्रकल्पग्रस्तांना रिलायन्समध्ये ठेकेदारीत नोकरी मिळण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याचा शब्द मिळाला असून, आज सोमवारी ५३ व्या दिवशी आंदोलनाला स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली.रिलायन्सच्या वतीने पहिल्या टप्प्यात ३५१ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याने लोकशासनाच्या वतीने २७ नोव्हेंबरपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर चालू करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला संघटनेच्या वतीने ५३ व्या दिवशी स्थगिती देण्यात आली. त्यावेळी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत कोळसे पाटील बोलत होते. या सभेला संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार राजेंद्र गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशांक हिरे, स्थानिक सरचिटणीस गंगाराम मिणमिणे, अध्यक्ष चेतन जाधव, सुरेश कोकाटे, प्रबोधिनी कुथे, मोहन पाटील, उषा दाभाडे, एकनाथ पाटील, सुजित शेलार आदींसह पदाधिकारी आणि हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. आपल्याला पूर्ण यश मिळाले नसले तरी लढाई अजून संपलेली नाही. खा. सुनील तटकरे यांनी शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला रिलायन्समध्ये नोकरी मिळाल्याशिवाय थांबणार नसल्याचे सांगितले असल्याचे कोळसे पाटील यांनी स्पष्ट केले.ज्यांच्या पदरात पडत आहे, त्यांनी उर्वरित लोकांना कंपनीत नोकरी मिळण्यासाठी सहकार्य करावे, असा सल्ला यावेळी दिला. ही माघार नाही, तर आपण आज यशस्वी झालो आहोत, असे मी मानतो असे कोळसे पाटील म्हणाले.

‘आंदोलनाने अहिंसेच्या मार्गाने लढायला शिकविले’- गेल्या दोन वर्षांपासून आपण लढत आहोत. आजचे आंदोलन आपण मागे घेतले नसून, त्याला स्थगिती दिली आहे. आतमध्ये नोकरीसाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनी बाहेरच्या २७५ जणांना कधीही विसरून चालणार नाही. - यांच्या न्याय्य हक्कासाठी आपल्याला पुढे लढतच राहायचे आहे. ५३ दिवसांच्या या आंदोलनाने अहिंसेच्या मार्गाने कसे लढायचे हे नक्कीच शिकवले गेले असल्याचे राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले.‘मागण्या पूर्ण होतील’ आपल्या मागण्या टप्प्याटप्प्याने  पूर्ण केल्या जातील, असा शब्द रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Relianceरिलायन्सagitationआंदोलनEmployeeकर्मचारी