शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

निर्यातबंदीनंतर जेएनपीए बंदरात सात हजार टन कांद्याचे अडकून पडलेले २५० कंटेनर रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 7:44 PM

याबाबतची माहिती सीमा शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  

मधुकर ठाकूर, उरण : चाळीस टक्के निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही काही तांत्रिक अडचणींमुळे तीन दिवसांपासून जेएनपीए बंदरात अडकून पडलेला सुमारे २५० कंटेनरमधील सात हजार टन कांदा अखेर मंगळवारी (७) संध्याकाळपासून रवाना होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  

ऐन लोकसभा निवडणुकीतच शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने अखेर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी नंतर तब्बल १५० दिवसांनी ४० टक्के निर्यात शुल्काची अट कायम ठेऊन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.यासाठी ३ मे रोजी केंद्र सरकारने अध्यादेशही काढला.मात्र अध्यादेश ७ मेच्या  संध्याकाळपर्यंत सीमा शुल्क विभागाच्या वेबसाइटवर अपडेटच झालाच नाही. यामुळे जेएनपीए बंदरातुन निर्यातीसाठी पाठविण्यात आलेले कांद्याचे सुमारे २५० कंटेनर बंदर परिसरातील ठिकठिकाणच्या सीएफएस तीन दिवसांपासून अडकून पडले होते. सुमारे सात हजार टन कांदा बंदरातच अडकून पडल्याने वेळेत कांदा निर्यात होऊ शकला नाही. परिणामी झालेल्या विलंबामुळे जहाजाचे भाडे व इतर खर्चही वाढल्याचा जबरदस्त फटका शेकडो कांदा निर्यातदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसला.   केंद्र सरकारच्या ४० टक्के निर्यात शुल्क भरून कांदा निर्यातबंदी उठवून कांदा निर्यात खुली केली आहे.मात्र या निर्यात शुल्कामुळे कांद्याची मागणी कमी होणार आहे.परिणामी कांद्याची निर्यातही कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी आणि कांदा निर्यात बंदी उठविण्याच्या राजकीय खेळामुळे मात्र कांदा निर्यातदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निर्यातदार व्यापारी राहुल पवार यांनी सांगितले.  

जेएनपीए आणि सीमा शुल्क विभागाची वेबसाईट तांत्रिक अडचणींमुळे अपडेट होण्यास विलंब झाल्यानेच निर्यातीसाठी पाठविण्यात आलेला सुमारे सात हजार टन कांद्याचे २५० कंटेनर बंदरातच अडकून पडले होते.मात्र ७ मे संध्याकाळपर्यंत वेबसाईट सुरू झाली आणि कांदा निर्यातीचे कामही सुरळीतपणे सुरू झाले असल्याची माहिती न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरण